Sunday 16 October 2022

जगातील वन्यजीवांच्या संख्येत ६९ टक्क्य़ांनी घट

हवामान बदल, नैसर्गिक अधिवासामध्ये घट, अवैध शिकार, बेसुमार वृक्षतोड, वणवे आदी अनेक कारणांमुळे वन्यजीवनाचा र्‍हास होत असतो. वर्ल्ड वाईड फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ)च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लिव्हिंग प्लॅनेट या अहवालानुसार जगातील वन्यजीवांच्या संख्येत १९७0 ते २0१८ या काळात६९ टक्क्य़ांनी घट झाली आहे.

या जीवांमध्ये सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप, मासे आदींचा समावेश आहे. हेच भारतातही दिसून आले आहे. ४८ वर्षांमध्ये मधमाश्यांसह गोड्या पाण्यातील १७ प्रजातींच्या कासवांचे प्रमाण कमी झाले आहे. अहवालानुसार, वन्यजीवांची संख्या झपाट्याने कमी होण्यामागे सहा प्रमुख कारणे आहेत. यामध्ये हवामान बदल, वाढते प्रदूषण, शेती, शिकार, आक्रमक प्रजाती आणि जंगलतोड यांचा समावेश आहे.

दुसर्‍या संशोधनानुसार सध्या मनुष्य दर मिनिटाला २७ फुटबॉल मैदानांइतकी जंगलतोड करीत आहे. या अभ्यासासाठी संशोधकांनी ५२३0प्रजातींची पाहणी केली. अभ्यासानुसार, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन देशांमध्ये ४८ वर्षांमध्ये वन्यजीवांच्या संख्येत सर्वात मोठी म्हणजे ९४ टक्के घट झाली आहे. त्याच वेळी, आफ्रिका आणि आशियामध्ये वन्यजीव अनुक्रमे ६६ टक्के व ५५ टक्के कमी झाले आहेत. जागतिक स्तरावर गोड्या पाण्यातील प्रजातींची संख्या ८३ टक्के कमी झाली आहे.

वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे व लोकसंख्या वाढीमुळे प्राण्यासाठी असणारी वन्य जमिनीचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे व प्राण्यांना स्वताचे अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे व काही प्राण्याचा प्रजाती नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देवून नामशेष होवू घातलेल्या प्राणी व पक्षी यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सरकारतर्फे प्राणी व पक्ष्यांसाठी अभयारण्ये घोषित केली गेली आहेत.

माळढोक पक्षी हा असाच एक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला दुर्मिळ पक्षी आहे. हा पक्षी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटका, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश ह्या राज्यातील काही भागात आढळतो. संबधित राज्य सरकारांनी माळढोक पक्ष्यासाठी अभयारण्ये घोषित केली आहेत. ह्या दुर्मिळ व नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याचा संरक्षणासाठी व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने १९७९ मध्य माळढोक अभयारण्याची घोषणा केली.

Thursday 13 October 2022

आसामची आयर्न लेडी: संजूक्ता पराशर


हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल 16 अतिरेक्यांना एक हाती यम सदनाला पाठवून आणखी 64 अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजूक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे. दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजूक्ता जर कधी आपल्या समोरून गेली तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही. एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेहि आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं. त्यामुळे संजूक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरहि लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजुक्ता पराशर यांना केंद्रीय गृहमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पोलीस तपास करणार्‍यांना प्रशिक्षण देण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते त्यांना हे पदक देऊन सन्मानित केले. त्यांनी 2011 ते 2016 दरम्यान आसाममधील जोरहाट आणि सोनितपूर जिल्ह्यांमध्ये ULFA आणि NDFB अतिरेक्यांच्या विरोधात कारवाईचे नेतृत्व करण्यासाठी एसपी म्हणून काम केले.
संजुक्ता पराशर यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1979 रोजी आसाममध्ये झाला.  त्यांनी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी संपादन केली आहे.  त्यांनी जेएनयूमधून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.  त्यांनी यूएस फॉरेन पॉलिसीमध्ये एमफिल आणि पीएचडी पदवी देखील घेतली आहे.
आसाम सारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून नंतर दिल्लीच्या जेएनयु मधून डिग्री घेणारी संजूक्ता 2006 मध्ये आयपीएस देशात 85 क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। युएस फॉरेन पॉलिसी विषयात तीने पीएचडी केल्यामुळे ती डॉक्टर संजूक्ता पराशर म्हणून ओळखली जाते. तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी. त्यांना 6 वर्षाचा मुलगा आहे. संजूक्ताची आई त्याला सांभाळते. संजूक्ताची पोस्टिंग 2014 मध्ये आसाम मधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली. बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. शेकडो लोकांचे बळी गेले होते. आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण. हातात एके 47 घेऊन संजूक्ता सीआरपीएफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची तेव्हा जवानानाही दहा हत्तीचं बळ मिळायचं. अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरिकेही संजूक्ताच्या नावाने कापू लागले होते. तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या. परंतु शिर तळ हातावर घेऊन फिरणाऱ्या संजूक्तावर कसलाच परिणाम झाला नाही. तब्बल 16 अतिरेकी मारले गेले आणि 64 अटक झाले, तेही तिच्या अवघ्या 18 महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये. आसामची आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध आहे.
संजुक्ता पराशर यांना विभागात लेडी सिंघम म्हणूनही ओळखले जाते.  बोडो अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईत संजुक्ताचा मोठा वाटा होता.  आसामच्या जंगलात त्यांनी सीआरपीएफचे जवान आणि एके-47 वाहून नेणाऱ्या कमांडोचे नेतृत्व केले. पराशर सध्या दिल्लीतील नॅशनल इन्व्हेस्टिंग एजन्सीमध्ये उपमहानिरीक्षक (डीआयजी) म्हणून कार्यरत आहेत.  यापूर्वी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  एनआयएमध्ये दहशतवादासह अनेक संवेदनशील प्रकरणे ती पाहते.  एनआयएमधील त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. आज संजूक्ता पराशर दिल्ली मध्ये कार्यरत आहे. देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे.