Tuesday 16 November 2021

7.मौर्यकालीन भारत (इयत्ता सहावी) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1.सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या?

उत्तर- सिकंदाराने नेमलेल्या सत्रपांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या.

2.बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस कोणास पाठवले?

उत्तर-बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले.

3.मौर्य काळात कोणते व्यवसाय होते?

उत्तर-मौर्य काळात शेती, हस्तिदंतावरील कोरीव काम, कापड विणणे आणि रंगवणे, धातुकाम यांसारखे अनेक व्यवसाय होते.

4.सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत?

उत्तर-सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह,हत्ती, बैल यांसारख्या प्राण्यांची शिल्पे आहेत.

5.इ.स.पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचे साम्राज्य कोठून कोठपर्यंत पसरलेले होते?

उत्तर- इ.स.पूर्व सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाचे साम्राज्य  वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते?

6.दारिक नावाचे चलन कोणी सुरू केले?

उत्तर- सम्राट दार्युश याने दारिक नावाचे चलन सुरू केले.

7. ग्रीक सम्राट सिकंदर कोठे मरण पावला?

उत्तर- ग्रीक सम्राट सिकंदर हा बॅबिलोन येथे इ.स.पू.323 मध्ये मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे.

8. 'मुद्राराक्षस' हे नाटक कोणी लिहिले?

उत्तर-विशाखदत्त या संस्कृत नाटककाराने 'मुद्राराक्षस' हे नाटक लिहिले. यात धनानंद राजाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्य याने स्वतंत्र सत्ता कशी स्थापन केली हे कथानकातून उलगडले आहे.

9.चंद्रगुप्त मौर्य याने आपले उरलेले आयुष्य कोठे घालवले?

उत्तर-चंद्रगुप्त मौर्य याने आपले उरलेले आयुष्य कर्नाटकातील श्रवणबेलगोळ येथे घालवले.

10.सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला?

उत्तर- कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून सम्राट अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला.

11.सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा.

उत्तर- अशोकाने प्रजेसाठी सुखसोई निर्माण करण्यावर भर दिला. माणसांना तसेच पशूंना मोफत औषधपाणी मिळावे, अशी सोय केली. अनेक रस्ते बांधले.सावलीसाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या.विहिरी खोदल्या.

12.मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती?

उत्तर-मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र होती.

13.भारताची राजमुद्रा कशाच्या आधारे तयार करण्यात आली आहे?

उत्तर- भारताची राजमुद्रा सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या  आधारे तयार करण्यात आली आहे.

प्रश्न 2 .सांगा पाहू (म्हणजे काय?)

1.सत्रप- भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी सिकंदाराने ग्रीक अधिकाऱयांच्या नेमणुका केल्या होत्या. त्यांना सत्रप म्हणतात.

2.सुदर्शन- गुजरात राज्यातील जुनागढजवळ सम्राट चंद्रगुप्त मौर्याने सुदर्शन नावाचे धारण बांधले होते.

3.'देवानं पियो पियदसी'- याचा अर्थ :देवाचा प्रिय प्रियदर्शी

4.अष्टपद-पूर्वी बुद्धिबळाला अष्टपद असे नाव होते.

प्रश्न 3. आठवा आणि लिहा

1.चंद्रगुप्त मौर्य याच्या साम्राज्याची व्याप्ती- चंद्रगुप्त मौर्य याने नंद राजा धनानंद याचा पाडाव करून मगधावर इ. स.पू.325 च्या सुमारास स्वतः ची सत्ता प्रस्थापित केली. नंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याचा विस्तार सुरू केला. पुढे सेल्युकस निकेटर याचा पराभव करून अफगाणिस्तानातील काबूल, कंदाहार,हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्यास जोडले.

2.सम्राट अशोक याच्या साम्राज्याची व्याप्ती- अशोक इ. स.पूर्व 273 मध्ये मगधच्या सत्तेवर आला. त्याने कलिंगवर स्वारी करून विजय मिळवला. वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत ,तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते.


No comments:

Post a Comment