Monday 15 November 2021

6 महासागरांचे महत्त्व (सहावी इयत्ता) प्रश्नोत्तरे


खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1.महासागरांचे क्षेत्रफळ लिहा

उत्तर-(अ) पॅसिफिक महासागर-16,62,40,977 चौकिमी (ब)अटलांटिक महासागर- 8,65,57,402 चौकिमी (क) हिंदी महासागर-7,34,26,163 चौकिमी (ड) दक्षिण महासागर- 2,03,27,000 चौकिमी (इ) आर्क्टिक महासागर-1,32,24,479 चौकिमी

2.सजीवसृष्टी जमिनीवर जास्त आहे की जलावरणात?

उत्तर- जमिनीवरील एकूण सजीवसृष्टीच्या कितीतरी पटीने जास्त सजीवसृष्टी जलावरणात (पाण्यात) राहते.

3.कोणत्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते?

उत्तर-महासागर,सागर किंवा समुद्र यांच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असते.

4.ज्वालामुखीमुळे कोणकोणते घटक पाण्यात मिसळतात?

उत्तर-ज्वालामुखीमुळे अनेक प्रकारची खनिजे,राख, क्षार व वायू पाण्यात मिसळतात.

5.जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय कोणता?

उत्तर-'मृत समुद्र' हा जगातील सर्वांत क्षारयुक्त जलाशय म्हणून ओळखला जातो.

6.खाऱ्या पाण्यापासून आपल्याला काय मिळते?

उत्तर-खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते.

7.मीठ हा पदार्थ कसा मिळवला जातो?

उत्तर- मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागात 'मिठागरे' तयार करून मिळवला जातो.

8.मिठाप्रमाणेच कोणते घटक समुद्रात असतात?

उत्तर- मिठाप्रमाणेच फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी अनेक खनिजे समुद्रात असतात.

9.मासे आपल्याला कोठून मिळतात?

उत्तर- मासे आपल्याला नदी, तलाव, महासागर यांतून मिळतात.

10.जल जीवांचा उपयोग कशाकशांसाठी करतात?

उत्तर- जल जीवांचा उपयोग आहार, औषधनिर्मिती, खतनिर्मिती, संशोधन इत्यादींसाठी वापर होतो. 

11.भारतामध्ये कोणकोणते जीव खाल्ले जातात?

उत्तर-भारतामध्ये प्रामुख्याने कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी (शार्क) रावस इत्यादी समुद्री जीव खाल्ले जातात.

12.कोणकोणत्या देशांतील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते?

उत्तर- मालदीव,मॉरिशस, सेशल्स बेटे इत्यादी देशांतील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावर अवलंबून असते.

13.किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते कारण सांगा.

उत्तर- हवेतील बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व साठवते,त्यामुळे किनारपट्टीच्या भागात तापमान सम राहते.

14. वारे का वाहतात?

उत्तर- जमीन व पाण्याच्या तापण्यातील फरकामुळे पृथ्वीच्या वातावरणातील हवा असमान तापते व परिणामी पृथ्वीवर वायूदाब पट्टे निर्माण होतात.या वायूदाबातील फरकामुळे वारे वाहतात.

15. सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे कारण सांगा.

उत्तर- सागरसानिध्य लाभलेल्या प्रदेशात हवामान सम असल्यामुळे मानवी लोकसंख्येची घनता या भागामध्ये जास्त असते. हवामानाबरोबरच समुद्रातून मिळणारी उत्पादने, विपुल प्रमाणात उपलब्ध होणारे खाद्य यांमुळे सागरी किनारी भाग मानवाला नेहमी आकर्षित करत आला आहे.

16. महासागरातील खारे पाणी क्षारविराहित करून पिण्यायोग्य करण्याची व्यवस्था कोणत्या शहरात करण्यात आली आहे?

उत्तर- महासागरातील खारे पाणी क्षारविराहित करून पिण्यायोग्य करण्याची व्यवस्था संयुक्त अमिरातीमधील दुबई या शहरात करण्यात आली आहे.

17. खारफुटीचे लाकूड कसे असते?

उत्तर- खारफुटीचे लाकूड तेलकट, हलके व टिकाऊ असते. इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडांचा उपयोग होतो. 

18.सागरतळातून कोणकोणते खनिज पदार्थ मिळतात?

उत्तर- सागरतळातून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मँगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. तसेच खनिज तेल व नैसर्गिक वायूदेखील मिळतो.

19. जलमार्गातून कशांतून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते?

उत्तर- जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यांतून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते.

20.सागर किनारा लाभलेल्या कोणत्या देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व मिळाले आहे?

उत्तर-सागर किनारा लाभलेल्या स्पेन, नार्वे, जपान यांसारख्या  देशांना सागरी मालवाहतुकीमुळे महत्त्व मिळाले आहे.

21.पृथ्वीचा सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे?

उत्तर-पृथ्वीचा सुमारे 70.80 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे.

22. महासागरांचे प्रदूषण कोणकोणत्या कारणांमुळे होत आहे?

उत्तर- मानव आपल्या गरजा भागविण्यासाठी ज्या कृती करत असतो त्यातून अनेक प्रकारचा कचरा निर्माण होत असतो. यांत(1) शहरांमध्ये निर्माण होणारा घनकचरा सागरजलात टाकणे.(2)तेलगळती (3)जहाजांतून टाकले जाणारे साहित्य (4) मासेमारीचा अतिरेक (5) किनाऱ्यावरील खारफुटी जंगलतोड (6)पाणसुरुंगामुळे होणारे विध्वंस (7) उद्योग व शहरे यांतून सोडले जाणारे सांडपाणी (8) समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण

23.कोणकोणते जलचर प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत?

उत्तर- निळा देवमासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी जलचर प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

24. कोणत्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात?

उत्तर- 60 अंश दक्षिण या अक्षवृत्तापासून अंटार्क्टिक खंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात.

अ) गटात न बसणारा घटक ओळखा आणि सांगा

1) शंख, मासे, खेकडा, जहाज उत्तर- जहाज

2) अरबी समुद्र, भूमध्य समुद्र, मृत समुद्र, कॅस्पियन समुद्र उत्तर- मृत समुद्र

3)श्रीलंका, भारत, नार्वे, पेरू उत्तर-भारत

4) दक्षिण महासागर, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर, बंगालचा उपसागर उत्तर- बंगालचा उपसागर 

5)नैसर्गिक वायू, मीठ, सोने, मँगनीज उत्तर- नैसर्गिक वायू

No comments:

Post a Comment