Friday 31 December 2021

गजीनृत्य


गजीनृत्य प्रामुख्याने धनगर समाजात पिढ्यानपिढ्या चालत आलेली लोककला आहे. धनगर समाजाची बिरोबा, धुळोबा, सतोबा, नागोबा,भिवाडी, आयाक्का, बाळूमामा, सिदोबा आदी दैवते आहेत.त्यांची भक्ती आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी लोकनृत्याद्वारे लोकजागर केला जातो. गजी नृत्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करतात. गजनृत्यामध्ये नृत्य करणाऱ्यास गजी म्हणतात, तर ढोल वाजवणाऱ्यास ढोल्या म्हणतात. ढोलाच्या तालावरच ताल धरला जातो. गजाची घाई लावणाऱ्यास म्होऱ्या म्हणतात. या खेळात म्होऱ्याची भूमिका महत्वाची असते. रंगीत रुमाल उडवत डाव्या - उजव्या बाजूला वळत तालबध्द नृत्य करतात. नृत्यात पंचवीस ते तीस लोकांचा सहभाग असतो. त्यांचा पोषाख अंगात तीन बटनी नेहरु शर्ट, डोक्‍यावर तुरा काढलेला फेटा, दोन्ही हातांत रुमाल, कमरेलाही रंगीत रुमाल व विजार किंवा धोतर घातलेली असा असतो. ढोलवादक ज्याप्रमाणे ढोलावर टिपरी मारतो त्याप्रमाणे नृत्याचा प्रकार चाल बदलतो. ढोलवादकाचा हावभाव, त्याच्या पायांची हालचाल महत्त्वपूर्ण असते. तो आवाजामध्ये चढउतार करतो, त्याक्षणी नृत्याला गती आणि हळुवारपणा येत असतो. सनई, सूर, तुतारी नृत्यास ताल निर्माण करतात. गजनृत्याच्या पंचावन्न प्रकारांपैकी उपलब्ध असलेल्या नऊ - दहा प्रकारांना घाय असे म्हणतात. कापसी घाय, थोरली घाय, गळा मिठी घाय, रिंगन घाय, घोड घाय, टिपरी घाय, दुपारतीची घाय, इत्यादी. 

      देवदेवतांच्या यात्रांमध्ये रात्रभर या गजीनृत्याचा देवाची पालखी व रात्रभर तेलाची वात आरतीमध्ये जाळून जागर केला जातो. तसेच भंडारा,वालुग, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विविध मान्यवरांचे स्वागत समारंभ, वाढदिवस, सत्कार समारंभ व आयोजलेल्या विविध महोत्सवामध्ये गजीनृत्याचे सादरीकरण केले जाते.अलिकडे गजी मंडळांचा ड्रेसकोड बदलत असून, सध्या पायात घट्ट चोळणा,डोक्यावर मखमली रुमाल व दोन्ही हातात दोन भरजरी रुमाल एकसारखा असा पोशाख केलेला असतो. गजी मंडळातील मोहर्‍या व ढोल्यायांचा ड्रेसकोड हे गजी मंडळाचे विशेष आकर्षण असते.

      पश्‍चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातल्या बहुसंख्य गावात हा खेळ खेळला जातो. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना दिल्ली येथे लाल किल्ल्यावर 26 जानेवारीला गजीनृत्य सादर करायला बोलावले होते. त्यावेळी हे लोकनृत्य दिल्लीकरांचे मोठे आकर्षण ठरले होते. नंतरदेखील लाल किल्ल्यावर हे नृत्य सादर करायला संधी मिळाली होती. गजी मंडळ ही लोककला म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. वारसा आहे. पण नव्या पिढीला त्याच्याबाबत जास्त आकर्षण नाही. त्यामुळे काही भागातील ही लोककला लोप पावत चालली आहे. या संस्कृतीचे जतन करून त्याची जोपासना व्हायला हवी आहे.  सभा, समारंभातून, यात्रांमधून ही कला जिवंत राहण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Thursday 30 December 2021

तुफानों से क्या डरना और कठपुतली कक्षा-छठी


प्रश्न- एक वाक्य में जवाब लाखो।

1)सभी लोगों के साथ कैसे पेश आना चाहीए?

उत्तर-सभी लोगों के साथ प्यार से पेश आना चाहीए।

2)कौनसी बात टालने के लिए कवि ने कहा है?

उत्तर-दुसरों से नफरत करना टालना चाहीए।

3)किसको मदद मिलती है?

उत्तर- हिम्मत करनेवालों को मदद मिलती है।

4)जीवन में क्या करना चाहीए?

उत्तर- जीवन में सत्कर्म करना चाहीए।

5) जीवन क्या है?

उत्तर- जीवन हार-जीत का खेल है।

6)जीवन में कैसे रहना चाहीए?

उत्तर- जीवन में हंसकर रहना चाहीए।

7)अपनी कौनसी जिम्मेदारी है?

उत्तर- सब को सच्ची राह दिखाना अपनी जिम्मेदारी है।

8)अंधेरा कैसे दूर करना है?

उत्तर- आत्मज्ञान का दीप जलाकर अंधेरा दूर करना है।

9)देह-अभिमान के कारण क्या होता है?

उत्तर- देह-अभिमान के कारण महामारी फ़ैलती है।

10) किसको नहीं डरना चाहीए?

उत्तर- तुफानों से नहीं डरना चाहीए।


11) प्रीति के मित्रो के नाम बताओ?

उत्तर- तेजस, प्रसन्ना, मृण्मयी ये प्रीति के दोस्त थे।

12) किसकी आवाज सुनकर ये सभी बच्चे रुक गए?

उत्तर- सूत्रधार की आवाज सुनकर ये सभी बच्चे रुक गए।

13) सभी बच्चों ने अंदर कौनसा दृश्य देखा?

उत्तर- कठपुतलीयां रंगबिरंगी पहनावे पहनकर आँखे मटकाती इधर से उधर जा रही थी।

14) कठपुतली ने हाथ में नारियल लेकर क्या कहा?

उत्तर- कठपुतली ने हाथ में नारियल कहा- बहनों और भाईयों ,साथ में आई भाभीयों नमस्कार।प्रणाम। वेलकम।

15) नए कार्य का प्रारंभ कैसे किया जाता है?

उत्तर- नए कार्य का प्रारंभ नारियल फोडकर किया जाता है।

16) नारियल से क्या बाहर आया?

उत्तर- नारियल से फूल बाहर आया।

17) कठपुतलीयों के सामने से कौन भागी?

उत्तर- कठपुतलीयों के सामने से काली बिल्ली भागी।

18) बिल्ली का प्रिय खाद्य कौनसा है?

उत्तर- बिल्ली का प्रिय खाद्य चुहा है।

19)सूत्रधार ने छिंक का  क्या कारण बताया?

उत्तर- सूत्रधार ने छिंक का  कारण मिरची बताया।

20) हर घटना के पिछे कौनसा कारण होता है?

उत्तर-हर घटना के पिछे वैज्ञानिक या व्यावहारिक कारण होता है।

Tuesday 28 December 2021

अद्भुत धातू कलाकृतींचा किमयागार


माणसं कशानं झपाटून जातील काही सांगता येत नाही. आर्ट कलेकडे वळलेली माणसं चित्रकला, शिल्पकला या क्षेत्रात आपलं नाव कमावतात. मात्र यातही ते वेगळेपण जोपासतात. मुंबई- भायखळा येथील मेटल वर्क आर्टिस्ट स्वप्नील शिवाजी गोडसे याने धातूंपासून विविध कलाकृती साकारून कला क्षेत्रात स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे.  नुकतंच जहांगीर कलादालनात त्याचं 'दगड' हे अनोखे प्रदर्शन पार पडलं. या प्रदर्शनातून स्वप्नीलने धातूची अदभुत किमया कलाप्रेमींना दाखवली. घरात कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या गिरणी कामगाराच्या मुलाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर हे यश मिळवलं आहे.

स्वप्नील गोडसे याने जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून 2010 मध्ये पदवी प्राप्त केली आहे. धातूचे हे कलेचे माध्यम निवडताना त्याने स्टील, लोखंड, तांबे, पितळ अशा धातूचा वापर करून  विभिन्न कलाकृती साकारल्या आहेत. नुकतेच साकारलेले 'दगड' हे त्याचे पहिले सोलो प्रदर्शन होते. या संकल्पनेविषयी स्वप्नील बोलताना तो म्हणतो की,, मी मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. तिथे धरण बांधत असताना डोंगर पोखरताना बघितले आहे. त्या वेळी आतील दगड काढताना मला दिसत होते. ते दगड कायमस्वरूपी माझ्या मनावर कोरले गेले. तीच संकल्पना घेऊन मी पहिले सोलो प्रदर्शन करायचे ठरवले.

स्वप्नीलने अनेक उत्तमोत्तम धातूचे काम केले आहे. एम. एस. धोनी यांच्या रांची येथील बंगल्यात स्वप्नीलने तयार केलेले धातूचे शिल्प आहे. याआधी त्याने कॉपर शर्ट बनवला होता. कॉपरची गोण ही वेगळी कलाकृती त्याने साकारली होती. रे रोड येथे स्वप्नीलने स्टुडिओ उभारला आहे. या अभिव्यक्तीच्या क्षेत्रात 10 वर्षांहून अधिक काळ त्याने परिश्रमपूर्वक काम केले आहे आणि त्याला प्रचंड यशही मिळाले आहे.  स्वप्नीलचा प्रेमळ आणि प्रभावी संवाद यामुळे विचारांची देवाणघेवाण करण्याला सुलभता येते. याचमुळे त्याने व्यवसायातही चांगला जम बसवला आहे. अजूनही नवनवीन कलाकृती साकारण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

 जहागीर कलादालनात स्वप्नील गोडसे याचे 'दगड' प्रदर्शन नुकतेच आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात धातूंच्या मदतीने भूगर्भीय बदलांवर प्रकाश टाकण्यात आला. दगड आणि मानवी जीवनातील परिवर्तन, मानवी स्वभाव यांची सांगड घालण्याचा प्रयत्न स्वप्नीलने केला. स्वप्नील सांगतो, दगड म्हणजे डोंगर, डोंगर म्हणजे माती आणि माती म्हणजे जीवन. प्रत्येक जण मातीशी कनेक्ट असतो. दगडातून फुटलेली नवी पालवी, खास रिक्षा, दुचाकी किंवा मालवाहू वाहनांतून होणारा दगडांचा प्रवास, विकासाच्या नावाखाली झाडे तोडल्याने ओकंबोकं झालेली डोंगरे अशा त्याच्या कलाकृतींनी लक्ष वेधून घेततात.


मानवतावादी शांतिदूत डेस्मंड टुटू


त्वचेच्या रंगावरून उच्च-नीच ठरविण्याची पद्धत केवळ दक्षिण आफ्रिकेच्या नव्हे, तर जगाच्या इतिहासातील लज्जास्पद प्रकरण आहे. श्वेतांच्या अहंगंडातून आलेला हा वर्णद्वेष इतरांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकारही नाकारत होता. मानवतेला काळिमा फासणारी ही पद्धत नष्ट होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील जनतेला दीर्घ लढा द्यावा लागला.नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी लढय़ाचे वादातीत प्रणेते मानले जाते. परंतु अशा नेत्यांच्या संघर्षांचे आणि कष्टोत्तर यशाचे गमक समर्थ अशा दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये दडलेले असते. आर्चबिशप डेस्मंड टुटू हे मंडेला यांच्या मागील दुसऱ्या फळीमध्ये अग्रणी होते. या डेस्मंड टुटू यांचे रविवारी नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. ‘ब्रिटिशांनी भारत सोडल्यावर त्यांच्याशी शत्रुत्व घेण्याची काही गरजच उरत नाही,’ अशी भूमिका महात्मा गांधी यांनी स्वातंर्त्यलढय़ाच्या उत्तरार्धात घेतली होती. याच सूडबुद्धीविरोधी तत्त्वाचा अंगीकार टुटू यांनी केला. दक्षिण आफ्रिकेतील मूठभर गोऱ्या सत्ताधीशांच्या वर्णद्वेष्टय़ा धोरणांच्या विरोधात त्यांनी प्रखर लढा दिला. पण आपला संघर्ष हा वर्णद्वेषी वृत्तीविरोधात आहे, मूठभर गोऱ्यांविरोधात नाही याचे भान त्यांनी राखलेच, शिवाय विविध व्यासपीठांवर तशी भूमिकाही घेतली. वांशिक, वर्णीय संघर्षांमध्ये अशी नेमस्त भूमिका घेणारे चटकन लोकप्रिय होत नाहीत. काही वेळा त्यांच्या हेतूंविषयीदेखील शंका घेतल्या जातात. डेस्मंड टुटू हे धर्मोपदेशक होते. ते ‘गोऱ्या मिशनऱ्यांची’ भाषा तर बोलत नाहीत ना अशी शंका दक्षिण आफ्रिकेतील बहुसंख्य गौरेतर समाजातील काहींनी व्यक्त केलीच. परंतु महात्मा गांधींप्रमाणेच डेस्मंड टुटू यांनीही तळागाळापर्यंत लढा झिरपवण्यासाठी धर्मातील मानवतावादी तत्त्वांचा आधार घेतला. दक्षिण आफ्रिकेतील चर्च परिषदेचे अध्यक्ष आणि नंतर केपटाऊन अँग्लिकन चर्चचे आर्चबिशप या भूमिकेतून त्यांनी वर्णद्वेषी लढय़ाला चर्चचे पाठबळ दिले. पापक्षालनाची संधी आणि न्यायदानात सूडबुद्धी आणू न देणे ही तत्त्वे डेस्मंड टुटू यांनी कटाक्षाने पाळली.    दक्षिण आफ्रिकेतील पहिले कृष्णवर्णीय आर्चबिशप ठरलेले टुटू यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेमध्ये 7 ऑक्टोबर 1931 रोजी क्लेरकसोर्प येथे झाला. धर्माच्या क्षेत्रात प्रवेश करण्याच्या आधी ते काही काळ शिक्षक होते. प्रेमळ वृत्ती आणि धार्मिक तत्त्वचिंतनाचा अभ्यास यांतून त्यांची वैचारिक बैठक पक्की होत गेली. नैतिकतेची आणि सत्याची कास त्यांनी सोडली नाही. वर्णद्वेषाच्या विरोधातील लढ्याला त्यांनी अहिंसक स्वरूप दिले. या भूमिकेमुळे १९८४मध्ये त्यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक मिळाले. नव्वदच्या दशकात दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी संघर्षाला यश आले; परंतु अन्यायाच्या विरोधातील टुटू यांचा लढा कायम राहिला. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर आणि अन्यायावर प्रहार करण्याचे काम त्यांनी कधीही सोडले नाही. प्रदीर्घ लढ्यानंतर नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षस्थानी आले, तरी टुटू यांचे काम थांबले नाही. मंडेला लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही, त्यांच्या चुकीच्या निर्णयांवर टीका करताना त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. गरिबीच्या विरोधात आणि एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यात पुरेशी पावले उचलत नसल्याबद्दल टुटू यांनी दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष थाबो एम्बिकी यांच्या विरोधात भूमिका घेतली. झिम्बाब्वेमधील अत्याचारांच्या विरोधात दक्षिण आफ्रिकेने आवाज उठवावा, अशी भूमिकाही त्यांनी कायम घेतली. एम्बिकी यांच्यानंतर अध्यक्ष बनलेले जेकब झुमा यांना त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरोधी लढ्यातील अग्रणी असलेले आर्चबिशप डेस्मंड टुटू यांचे 26 डिसेंबर 2021 रोजी निधन झाले.

Monday 27 December 2021

गेब्रियल बोरीक: चिलीचा सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष


अलीकडच्या काळात जगातल्या काही देशात तरुणांचं आणि त्यातही महिलांचं नेतृत्व पुढे आलं आहे आणि त्यांनी सत्ता मिळवली आहे. २०१९ मध्ये फिनलंड येथे साना मारिन वयाच्या ३४ व्या वर्षी पंतप्रधान झाल्या. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिन्डा आर्डन २०१७ मध्ये ३७ वर्षाच्या असताना पंतप्रधान झाल्या. मॅक्रॉन फ्रान्सचे अध्यक्ष झाले तेव्हा ते ३९ वर्षांचे होते. तर  आता गेब्रियल बोरीक नावाच्या ३५ वर्षाच्या डाव्या विचाराच्या तरुणाला चिलीच्या मतदारांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिलं आहे. बोरीक यांच्या विजयामुळे चिली येथे जल्लोष साजरा करण्यात येत आहे. जोस एन्टोनियो कास्ट नावाच्या उजव्या विचाराच्या उमेदवाराचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बोरीकने प्रचंड मताने पराभव केला. अलीकडे समाजवादी विचारांचा पेरू, बोलिव्हिया, होन्डुरास आणि व्हेनेझुएलाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. ११ मार्चला बोरिक राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील.विद्यार्थी आंदोलनाचं महत्त्व लॅटिन अमेरिकेतील चिली या देशाने सिद्ध केलं आहे. चिलीचे माजी हुकुमशहा ऑगस्तो पिनोशेचेदेखील कास्ट समर्थक. जनरल पिनोशे यांनी १९७३ मध्ये बंड करून मार्क्सवादी साल्वाडोर आलंदेला उलथवून सत्ता हस्तगत केलेली. पिनोशेची सत्ता १९९० पर्यंत होती. त्या काळात तीन हजाराहून अधिक विरोधकांची हत्या करण्यात आलेली. कास्ट मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजूचे. गेल्या एक-दीड वर्षात कास्टच्या लोकप्रियतेत वाढ झालेली. दुसरीकडे बोरीक रस्त्यावर उतरून चिलीच्या सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडत असे. त्यांचा प्रचाराचा मुख्य मुद्दा चिलीचे रूपांतर लोककल्याणकारी देशात करायच होतं. त्यांचे विरोधी त्याची तो साम्यवादी असल्याची टीका करत असे. श्रीमंतांवर अधिक कर लावून सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी त्याचा उपयोग करण्यात येईल असा प्रचार बोरीक करत असे.

सान्तियागो ही देशाची राजधानी. बोरीक इथला विद्यार्थी नेता होता. देशाच्या खासगी शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात हजारो विद्यार्थ्यांचे त्यांनी मोर्चे काढले होते. चांगलं शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे,असं मोर्चा व जाहीर सभेतून ते लोकांना सांगत असे. चिलीत श्रीमंत आणि गरीबांमध्ये खूप दरी आहे. २०१९ च्या ऑक्टोबरमध्ये चांगली शिक्षण व्यवस्था व चांगली पेन्शन योजनासाठी आणि श्रीमंतांना फायदे करून देणारी आर्थिक व्यवस्था संपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. त्याची नोंद घेऊन राष्ट्राध्यक्ष सेबास्टियन पिनेटा यांनी नवीन राज्यघटना तयार करण्याची जाहिरात केली. आता नवीन घटनेचे काम सुरू आहे. पुढच्या वर्षी नवीन राज्यघटनेवर जनमत घेण्यात येणार. राज्यघटनेसाठी बनवण्यात आलेल्या समितीत निम्म्या संख्येत महिला आहेत. २१ वर्षाचा एक तरुणही समितीत आहे. आताची राज्यघटना जनरल पिनोशेच्या काळातली आहे. पिनोशेच्या राजवटीत लोकांवर प्रचंड अत्याचार करण्यात आलेले. मानवाधिकारांचे खुलेआम उल्लंघन करण्यात येत होतं.तरुण, कामगार आणि महिलांनी मोठ्या संख्येत मतदान केलं आणि त्याचा फायदा बोरीकला झाला.  कामगारांच्या प्रश्नांवर ते सतत बोलत असल्याने कामगार त्यांच्या बाजूने उभे राहिले.बोरीक हे चिलीचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष असतील.

 त्यांनी म्हटलं आहे की, ‘आमचं धोरण सर्वसमावेशक असणार. विद्यार्थ्यांवरील कर्ज माफ करण्यात येईल आणि चांगली पेन्शन योजना बनवण्यात येईल.’

 राष्ट्राध्यक्ष पिनेटा यांनी त्यांचे अभिनंदन केले. कास्ट यांनी पण बोरीक यांच अभिनंदन केलं. बोरीक यांच्या आघाडीत साम्यवादी पक्षाचाही समावेश आहे. क्युबा, कोलंबिया, पेरू, बोलिवीया, ऊरूग्वे, कोस्टारिकाने लगेच त्याचं कौतुक करून अभिनंदन केलं.२०११ च्या विद्यार्थी आंदोलनात बोरीक सहभागी झालेले आणि हळूहळू नेतृत्व त्यांच्याकडे आलं. विद्यार्थी आंदोलनानंतर ते दोनदा संसदेत निवडून आले. त्यानंतर राष्ट्राध्यक्षपदासाठी उभा राहण्याचा निर्णय त्याने घेतला.असणार. कामगारांच्या अपेक्षा पूर्ण करणं बोरीकसाठी सोपे नसणार; पण रस्त्यावर उतरून संघर्ष करत त्याने सत्ता मिळवली आहे. या संपूर्ण काळात त्याच्यासोबत प्रामुख्याने विद्यार्थी होते. बोरीक डाव्या विचारांचा असल्याने कामगार आणि महिलांची त्यांच्यकडून खूप अपेक्षा आहेत. हवामान बदलाचा पण त्यांनी गंभीरतेने विचार केला असून काही नवीन खाण प्रकल्प रद्द करण्याचा विचार त्याने व्यक्त केला आहे. चिली येथे तांब्याचा प्रचंड साठा आहे आणि अनेक देशाला तांब्याचा पुरवठा चिली करत आहे. चिली देशात श्रीमंत आणि गरीबांमध्ये प्रचंड दरी आहे. एक टक्के लोकांकडे चिलीची २५ टक्के संपत्ती आहे. चिली येथे कामगार, कर्मचारी आठवड्याला ४५ तास काम करतात. आता कामाचे तास ४० करण्यात येतील, असं बोरीसने म्हटलं आहे. 

तरुण नेतृत्व आणि त्यांचे देश


डाव्या विचारसरणीचा नेता गॅब्रिएल बोरिक हा चिली या लॅटिन अमेरिकन देशाचा  सर्वात  तरुण राष्ट्रपती बनणार आहे. त्याचं अवघ वय 35 आहे.बोरीक बोरिक पुढील वर्षी मार्च 2022 मध्ये देशाची कमान हाती घेतील. चिली  पुढील वर्षी अशा काही देशांपैकी एक असेल, ज्याने तरुण नेतृत्वाला देशाची धुरा सांभाळण्याची संधी दिली. जगात असे अनेक देश आहेत, जिथे 1980 नंतर जन्मलेले तरुण नेते देशाची धुरा सांभाळत आहेत. आणि विशेष म्हणजे हा पराक्रम अनेक देशांनी केला आहे. चला तर, अशा देशांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी सुमारे 35 वर्षांच्या नेत्यांकडे देशाची धुरा सोपवण्यास मागेपुढे पाहिले नाही.

ऑस्ट्रिया  देखील अशा देशांपैकी एक आहे, ज्याने 40 वर्षाखालील नेता देशाचा प्रमुख बनवला आहे. 1986 मध्ये जन्मलेले सेबॅस्टियन कुर्झ दोनदा देशाचे राष्ट्रपती झाले. डिसेंबर 2017 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी कुर्झ ऑस्ट्रियाचे पहिले राष्ट्रपती बनले. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा या पदावर आपली मोहोर उमटवली. ऑक्टोबर 2021 पर्यंत ते या पदावर राहिले. कुर्ज यांना सर्वात कमी वयात देशाचे परराष्ट्र मंत्री बनण्याचा मान मिळाला आहे.

फिनलंडची  कमानही युवा नेतृत्वाच्या हाती आहे. 16 नोव्हेंबर 1985 रोजी जन्मलेल्या सना मरिन या सध्या देशाच्या पंतप्रधान आहेत. त्या देशाच्या 46 व्या आणि तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. 8 डिसेंबर 2019 रोजी वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मरिन या पंतप्रधान बनणाऱ्या देशातील सर्वात तरुण व्यक्ती आणि जगातील दुसरी सर्वात तरुण नेत्या आहेत. 2015 पासून त्या फिनलंड संसदेच्या सदस्या आहेत.

युक्रेनमध्येही  युवा नेतृत्वाला देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. वकील ओलेक्सी होनचारुक ऑगस्ट 2019 मध्ये देशाचे पंतप्रधान झाले. 7 जुलै 1984 रोजी जन्मलेले ओलेक्सी होनचारुक 29 ऑगस्ट 2014 रोजी वयाच्या 35 व्या वर्षी देशाचे राष्ट्रपती झाले. तथापि, त्यांना हे पद जास्त काळ टिकवता आले नाही आणि मार्च 2020 मध्ये त्यांनी हे पद सोडले. होनचारुकच्या आधी, व्लादिमीर झेलेन्स्की स्वतः अध्यक्ष होते, वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी हे पद स्वीकारले.

साल्वाडोरमधील पुराणमतवादी व्यापारी नायब बुकेले यांनी जून 2019 मध्ये वयाच्या 37 व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ते एक अतिशय लोकप्रिय सहस्राब्दी राजकारणी आणि व्यापारी आहेत. विशेष म्हणजे त्यांचे वडील मुस्लिम आहेत तर आणि ख्रिश्चन आई आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या धार्मिक श्रद्धा वादग्रस्त राहील्या होत्या. 24 जुलै 1981 रोजी जन्मलेले बुकेले हे देशाचे 43 वे राष्ट्रपती आहेत.

अंडोरामध्ये, माजी न्यायमंत्री झेवियर एस्पॉट झामोरा हे 16 मे 2019 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी फ्रान्स आणि स्पेनमधील छोट्या देशाचे सरकार प्रमुख झाले. 30 ऑक्टोबर 1979 रोजी जन्मलेले जामोरा हे देशाचे सातवे पंतप्रधान आहेत.

कार्लोस अल्वाराडो, लेखक, पत्रकार आणि कोस्टा रिका मधील माजी कामगार मंत्री, यांनी 8 मे 2018 रोजी वयाच्या 38 व्या वर्षी पदभार स्वीकारला. ते देशाचे 48 वे राष्ट्रपती आहेत. अल्फ्रेडो गोन्झालेझ फ्लोरेस 1914 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष बनण्यापूर्वी ते देशातील दुसरे सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत.

जेसिका आर्डर्न या न्यूझीलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत, आणि जेव्हा त्या देशाच्या पंतप्रधान झाल्या तेव्हा त्या 37 वर्षांच्या होत्या. 26 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 26 जुलै 1980 रोजी जन्मलेली जेसिका आर्डर्न ही जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या नेत्यांपैकी एक आहे आणि 2008 मध्ये ती पहिल्यांदाच खासदार बनली होती. त्या देशाच्या 40 व्या पंतप्रधान आहेत. वयाच्या 37 व्या वर्षी पंतप्रधान बनणाऱ्या त्या जगातील दुसऱ्या सर्वात तरुण नेत्या आहेत.

भारतीय वंशाचे लिओ वराडकर  हे वयाच्या 38 व्या वर्षी जून 2017 मध्ये आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले. लिओचे वडील, डॉ. अशोक वराडकर, 1960 च्या दशकात महाराष्ट्रमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराड गावातून युनायटेड किंग्डममध्ये स्थलांतरित झाले. पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी आरोग्य आणि पर्यटनासह अनेक मंत्रालये सांभाळली आहेत.

फ्रान्समध्ये, वयाच्या 39 व्या वर्षी, गुंतवणूक बँकर इमॅन्युएल मॅक्रॉन हे 14 मे 2017 रोजी देशाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. मॅक्रॉनने ब्रिजिट ट्रोग्नेक्सशी लग्न केले आहे. जे एमियन्समधील ला प्रॉव्हिडन्स हायस्कूलमध्ये शिक्षक घेतले.

एस्टोनियामध्ये, जुरी रातास 23 नोव्हेंबर 2016 रोजी वयाच्या 38 व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले. 2014 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी त्यांनी तवी रोईवास यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. जोसेफ मस्कट यांनी मार्च 2013 मध्ये वयाच्या 39 व्या वर्षी माल्टाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला. 22 जानेवारी 1974 रोजी जन्मलेल्या जोसेफ यांनी 11 मार्च 2013 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी या पदाची सूत्रे हाती घेतली. ते देशाचे 13 वे पंतप्रधान होते.

नाशिकचा फ्लॉवर पार्क


मोगल साम्राज्याच्या काळात इ.स. 1487 मध्ये नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून गुलशनाबाद नावाने जगप्रसिद्ध होते. येथे गुलाबाची मोठ्या प्रमाणावर शेती व्हायची. येथील वातावरणही फुलांच्या वाढीसाठी, त्यांच्या फुलण्यासाठी पोषक होते. इंग्रजही याचमुळे या शहराच्या प्रेमात पडले होते. त्याचमुळे इथे मुंबई, ठाण्यानंतर देवळाली कॅम्पपर्यंत रेल्वेची सुविधा त्यांनी उभारली होती. नाशिकमध्ये फुलणारी फुले ब्रिटिश स्वातंत्र्यानंतर ब्रिटनमध्ये परतताना ते सोबत घेऊन गेले. पण आपल्याकडून ती जवळजवळ नामशेष झाली. दुसरीकडे दुबईसारख्या वाळवंटात मिरॅकल गार्डनसारखे अप्रतिम फुलांचे गार्डन बहरवले जाऊ शकते तर आपल्या नाशिकमध्ये का नाही? याच विचारातून नाशिक फ्लॉवर पार्कची उभारणी  करण्यात आली. 

नाशिक येथील उद्योजक शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून त्र्यंबकेश्वर रोडवर अंजनेरीजवळ आठ एकर क्षेत्रावर नाशिक फ्लॉवर पार्क साकारण्यात आले आहे. येथील अनुकूल हवामान या फुलांसाठी फायदेशीर ठरले आहे.  जागतिक स्तरावर दुबई येथील मिरकल गार्डनच्या धर्तीवर नाशिक फ्लॉवर पार्क साकारण्यात आले आहे. कल्पकता, संशोधन व स्थानिक मनुष्यबळाचा वापर करून हे उद्यान साकारले आहे.  सामूहिक कल्पकतेतून टाकाऊ घटकांचा अधिक वापर करून येथे सुशोभीकरण करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या उद्यानात पिटोनिया, झेनिया, डायनथस, पॅन्सि, एरेंथियम, कोलिअस, वडेलिया, लेडीबर्ड कॉसमस आदी फुलझाडांची आकर्षक लागवड करण्यात आली आहे. गुलाब, झेंडू, सूर्यफूल, कमळ, बोगनवेल या फुलांचाही या पार्कमध्ये समावेश आहे. या फुलांचा व विविध वेलींचा वापर करून मोर, हत्ती, शहामृग, शेतकरी आदी प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या पार्कमध्ये 128 प्रकारची विविध फुले आहेत. फ्लॉवर पार्कमध्ये लाल माती, कोकोपीट व खतांच्या मिश्रणाचा वापर करून विशिष्ट आकाराच्या कुंड्यांमध्ये रोपांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानात संपूर्णपणे सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यात आला आहे. सलग सहा महिने 40 ते 50 लाख फुलांचा बहर पाहायला मिळतो. 

विविध जातींच्या, रंगांच्या शोभिवंत फुलझाडांची या पार्कमध्ये मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये पिटोनियाची 20 रंगांची रोपे, झेनियाची ९ रंगांची तर डायनथसच्या 80 रंगांच्या रोपांचा समावेश आहे. या झाडांचे जीवनमान 5 महिन्यांचे असल्याने फ्लॉवर पार्कमध्ये ही फुलझाडे मार्चपर्यंत पाहायला मिळणार आहे.विस्तीर्ण पार्कमध्ये सहकुटुंब भ्रमंतीचा आनंद घेता यावा  म्हणून 'किड्स एरिना' ची निर्मिती करण्यात आली आहे. येथे मुलांसाठी 20 ते 25 खेळांची व्यवस्था केली गेली आहे.

गोड्या पाण्यातील देशविदेशातील माशांचा 'अॅक्वेरियम' तयार करण्यात आला आहे.60 मोठ्या टॅकमध्ये माशांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. प्रत्येक प्रजातीचा मासा काय खातो, कसा जगतो आदी रोचक माहिती मिळते. पार्कमध्ये छोटेखानी 'बर्ड पार्क'देखील आहे. मोठ्या संख्येने लव्ह बर्ड, अमेरिकन कबुतर, चीनच्या कोंबड्या असे अनेक पक्षी येथे भेटतात. मुख्य आकर्षण ठरते तो ब्राझिलचा 'इग्वाना' म्हणजे सरड्यासारखा दिसणारा प्राणी. साडेपाच फुटाचा इग्वाना केवळ साडेचार वर्षाचा आहे. धष्टपुष्ट इग्वाना 100 टक्के शाकाहारी असून तो भाजीपाला खातो. अॅडव्हेंचर पार्क', 'रोप वे'चा आनंद घेता येतो. निसर्गरम्य वातावरणात नाशिक फ्लॉवर पार्कमध्ये सुखद वास्तव्याची सुविधाही उपलब्ध आहे. लेह, लडाखच्या धर्तीवर पार्कमध्ये 25 वातानुकूलित तंबू (टेन्ट) उभारण्यात आले आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Tuesday 21 December 2021

धुळ्यातील शिक्षकाने बनवल्या नारळाच्या करवंटीपासून भन्नाट वस्तू


नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' म्हणतात. या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. असे असतानाही खोबरे खाऊन झाल्यानंतर बहुतेक जण कसलाही विचार न करता करवंटी फेकून देतात. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे जिल्हा परिषद शाळेतील सुनील मोरे या शिक्षकाने मात्र टाकाऊ करवंटीपासून हजारो शोभिवंत वस्तू तयार केल्या आहेत. नोकरी सांभाळून गेली अनेक वर्षे ते आपला छंद जोपासत आहेत. विशेष म्हणजे कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आजवर शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी याचे विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराचा मार्गदेखील उपलब्ध करून दिला आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात केवळ नोकरी, व्यवसायापुरती बांधीलकी न ठेवता पर्यावरणासाठीदेखील काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने सुनील यांनी टाकाऊ करवंटीपासून शोभिवंत वस्तू बनवायला सुरुवात केली.

कामानिमित्त कोकणात असताना डिसेंबर २००८ मध्ये त्यांना पर्यटनासाठी सिंधुदुर्गात जाण्याचा योग आला. समुद्रकिनारी असलेल्या एका स्टॉलवर शहाळ्यापासून तयार केलेल्या माकड, घुबड अशा प्रतिकृतींनी त्यांचे लक्ष वेधले. त्या प्रतिकृती न्याहाळताना आपल्यालादेखील असे काही करता येईल का? असा विचार त्यांच्या मनात डोकावला. त्यानंतर कोणत्याही प्रशिक्षण, मार्गदर्शनाशिवाय केवळ जिद्द, चिकाटी आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी करवंटीपासून शोभिवंत बनवायला सुरुवात केली.

घरातच साकारले कलादालन

सुनील मोरे यांनी आजवर करवंटीपासून मासे, नारळाचे झाड, फुले, दागिने, शोपीस, फुलपाखरे, स्मृतिचिन्ह, सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती, गणपती, पक्ष्यांची घरटी, मोबाईल स्टॅड, ढोलकी अशा बऱ्याच वस्तू तसेच कासवाच्या शंभर प्रतिकृती तयार केल्या आहेत. एक कलाकृती बनवण्यासाठी त्यांना २ ते ४ तास लागतात. करवंटीला आकार देण्यासाठी ते हॅकसा ब्लेड, पॉलिश पेपर, एमसील आदी साहित्याचा वापर करतात. घरातच त्यांनी कलादालन उभारले आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाची दखल घेऊन आजवर त्यांना मोठमोठ्या व्यासपीठावर पुरस्कृत केले आहेत. याशिवाय 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' आणि 'ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड'नेदेखील दखल घेतली आहे.

मोरे सांगतात की,देवाला नारळ अर्पण करतात. मात्र त्याचा वापर झाल्यावर करवंटी फेकून दिली जाते. या करवंट्या शेवटी उकिरड्यावर, गटारीत पडलेल्या आढळतात. त्यामुळे गटारी तुंबतात तर कधी रोगजंतू त्यावर अंडी घालतात. याच कारणामुळे टाकाऊ करवंटीपासून मी क्रिएटिव्ह वस्तू बनवायला सुरुवात केली.