प्रश्न 1.सांगा पाहू.
1)भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे.
उत्तर- कुशाण
2)कनिष्काने काश्मीरमध्ये बसवलेले शहर.
उत्तर-कनिष्कपूर
3)वीणावादनात प्रवीण असलेला राजा.
उत्तर- समुद्रगुप्त
4)कामरूप म्हणजेच.
उत्तर- प्राग्ज्योतिष . प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर
प्रश्न 2.चर्चा करा व लिहा
1.सम्राट कनिष्क
उत्तर-कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसी पर्यंत पसरले होते. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने कनिष्कपूर हे शहर वसवले होते.कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. कनिष्काने सोन्याचे नाणे पाडले होते.
2) मेहरौली येथील लोहस्तंभ.
उत्तर- दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे दीड हजार वर्षांहून अधिक जुना आहे. तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे ते एक प्रतीक आहे. हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळातील आहे.
प्रश्न 3.चीनच्या बौद्ध भिक्खू युआन श्वांग याने महाराष्ट्रातील लोकांविषयी कोणते गौरवपूर्व उद्गार काढले आहेत?
उत्तर-"महाराष्ट्रातील लोक मानी आहेत.कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात,पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करीत नाहीत. संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते मदत करतात. शरण आल्यास ते अपाय करीत नाहीत."
प्रश्न 4.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.कोणत्या राजांना 'इंडो-ग्रीक राजे' असे म्हटले जाते.
उत्तर- भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्ये होती.त्या राजांना'इंडो-ग्रीक राजे' असे म्हटले जाते.
2.इंडो-ग्रीक राजांमध्ये कोणता राजा प्रसिद्ध होता?
उत्तर- मिनंडर राजा हा इंडो -ग्रीक राजांमध्ये प्रसिद्ध होता.
3.दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळात कोणता भिक्खू चीनमधून भारतात आला होता?
उत्तर- दुसऱ्या चंद्रगुप्तांच्या काळात फाहियान हा भिक्खू चीनमधून भारतात आला होता.
4.हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने कोणता ग्रंथ लिहिला होता?
उत्तर- हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने 'हर्षचरित' हा हर्षावर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला होता.
No comments:
Post a Comment