1.भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते?
उत्तर- भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
2.भारतीय संविधानाने कोणते तत्त्व स्वीकारले आहे?
उत्तर- भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे?
3.दक्षिण भारतात कोणत्या भक्ती चळवळी उदयास आल्या?
उत्तर- दक्षिण भारतात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या.
4.दक्षिण भारतात कोणी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला?
उत्तर- दक्षिण भारतात रामानुज यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला?
5.उत्तर भारतात कोणत्या संताने भक्तीचे महत्त्व सांगितले?
उत्तर- उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले.
6.भक्ती चळवळीतील एक विख्यात संत कोण?
उत्तर- संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत.
7.सर्व मानव एक आहेत, अशी शिकवण कोणत्या संताने दिली?
उत्तर- सर्व मानव एक आहेत, अशी शिकवण संत कबीर यांनी दिली.
8.बंगालमध्ये कोणत्या संताने कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले?
उत्तर- बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले?
9.आसाममध्ये कृष्णा भक्तीचा प्रसार कोणी केला?
उत्तर- आसाममध्ये संत शंकरदेव यांनी कृष्णभक्तीचा प्रसार केला.
10. गुजरातमध्ये कोणते प्रसिध्द वैष्णव संत होऊन गेले?
उत्तर-गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिध्द वैष्णव संत होऊन गेले.
11.संत मीराबाईंनी कोणाचा महिमा सांगितला?
उत्तर- संत मीराबाईंनी कृष्णभक्तीचा महिमा सांगितला.
12.राजघराण्यातील सुखांचा त्याग करून कृष्णभक्तीत तल्लीन झालेल्या संत कोणत्या?
उत्तर- राजघराण्यातील सुखांचा त्याग करून कृष्णभक्तीत तल्लीन झालेल्या संत मीराबाई होत.
13.मीराबाई यांची भक्तिगीते कोणकोणता संदेश देणारी आहेत?
उत्तर- मीराबाई यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत.
14. संत रोहिदास यांनी कोणता संदेश दिला?
उत्तर-संत रोहिदास यांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला.
15.हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले?
उत्तर- हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सुरसागर हे काव्य लिहिले.
16. कोणी लिहिलेली कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत?
उत्तर- मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत.
17. संत तुलसीदासांच्या कोणत्या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो?
उत्तर- संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो.
18. कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी कोणत्या विचारधारेचा प्रसार केला?
उत्तर- कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला.
19.संत बसवेश्वर यांचे कोणते वचन प्रसिद्ध आहे?
उत्तर- संत बसवेश्वर यांचे 'कायकवे कैलास' हे वचन प्रसिद्ध आहे?
20.तेराव्या शतकात चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात कोणता पंथ प्रवर्तित केला?
उत्तर-तेराव्या शतकात चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात 'महानुभाव' पंथ प्रवर्तित केला?
21.चक्रधरस्वामी यांचे गुरू कोण?
उत्तर- श्रीगोविंदप्रभू हे चक्रधरस्वामी यांचे गुरू होत.
22.महानुभाव पंथाचा प्रसार प्रामुख्याने कोणत्या भागात झाला?
उत्तर-महानुभाव पंथाचा प्रसार प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला.
23.म्हाइंभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लिळांचे वर्णन करणारा ग्रंथ कोणता?
उत्तर-म्हाइंभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लिळांचे वर्णन करणारा ग्रंथ लीळाचरित्र.
24.शीख धर्माचे संस्थापक आणि पाहिले गुरू कोण?
उत्तर-शीख धर्माचे संस्थापक आणि पाहिले गुरू गुरुनानक होत.
25.गुरुनानक यांची शिकवण कोणती होती?
उत्तर- सर्वांशी सारखेपणाने वागावे,अशी गुरुनानक यांची शिकवण होती.
26.शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता?
उत्तर- 'गुरुग्रंथसाहिब' हा शिखांचा पवित्र ग्रंथ होय.
27.गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथामध्ये कोणकोणत्या संतांच्या रचनांचा समावेश आहे?
उत्तर-गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथामध्ये गुरुनानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे.
28.शिखांचे दहावे गुरू कोण?
उत्तर- गुरू गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरू होत.
29.परमेश्वर प्रेममय आहे.प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहचता येते अशी कोणत्या साधूंची श्रद्धा होती?
उत्तर-परमेश्वर प्रेममय आहे.प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती.
30.भारतीय संगीतात कोणत्या संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे?
उत्तर-भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे?
(इयत्ता सहावी आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त: इयत्ता सहावी इतिहास व नागरिकशास्त्र-3 धार्मिक समन्वय पाठ)