Wednesday 11 October 2023

काही परिचित इंग्रजी शब्द

 basket ( बास्किट) - टोपली.

 on the terrace (टेरेस ) — गच्चीवर. 

cupboard ( कबर्ड) — कपाट. 

banyan trees ( बन्यन्‌ ट्रीझ) - वडाची झाडे. behind ( बिहाइण्ड्‌ ) --च्या मागे. 

dictionary ( डिक्शनरि ) - शब्दकोश. 

ring (रिंग) - अंगठी. 

on his finger - (फिंगर)- त्याच्या बोटात. 

pot ( पॉट्‌ ) - भांडे. 

fridge ( फ्रिज ) - शीतकपाट, फ्रिज. 

oil ( ऑइल्‌ ) - तेल. 

 tin ( टिन) - डबा. 

stranger (स्ट्रॅंजर) -परका इसम, नवखा इसम. 

at the door — दाराशी. 

upper ( अप्पर ) - वरचा. 

drawer ( ड्रॉअर्‌) - खण. कप्पा

in the upper drawer — वरच्ण खणात. 

coin ( कॉइन्‌ ) -नाणे. 

stream ( स्ट्रीम) - ओढा. 

near the village -खेड्याजवळ. गावाजवळ

honey ( हनी ) - मध. 

bottle ( बॉटल ) — बाटली. 

stable ( स्टेबल्‌ ) - तबेला. 

workshop ( वर्कशॉपू ) - कारखाना. 

tent (टेण्ट्‌ ) -तंबू. 

field ( फील्ड ) - शेत. 

Peg ( पेग्‌ ) - खुंटी. 

hexagon ( हेक्‍सॅगॉन्‌ ) - षट्कोन 

ant (अँण्ट्‌ ) -मुंगी. 

ant ( अँण्ट्‌ हिल्‌ ) - वारूळ. 

video - व्हिडिओ. 

frinds( फ्रेण्ड्स हाउस) - मित्राचे घर. 

ornament ( ऑर्नमेण्ट) - दागिना. 

gold ornament (गोल्ड ऑर्नमेण्ट्स्‌ ) - सोन्याचे दागिने. 


Saturday 13 May 2023

चालू घडामोडी 13 मे 2023

1. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या हेरिटेज सेंटरचे उद्घाटन कोठे केले आहे?

 (a) दिल्ली (b) मुंबई (c) कोलकाता (d) चंदीगड

2. IPL च्या इतिहासात 7,000 धावा करणारा पहिला क्रिकेटर कोण आहे?

 (A) विराट कोहली (B) डेव्हिड वॉर्नर (C) शिखर धवन (D) रोहित शर्मा

3. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी कोणत्या शहरात पंतप्रधान जनऔषधी केंद्राचे उद्घाटन केले?

 (A) लखनौ (B) भोपाळ (C) पाटणा (D) सिकंदराबाद

4.  ड्वेन ब्राव्होसह आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे?

 (A) रवींद्र जडेजा (B) सुनील नरेन (C) पियुष चावला (D) युझवेंद्र चहल

५.  पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने राष्ट्रीय विक्रम केला आहे?

 (A) मुरली श्रीशंकर (B) नयना जेम्स (C) प्रवीण चित्रवेल (D) शैली सिंग

उत्तर- 1. D 2. A 3. D 4. D 5. C

Thursday 11 May 2023

व्हेलची उलटी हिऱ्यापेक्षा मौल्यवान

व्हेल प्रजातीचे अनेक मासे समुद्रात आढळत असले तरीही ‘स्पर्म’ व्हेलच्या उलटीला परफ्युम उद्योगात अतिशय महत्त्व असून तिला भरमसाठ दर मिळून कोट्यवधीची कमाई मिळते. परफ्युमचा वास दीर्घकाळ दरवळत राहण्यासाठी नैसर्गिक तत्त्व म्हणून ती वापरतात. त्याचा आरोग्यावर विघातक परिणाम होत नसल्याने या उलटीचा वापर केलेल्या अत्तरांना दर अधिक मिळतो. यामुळे जिथे व्हेल मासा दिसतो, तिथे मच्छीमारांची नजर या उलटीवर असते. मत्स्यक्षेत्रातील अभ्यासकांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतात इतर किनारपट्टीप्रमाणे कोकण किनारपट्टीवर काही काळापासून व्हेल मासा आढळत आहे. व्हेल माशामध्ये दात नसलेले आणि दात असलेले अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत. उलटी उपयुक्त असलेला ‘स्पर्म व्हेल’ हा दात असलेल्या प्रजातीतील आहे. साधारणत: व्हेल हा समुद्र किनार्‍यापासून खूप दूर असतो. उलटीसारखा हा भाग किनार्‍यावर येण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागतो. याचे वजन 50 किलोपर्यंत असते असे अभ्यासकांचे मत आहे. स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारखे किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते. स्पर्म व्हेल संरक्षित घटक खोल समुद्रात सापडणारा ‘स्पर्म’ व्हेल हा संरक्षित घटक आहे. हा मासा सीआयटीइएस (Convention on International Trade in Endangered Species of Wild Fauna and Flora) यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे स्पर्म व्हेलची शिकार किंवा त्यांच्याशी निगडीत कोणत्याही घटकाची विक्री करण्यास बंदी आहे.  व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो. शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अ‍ॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचत नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते. या उलटीची तस्करी केली जात आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Saturday 18 February 2023

महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली?

 प्रश्न 1: महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली?

उत्तर- महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी 18 फेब्रुवारी 2023 रोजी शपथ घेतली. 

प्रश्न 2: जीएसटी परिषदेने राज्यांना किती रुपयांची थकीत नुकसानभरपाई देण्यास मान्यता दिली? 

उत्तर- राज्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी जून 2022 पर्यंतची थकीत नुकसानभरपाई 16 हजार 982 कोटी  रुपये देण्यास मान्यता दिली.

प्रश्न 3: द्राक्ष उन्हाळ्यातील सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.

उत्तर- द्राक्ष खाल्ल्यामुळे शरीरात गारवा व शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी चांगली मदत होते. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी द्राक्ष फायदेशीर आहेत. म्हणून द्राक्ष उन्हाळ्यातील सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.

प्रश्न 4: द्राक्षदिन कोनात्यादिवशी मानण्यात येतो? 

उत्तर- महाशिवरात्री दिवशी 2023 पासून द्राक्षदिन साजरा करण्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ठरवले आहे. 

प्रश्न 5: हुतात्मा उद्योग समूहाच्यावतीने देण्यात येणारा अरुण नायकवडी स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर- हुतात्मा उद्योग समूहाच्यावतीने देण्यात येणारा अरुण नायकवडी स्मृती पुरस्कार बीजमाता राहीबाई पोपरे यांना जाहीर झाला आहे?

प्रश्न 7: कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी किती चित्ते दाखल झाले आहेत?

उत्तर- दक्षिण आफ्रिकेतून आणखी बारा चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले आहेत. आता एकूण वीस चित्ते भारतात आहेत. 

प्रश्न 8: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूला आपल्या संघाचा कर्णधार केले आहे?

उत्तर-भारतीय क्रिकेट संघाची सलामीची आक्रमक फलंदाज स्मृती मानधना हिला महिलांच्या आयपीएल स्पर्धमधील संघ असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (आरसीबी) कर्णधारपदावर नियुक्‍त केले आहे. महिलांच्या आयपीएलचे हे पहिलेच वर्ष आहे. स्मृतीला बंगळूरच्या संघाने ३.४० कोटी रुपये खर्च करून, आपल्या संघात घेतले आहे. त्यामुळे ती महिलांच्या आयपीएलमधील सर्वांत महागडी खेळाडू ठरली आहे. 

प्रश्न 9: नाशिकमध्ये किती उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे?

उत्तर-  नाशिकमधील अशोकस्तंभ चौक परिसरात ६१ फूट उंच, २२ फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे.  

प्रश्न 10: अमूल या १९४६ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दूध सहकारी संस्थेची सत्ता हस्तगत करण्यात कोणत्या पक्षाला यश आले आहे? 

उत्तर- अमूल या १९४६ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दूध सहकारी संस्थेची सत्ता हस्तगत करण्यात भाजपला यश आले आहे. अमूलच्या संचालक मंडळात ११ पैकी नऊ संचालक काँग्रेसचे होते. |त्यापैकी सात जणांनी वेगवेगळ्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसने ' अमूल' ची सत्ता गमावली ' आहे. गुजरातमध्ये १८ दूध सहकारी संस्था आहेत. त्यापैकी केवळ अमूलमध्ये आता काँग्रेसचे दोन  सदस्य उरले आहेत. 




बँकांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणत्या त्रिसूत्रीचा वापर महत्त्वाचा आहे?

 प्रश्न 1: बँकांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी कोणत्या त्रिसूत्रीचा वापर महत्त्वाचा आहे? 

उत्तर- डिटेक्शन (शोध) , प्रिव्हेन्शन (प्रतिबंध) आणि प्रोटेक्शन (सुरक्षा) या त्रिसूत्रीचा वापर केल्यास बँकांवर होणारे सायबर हल्ले रोखता येतील. कोरोनाकाळात कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. अनेकांनी टेक्नॉंलॉजी स्वीकारली आहे. सहकार, बँका अशा विविध क्षेत्रांत टेक्नॉंलॉजीचा वापर वाढला आहे. ही एक डिजिटल क्रांतीच आहे. डिजिटल बँकिंग काळाची गरज आहे. पण, टेक्नॉलोंजी हाताळताना चुका झाल्यास सायबर क्राइम होऊ शकते. काही क्षणात कोट्यवधी रुपये काढल्याच्या घटना घडल्या आहेत. असे सायबर हल्ले देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहेत. ते टाळण्यासाठी सायबर सुरक्षेवर भर द्यायला हवा. टेक्नॉलॉजी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण द्यायला हवे. काही बँका स्वतः टेक्नॉंलॉजी विकसित करून वापरतात. पण, काही बँका बाहेरची यंत्रणा वापरतात. ती वापरताना आंतरिक सुरक्षेचा विचार करायला हवा. त्यासाठी डिटेक्शन (शोध), प्रिव्हेन्शन (प्रतिबंध) आणि प्रोटेक्शन (सुरक्षा) या त्रिसूत्रीचा वापर करायला  हवा. रिझर्व्ह बँकेकडून सायबर सुरक्षेबाबत सर्व बँकांना माहिती दिली जात आहे. मात्र, सायबर सुरक्षेबाबत काळजी घेतली जात नाही. शिवाय, टेक्नॉंलॉजी हाताळण्याची पुरेशी माहिती नसल्याने बँका सायबर अटॅकला बळी पडतात. असा सायबर अटॅक ओळखता आला पाहिजे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. टेक्नॉलॉजी वापरताना सुरक्षेचे ज्ञान घेतल्यास सायबर हल्ले टाळता येतील.

शस्त्रकलेच्या प्रशिक्षणातून वारसा जतन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन शस्त्रकलेचा वसा पवन माळवे जपत आहेत. या कामात त्यांची पत्नी कोमल याचाही सहभाग असतो. नाशिकमधील सिडकोतील छत्रपती संभाजी स्टेडिअममध्ये दोघे विद्यार्थांना शस्त्रकलेचे प्रशिक्षण देतात. काही दशकांपूर्वी मर्दानी खेळाच्या रूपाने ही कला पाहायला मिळत होती. मात्र अलीकडे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पवन यांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. या वर्गात तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी आदींचे प्रशिक्षण दिले जाते. सहा ते चाळीस वर्षे वयोगटातील महिला, पुरुष सहभागी होतात. दररोज सकाळी ७ते ८ या वेळेत हे प्रशिक्षण चालते. प्रशिक्षणात युद्धकला, शस्त्र याचा इतिहास, शस्त्र वापरायचे तंत्र , ते कोणत्या धातूनी बनवले जाते आदींची माहिती दिली जाते. 

प्रशिक्षणात सर्वप्रथम सर्व शास्त्रांचे मूळ असणाऱ्या काठीचे प्रशिक्षण दिले जाते. काठीमध्ये पारंगत झाल्यावर प्रशिक्षणार्थींना धार नसलेल्या तलवारी, दांडपट्टा , काठी बंदिश, रुमाल बंदिश आदी शिकवले जाते. जाते. पुण्याचे 'फाईट मास्टर' नितीन शेलार यांच्याकडून पवन यांनी दहा वर्षांपूर्वी युद्धकलेचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून आजपर्यत तेविद्यार्थांना ही कला शिकवतात. राष्ट्रवीर संघ युद्धकला प्रशिक्षण व संस्कृती संवर्धन ही त्यांची संस्था आहे. कोमल या मुली आणि महिलांना प्रशिक्षण देतात. सात ते पन्नास वर्षे वयोगटातील चाळीस जण त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतात. पवन हा पर्यटन विभागाचा अधिकृत गाइड आहे. पर्यटकांना नाशिकमधील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे, लेणी दाखवतात. 'ट्रेकिंग ग्रुपला गड-किल्ल्यांचा इतिहास सांगून किल्ला कसा बघावा हे ते सांगतात. त्यांनी मोडी लिपीचे पायाभूत शिक्षण घेतले. 


तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात AI, सायबर सुरक्षेत भरपूर संधी

क्लाउड कॉम्प्युटिंग हा सर्वात लोकप्रिय आणि मागणी करणारा कोर्स आहे.  संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी या क्षेत्रात सहज करिअर करू शकतात. एक्सपर्ट सॉफ्टवेअर आर्किटेक्ट इत्यादी पदावर काम करू शकतात.

सायबर सुरक्षा
सायबर सिक्युरिटी किंवा सायबर सेफ्टी हा एक प्रकारचा सुरक्षितता आहे जो इंटरनेट कनेक्टेड सिस्टमसाठी सुरक्षा आहे. यासह हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा डेटा सुरक्षित ठेवला जातो जेणेकरून डेटा चोरीला जाऊ नये.  यासाठी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक.  तुम्ही फॉरेन्सिकमध्ये स्पेशलायझेशन करू शकता.

नॅनो तंत्रज्ञान
हे एक अतिशय मनोरंजक क्षेत्र आहे.  हे असे एक उपयोजित विज्ञान आहे ज्यामध्ये 100 नॅनोमीटरपेक्षा लहान कणांवर संशोधन केले जाऊ शकते. विशेष बाब म्हणजे हा कोर्स केल्यानंतर उत्पादन विकास (प्रोडक्ट डेवलपमेंट), अनुवांशिक (जेनेटिक), कृषी तंत्रज्ञान (एग्रीकल्चर टेक्नोलॉजी), फॉरेन्सिक सायन्स, आरोग्य उद्योग (हेल्थ इंडस्ट्री) इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस)
यामध्ये अशी मशीन्स तयार करावी लागतात जी माणसांप्रमाणे काम करतात. विशेष बाब म्हणजे ही यंत्रे उच्चार ओळखणे (स्पीच रिकॉग्निशन), शिकणे (लर्निंग ) आणि समस्या सोडवणे (प्रॉब्लम सॉल्विंग) यासारख्या गोष्टीही करतात. त्यासाठी गणित (मॅथेमेटिक्स), मानसशास्त्र (सायकोलॉजी) आणि भौतिकशास्त्र (फिजिक्स) किंवा जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांचे बारकावे जाणून घ्यावे लागतील.  प्रोग्रामिंग भाषा देखील शिकणे आवश्यक आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल लोक डॉक्टर, सीए किंवा वकील याशिवाय इतर नोकऱ्यांना प्राधान्य देतात, जे सर्जनशील असण्यासोबतच भरपूर कमाई देखील करतात. तंत्रज्ञानाचे क्षेत्र या बाबतीत प्रसिद्ध तसेच आकर्षक आहे. यामध्ये करिअर आणि पैसा दोन्हीही भरपूर आहे. सॉफ्टवेअर आर्किटेक्ट व्यतिरिक्त अॅनालिटिक्स मॅनेजर, डेटा सायंटिस्ट, क्वालिटी मॅनेजर, कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनीअर, सिक्युरिटी अॅनालिसिस, प्रोजेक्ट मॅनेजर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादी अनेक पदांवर काम करण्याची संधी आहे.

न्यूझीलंडचा नवा कायदा धूम्रपानमुक्त करण्यासाठी

बहुतांश स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडीशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात.  जाणून घ्या, असेच शब्द जे चर्चेत आहेत आणि परीक्षेत विचारले जाऊ शकतात…

वर्ल्ड फर्स्ट टोबैको लॉ
न्यूझीलंड सरकारने नवीन पिढीमध्ये धूम्रपान रोखण्याच्या उद्देशाने आपल्या देशात नवीन तंबाखू कायदा आणला आहे.हा नवा कायदा २०२३ मध्ये लागू होणार आहे.  पुढील पिढीसाठी धूम्रपान बेकायदेशीर ठरवणारा हा जगातील पहिला कायदा आहे.  न्यूझीलंड सरकारने 2025 पर्यंत देशाला धूम्रपानमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कार्बन न्यूट्रल ड्रोन
भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन स्टार्टअप गरुड एरोस्पेसने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर पहिले कार्बन न्यूट्रल ड्रोन लॉन्च केले आहे.या ड्रोनच्या प्रक्षेपणामुळे भारताचे नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल.  येत्या 15 महिन्यांत 25 हजारांहून अधिक ड्रोन तयार केले जातील जे कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणतील.

गुगल बार्ड
Google ने अलीकडेच ChatGPT शी स्पर्धा करण्यासाठी Google Bard नावाचा एक कृत्रिम बुद्धिमत्ता समर्थित चॅटबॉट लॉन्च केला आहे.Google चा हा बार्ड LaMDA भाषेच्या बोर्डवर आधारित आहे.  गुगलच्या चॅटजीपीटी आणि बार्डमधील मुख्य फरक म्हणजे बार्डमध्ये रिअल टाईममध्ये वेब सर्फ करण्याची क्षमता आहे आणि माणसाप्रमाणे प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

Friday 17 February 2023

चालू घडामोडी 2

1. सौदी अरेबियातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे, जी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेत सहभागी आहे?

(A) जेसिका मीर (B) रायना बर्नावी (C) नौरा अल मात्रोश (D) जास्मिन मोघबेली

2. अलीकडेच जानेवारी महिन्याचा ICC मेंस प्लेयर ऑफ द मंथ (पुरूष खेळाडूचा मंथ)  पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) शुभमन गिल (B) मोहम्मद सिराज (C) डेव्हॉन कॉनवे (D) विराट कोहली

3. अलीकडेच सायप्रसचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
(a) डेमेट्रिस सिलोरिस (b) अॅनिता डेमेट्रिओ (c) अदामोस अदामौ (d) निकोस क्रिस्टोडॉलिड्स

4. '‘स्वस्थ मन, स्वस्थ घर’ हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?
(A) आयुष मंत्रालय (B) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (C) शिक्षण मंत्रालय (D) गृह मंत्रालय

उत्तर- 1(b) 2(a) 3(d) 4(d)

एकाच वेळी प्रदर्शित झालेल्या 'लगान' आणि 'गदर' या आयकॉनिक चित्रपटांमध्ये बाजी मारली कोणी?

15 जून 2001 रोजी गदर रिलीज झाला.  पण तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी आणखी एक मोठा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धडकला होता. तो म्हणजे आमिर खानचा 'लगान' चित्रपट.  बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट आले आहेत ज्यांनी इतिहास रचला आहे. त्यापैकीच एक सनी देओलचा 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट होता. यामध्ये सनीसोबत अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होती.  आता या सिनेमाचा सिक्वेल 'गदर 2' बनवला जात आहे. सनी आणि अमिषा पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटासोबत अमिरखानचा 'लगान'देखील प्रदर्शित झाला होता. आशुतोष गोवारीकर यांचा 'लगान' हा स्पोर्ट्स ड्रामा होता.  या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.  पण आता प्रश्न असा आहे की त्या काळात या दोन चित्रपटांपैकी कोणत्या चित्रपटाने बाजी मारली होती.

वास्तविक हे दोन्हीही चित्रपट 2001 मध्ये सुपरहिट ठरले होते. दोघांनाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.  'गदर' 19 कोटींच्या बजेटमध्ये तर 'लगान' 25 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. दोन्ही चित्रपट अभूतपूर्व होते, पण एका गोष्टीबाबतीत 'लगान' सनीच्या 'गदर' चित्रपटापेक्षा मागे राहिला. ते म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन.  1994 च्या 'हम आपके है कौन' नंतर अनिल शर्माच्या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला. अहवालांनुसार  'लगान'चे एकूण कलेक्शन 65.97 कोटी इतके आहे.  तर 'गदर'चे कलेक्शन 133 कोटी इतके आहे. गदर त्या वर्षीचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. दुसरीकडे, आमिर खानचा चित्रपट पुरस्कारांच्या बाबतीत मात्र गदरपेक्षा सरस ठरला. लगानला 49 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आठ श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले.  याशिवाय 'बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म' या श्रेणीत अकादमी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.

Thursday 16 February 2023

ओएनजीसी फाउंडेशनकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत


ONGC फाउंडेशनने ONGC मेरिट स्कॉलरशिप 2023 साठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ongcscholar.org द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

योग्यता काय आहे
अर्जदार SC, ST, OBC किंवा EWS श्रेणीतील असणे आवश्यक आहे. यातील 50% शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत. या सर्व प्रवर्गातील विद्यार्थी अभियांत्रिकी, एमबीबीएस, एमबीए किंवा जिओफिजिक्स किंवा भूगर्भशास्त्र (जियोलॉजी) या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असले पाहिजेत.
कोणत्या श्रेणीत किती
या शिष्यवृत्तीसाठी निवडलेल्या 2000 विद्यार्थ्यांना दरवर्षी 48,000 रुपये दिले जातील.योजनेअंतर्गत, SC/ST विद्यार्थ्यांना 1000 शिष्यवृत्ती, 500 OBC आणि 500 ​​EWS श्रेणीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल.  अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 मार्च 2023 आहे.
आवश्यक कागदपत्रे
या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, 10वी आणि 12वीचे मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला, बँक तपशील यासारखी आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील.  तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

नॉलेज कोपरा 1

१) मातीच्या भांड्यात पाणी थंड का राहते?

उत्तरः जेव्हा द्रवाचे तापमान वाढते तेव्हा वाफ तयार होते. वाफेबरोबरच द्रवाची उष्णताही निघून जाते. यामुळे द्रवाचे तापमान कमी राहते. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी बाहेरच्या उष्णतेमध्ये बाष्पीभवन होऊन त्या भांड्याला असलेल्या असंख्य छिद्रांच्या साहाय्याने बाहेर पडते आणि आतील पाणी थंड ठेवते. पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता जास्त असल्याने बाष्पीभवनाची ही प्रक्रिया मंदावते, त्यामुळे पावसाळ्यात हा परिणाम दिसून येत नाही.


२) प्रौढांपेक्षा लहान मुलांची हाडे जास्त का असतात?
उत्तर- मुलांच्या शरीरातील सर्व हाडे मोठी झाल्यावर एकमेकांशी जोडून एक होतात. तुमच्या लक्षात आले असेल की अगदी लहान मुलांच्या डोक्यात मऊ भाग असतो. त्यावेळी डोक्याचे हाड अनेक भागात असते.  नंतर ते एक होते.


३) सिक्स्थ सेन्स म्हणजे काय?
उत्तर- सर्वसाधारणपणे माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांचा विचार केला जातो. दृष्टी, श्रवण, स्पर्श, वास आणि जिभेची चव. सहाव्या इंद्रियांचा (सिक्स्थ सेंस) अर्थ यापेक्षा वेगळा अनुभव. याला अतीन्द्रिय ज्ञान (एक्स्ट्रासेन्सरी पर्सेप्शन) किंवा मानसिक अनुभव म्हणतात.आपण त्याला आंतरिक अनुभव म्हणतो  किंवा अंतर्मन इ. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, परंतु याची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, एखाद्याला स्वप्नात काहीतरी दिसते जे खरे होते.

 
4) अशोक स्तंभ म्हणजे काय?
उत्तर – सम्राट अशोकाने सारनाथमध्ये उभारलेल्या स्तंभाच्या वरच्या भागाला सिंह चतुर्मुख म्हणतात. या मूर्तीमध्ये चार सिंह पाठीला पाठी लावून उभे आहेत. त्याच्या तळाच्या मध्यभागी बांधलेले चार सिंह शक्ती, धैर्य, शौर्य आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. पायथ्याशी असलेले सिंह, हत्ती, घोडा आणि वृषभ हे चारही दिशांचे रक्षक आहेत. पायथ्याच्या मध्यभागी असलेले धर्मचक्र गतिशीलतेचे प्रतीक आहे. भारताच्या राष्ट्रध्वजात मधल्या पांढऱ्या पट्टीतही तो लावलेला आहे. हे गतिशीलतेचे प्रतीक आहे.  खाली लिहिलेले 'सत्यमेव जयते' हे मुंडक उपनिषदातून घेतलेले आहे.

 
5) भारतात ईमेल कधी सुरू झाला?
उत्तर - 15 ऑगस्ट 1995 रोजी भारताच्या विदेशी कम्युनिकेशन कॉर्पोरेशनने देशात इंटरनेट सेवा सुरू केली.  त्यानंतर ई-मेल सेवाही सुरू झाली.

चालू घडामोडी 1

1. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये भारतीय रेल्वेसाठी किती लाख कोटी रुपये भांडवली परिव्यय वाटप करण्यात आला आहे?

(a) 1.90 लाख कोटी (b) 3.00 लाख कोटी (c) 2.00 लाख कोटी (d) 2.40 लाख कोटी
2. संपूर्ण पर्यटन पॅकेज म्हणून देशातील किती पर्यटन स्थळे विकसित केली जातील?
(a) 50 (b) 30  (c) 20 (d) 40
3. MSME साठी क्रेडिट गॅरंटी योजनेचे नूतनीकरण करण्यासाठी बजेटमध्ये किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे?
(a) 1000 कोटी (b) 9,000 कोटी  (c) 5000 कोटी
(d) 8000 कोटी
4. दरवर्षी भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो?
(A) 31 जानेवारी (B) 01 फेब्रुवारी  (c) 02 फेब्रुवारी (d) 30 जानेवारी
5. बजेट 2023-24 नुसार, ITR साठी सुधारित सरासरी प्रक्रिया वेळ किती आहे?
(a) 21 दिवस (b) 20 दिवस (c) 18 दिवस (d) 16 दिवस
उत्तर- 1) c  2) a  3)c  4)b  5) a

विक्टोरिया क्राउन्ड


कबूतर या पक्ष्याला सगळेच ओळखतात, परंतु व्हिक्टोरिया क्राउन्ड कबूतर, ज्याला गौरा व्हिक्टोरिया असेही म्हटले जाते त्याबद्दल मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे.  पोत, रंग आणि दिसण्यात ते इतर कबूतरांपेक्षा खूप वेगळे आहे. हे खोल शाई निळ्या रंगाचे असतात. व्हिक्टोरिया क्राउन्ड कबूतराचे पंख निळे असतात, तोंडाजवळील भाग काळा आणि गडद जांभळा व भुऱ्या रंगाचा असतो. त्याच्या रचनेतील सर्वात खास भाग म्हणजे डोक्यावरचा सुंदर मुकुट. फिकट पांढरा आणि निळा मुकुट त्याचा चेहरा व्यापून टाकतो. सेहरानुमा मुकुट त्यांच्या सौंदर्यातच भर घालतो. इतर कबुतरांप्रमाणे, विक्टोरिया क्राउन्ड देखील खूप मिलनसार आहेत म्हणजेच त्यांच्या समूहात राहतात.कधी कधी झाडांच्या फांद्यावर एकमेकांशी भांडतानाही दिसतात. जेव्हा ते अन्नाच्या शोधात बाहेर पडतात तेव्हा ते समूहाने जातात. अनेकदा ते जोड्यांमध्ये दिसतात.  त्यांचे अन्न झाडांवरून पडलेल्या फळांवर आणि बियांवर अवलंबून असते. याशिवाय छोटे सूक्ष्म जीवदेखील त्यांचा आहार बनतात. व्हिक्टोरिया कबूतर पाण्याने भरलेल्या मैदानात म्हणजे नदी आणि समुद्र किनार्‍याजवळील भागात देखील आढळतात.अशा भागात ते समुद्रातून झाडांच्या खोडांपर्यंत दररोज उड्डाण करतात. ते जंगलात आणि 1000 फूट उंचीच्या पहाडी भागातदेखील घरटी बांधताना दिसले आहेत.

Wednesday 15 February 2023

देशभरातील 311 नद्यांचे पट्टे प्रदूषित

देशभरातील ३११ नद्यांचे पट्टे प्रदूषित आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे सर्वाधिक प्रदूषित नदी पट्टे महाराष्ट्रातील असून त्यांची संख्या ५५ इतकी आहे. तर मध्य प्रदेश दुसऱ्या, बिहार व केरळ तिसऱ्या तर कर्नाटक व उत्तर प्रदेश ही राज्ये चौथ्या स्थानी आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) जल गुणवत्ता व्यवस्थापन विभागाचा 'पोल्युटेड रिव्हर स्ट्रेचेस फॉर रिस्टोरेशन ऑफ वॉटर क्‍्वालिटी' अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यातून या धक्कादायक नोंदी समोर आल्या आहेत. शहरांतील घाण सांडपाणी, औद्योगिक वसाहतींमधील रसायने मिश्रित सांडपाणी नद्यांमध्ये किंवा नाल्यांद्वारे सोडले जाते. परिणामी नद्या प्रदूषित होतात, हे प्रदूषित पाणी पिण्याने विविध विकार जडतात. सिंचनासाठी असे पाणी वापरल्यास पिकांवर आणि मृदेवरही याचे हानिकारक परिणाम होतात. परिणामी 'पाण्याची गुणवत्ता' ही पर्यावरणाच्या प्रमुख चिंतांपेकी एक आहे. परिणामी जलप्रदूषणास कारणीभूत घटक नियंत्रित करण्यासाठी प्रभावी कृती कार्यक्रम सीपीसीबीकडून राबविले जातात. त्याची अंमलबजावणी संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून सामुदायिक योगदानातून केली जाते. सीपीसीबीकडून २०१९ आणि २०२१ मध्ये देशभरातील ६०३ नद्यांचे मूल्यांकन करण्यात आले. यासाठी १ हजार ९२० ठिकाणांचे नमुने घेतले, यासाठी पाण्यात असलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण गृहीत धरले. 

महाराष्ट्रातील प्रदूषित नद्या

 भीमा, मिठी, मुठा, सावित्री, गोदावरी, कन्हान, मुळा, मुळा-मुठा आणि पवना या नऊ नद्यांची पात्रे सर्वाधिक प्रदूषित (प्रायॉरीटी १ व २ मध्ये सामील) पट्ट्यांत सामील आहेत.अंबा, अमरावती, बोरी, बुराई, भातसा, बिंदुसरा, चंद्रभागा, दारणा, घोड, गोमाई, गिरणा, हिवरा, इंद्रायणी, कळू, कन, कोलार, कोयना, कृष्णा, कुंडलिका, मंजिरा, मोर, मोरणा, मूचकुंडी, मोरणा, नीरा, पांझरा, पाताळगंगा, पैनगंगा, पेढी, पेहलर, पूर्णा, रंगावली, सीना, सूर्या, तानसा, तापी, तितूर, उल्हास, उरमोडी, वैतरणा, वशिष्टी, वेण्णा, वाघूर, वैनगंगा, वर्धा, वेणा या नद्यांचे पट्टे प्रदूषित आढळून आलेली आहेत.  

Tuesday 14 February 2023

लोकप्रिय नाटककार जयवंत दळवी

मराठीतील प्रसिद्ध नाटककार आणि कथा-कादंबरीकार जयवंत दळवी यांच्या नाटकांमुळे मराठी रंगभूमीला नवे चैतन्य लाभले. जबरदस्त ताकदीच्या व्यक्तिरेखा हे दळवींच्या नाटकांचे वैशिष्ट्य. त्यांच्या कथांवर आणि कादंबऱ्यांवर त्यांनीच नाटके लिहिली आणि ती प्रचंड गाजली, लोकप्रिय झाली. दळवींची 'चक्र' ही पहिलीच कादंबरी मराठीच्या अनुभव क्षेत्राची कक्षा वाढविणारी म्हणून वाखाणली गेली. दळवी यांची आणखी एक विशेष ओळख म्हणजे 'ठणठणपाळ'. त्यांनी 'पुलं'च्या साहित्यातील निवडक लिखाण वेचून 'पु. ल. देशपांडे : एक साठवण' हे अप्रतिम पुस्तक संपादित केले. 

जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. त्यांचे बालपण सिंधुदुर्गातील आरवली गावात गेले. कादंबरी, स्तंभलेखन, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी कथा अशा सर्व प्रांतांत त्यांचे लेखन गाजले. त्यांचे १५ कथासंग्रह, १९ नाटके लोकप्रिय आहेत. 'गहिवर', “एदीन', 'रुक्मिणी', स्पर्श इत्यादी १५ कथासंग्रह; चक्र, 'स्वगत', ‘महानंदा’, 'अथांग', 'अल्बम' आदी २१ कादंबऱ्या; संध्याछाया', 'बॅरिस्टर', 'सूर्यास्त', 'महासागर', 'पुरुष', 'नातीगोती' आदी १९ नाटके दळवी यांनी लिहिली. 'लोक आणि लौकिक' हे प्रवासवर्णन आणि ‘सारे प्रवासी घडीचे’ हे कोकणातील विलक्षण व्यक्तींचे आणि त्यांच्या कर्तृत्वाचे, विक्षिप्तपणाचे चित्रण करणारे त्यांचे विनोदी पुस्तक वाचकप्रिय ठरले. 


द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ९८ टक्के

देशात निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्य हे अव्वल आहे. राज्यातील द्राक्षांना युरोप, चीन, मध्य-पूर्व आशियासह जगभरात मोठी मागणी असते. भारतातील एकूण द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा ९८ टक्के इतका असून महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादनांपैकी केवळ आठ टक्के माल निर्यात होतो. सुधारित वाणांच्या वापराने निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात भरघोस वाढ होईल, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. राज्य द्राक्ष बागाईतदार संघ सातत्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी नवनवीन संशोधनांना पाठबळ देत आहे. शिवाय अधिकाधिक सक्षम, निरोगी आणि उत्पादनक्षम द्राक्ष वाणांच्या विकसनासाठी कार्य करत आहे. मांजरी फार्म (ता. हवेली) येथील प्रयोगशाळेत द्राक्षाचे नवे वाण विकसित केले आहे. नवे वाण विकसित करण्यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने संशोधन करण्यात येत होते.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन उत्कृष्ट रंग, चव, चांगली वजनदार आणि सुवासिक द्राक्षे प्रजाती विकसित करण्यात द्राक्ष बागाईतदार संघाला यश आले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत, वेगवेगळ्या भौगोलिक आणि वातावरणात या वाणाची चाचणी व्हावी, या उद्देशाने मांजरी फार्म येथील प्रयोगशाळेसोबतच बागाईतदार संघाच्या काही प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रयोग करण्यासाठी भारत शिंदे (अध्यक्ष, पुणे विभाग), अभिषेक कांचन (उरुळी कांचन) आणि अशोक गायकवाड (नाशिक) यांना या नव्या वाणाची रोपे दिली होती. या सर्व शेतकऱ्यांच्या प्लॉटवर चांगले निष्कर्ष निघाले आहेत. या चाचणीवेळी प्राप्त झालेल्या सूचनांचा अभ्यास करून, या वाणात आणखी काही सुधारणा करता येतील, हे तपासले जाणार आहे.  या प्रजातीची जनुकीय चाचणी केली असता ती ‘क्रिमसन’ प्रजातीशी काही अंशी साधर्म्य साधणारी आहे. द्राक्षांचा आकार, वजन आणि रंग इतर प्रजातींपेक्षा सरस असून फळ अधिक मधुर आणि सुवासिक (अरोमॅटिक) आहे. द्राक्षाचे आवरण मजबूत असून अवकाळी पावसाचा मारा सहजपणे सहन करू शकते. या झाडांना वाढीसाठी आवश्यक हार्मोन्सची गरज अत्यंत मर्यादित असून महाराष्ट्राच्या सर्व भागांत या वाणाचे उत्पादन घेता येईल.

सांगलीच्या स्मृती मानधनाने मारली बाजी

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि सांगलीची कन्या स्मृती मानधना हिला पहिल्या वुमन्स प्रीमिअर लीगच्या लिलावामध्ये सर्वाधिक बोली लागली आहे. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात तिच्यावर फ्रेंचायसींनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. वुमन्स प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंर्जस बंगळुरू संघाने 3.40 कोटींची बोली लावत तिला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

स्मृती मानधनाची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. तिच्याकडे असलेल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर तिला इतकी मोठी किंमत मिळाली आहे. स्मृती मानधना ही जगातील टी-20 क्रिकेट मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसेच जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळून आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्मृती मानधना श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकारा आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन यांना आपला आदर्श मानते.

स्मृती मंधानाने ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणार्‍या महिला बिग बॅश लीगमध्ये 38 सामन्यांमध्ये 784 धावा केल्या आहेत. 139 च्या स्ट्राईक रेटने मानधनाने धावा केल्यात. इतकेच नाहीतर द हंड्रेडमध्येही ती खेळली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्‍वचषकात स्मृती मानधना भारतीय संघाची मुख्य खेळाडू आहे.

स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास आणि आईचे नाव स्मिता आहे. वडील श्रीनिवास मानधना हे माजी जिल्हास्तरीय क्रिकेटपटू होते. स्मृती दोन वर्षाची असताना कुटुंब सांगली येथे स्थलांतरीत झाले. सांगलीत स्मृतीने प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले.

स्मृतीचा क्रिकेटप्रवास मोठा रंजक आहे. तिचा भाऊ श्रवण क्रिकेट सरावासाठी चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर जात असे. वडील श्रीनिवास त्याला घेऊन जायचे. छोटी स्मृती सोबत असायची. श्रवणचा सराव सुरू असताना वडील स्मृतीला चेंडू टाकत बसायचे. ती ते तडकवायची. हळूहळू तिला क्रिकेटची गोडी लागली. विष्णू शिंदे, अनिल जोब, अनंत तांबवेकर, प्रकाश फाळके असे सांगलीतील प्रशिक्षक 'स्मृतीला चांगले भवितव्य आहे.' असे सांगायचे. तिने मेहनतीने ते सिद्ध करून दाखवले. भारतीय संघाचे दार तिच्यासाठी उघडले गेले, तेव्हा तिचे कुटुंब भाड्याने छोटा बंगला घेऊन राहत होते. 

 स्मृती नऊ वर्षांची असताना तिची महाराष्ट्र अंडर 15 या संघात निवड झाली. यानंतर स्मृती अकरा वर्षाची असताना महाराष्ट्र अंडर 19 संघात निवडली गेली. 2013 मध्ये स्मृती मानधनाने एकदिवसीय सामन्यात डबल शतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली. स्मृतीच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला 2014 मध्ये सुरूवात झाली. इंग्लंडविरुद्ध वॉर्मस्के पाक येथे कसोटीत पदार्पण झाले. वेस्ट इंडीज येथे 2018 मध्ये झालेल्या महिला विश्‍वचषक टी-20 साठी तिची भारतीय संघात निवड झाली. गुवाहाटी येथे टी-20 मध्ये इंग्लंडविरुद्ध महिला संघाचे नेतृत्व केले होते तेंव्हा ती भारतातील सर्वात तरुण टी-20 कर्णधार बनली. स्मृतीला आणखी खुप क्रिकेट खेळायचे आहे.

Monday 13 February 2023

आधुनिक कवी केशवसुत

कवी केशवसुत यांना  आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हटले जाते. कारण मराठीत सर्वप्रथम  आधुनिक कविता लिहिली. आधुनिक म्हणजे नव्या विषयावरची, नवा आशय सांगणारी. तोपर्यंत काव्य हे देवादिकांवर आणि राजामहाराजांवर लिहिले जात होते. केशवसुतांनी माणसांवर कविता लिहिल्या. केशवसुतांनी काव्याची खरी प्रकती आत्मलेखनाची आहे हे लेखनातून दाखवले. काव्याच्या बाह्यांगातही त्यांनी परिवर्तन घडवून आणले. उत्कट अनुभूती स्फुट स्वरूपाची असते. त्या स्फुट आविष्कारासाठी गणवृत्तांपेक्षा मात्रावृत्तेच अधिक  अनुकूल असतात, हे त्यांनी दाखवून दिले. केशवसुतांचे पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड गावी झाला. शिक्षण खेड, बडोदे, वर्धा, नागपूर व पुणे या ठिकाणी झाले. केशवसुतांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखनास आरंभ केला असला, तरी त्यांचा मुख्य काव्यरचनाकाल १८८५ ते १९०५ हा होता. या काळातील त्यांच्या १३५ कविता आज ग्रंथरूपात उपलब्ध आहेत. केशवसुतांनी लिहिलेल्या कवितांपैकी, 'स्फूर्ति' (१८९६), 'कवितेचे प्रयोजन' (१८९९), 'आम्ही कोण?' (१९०१), 'तुतारी' (१८९३), ‘नवा शिपाई' (१८९८) आणि “प्रतिभा' (१९०४) या महत्त्वाच्या कविता आहेत. त्यांची 'झपूर्झा' (१८९३) ही कविता विशेष गाजली. 

शाहीर अण्णा भाऊ साठे

मुंबई गं नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका वाजतो डंका... किंवा माझी मैना गावावर राहिली... यांसारख्या शाहिरी गाण्यांतून संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीचा आवाज बुलंद करणारे शाहीर अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक मानदंड होय. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. त्यासाठी जागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर “माझी मुंबई' या लोकनाट्याचे प्रयोग केले होते. अण्णांचे मूळ नाव तुकाराम. जन्मस्थळ सांगलीतील वाटेगाव. त्यांना शालेय शिक्षण घेता आले नसले, तरी त्यांनी अनुभवाच्या शाळेत प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान मिळवले. १९३२ मध्ये वडिलांसोबत मुंबईत आल्यावर चरितार्थासाठी मिळतील ती कामे त्यांनी केली. शहरातील कामगारांचे कष्टमय, ‘ दुःखाचे जीवन त्यांनी  जवळून पाहिले. त्यामुळेच त्यांच्या एकूण साहित्यात वास्तवाचे चित्रण आलेले पाहायला मिळते. माणुसकीचा विजय हेच त्यात मुख्य सूत्र असल्याचे दिसते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली. त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले. कथा, कादंबरीच्या क्षेत्रातही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या लेखनाला अमाप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या 'फकिरा' कादंबरीला १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. 


ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि. स. खांडेकर

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पाहिले मराठी साहित्यिक विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर हे मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कादंबरीकार, लोकप्रिय साहित्यिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या 'ययाती' कादंबरीला १९६०चा साहित्य अकादमी आणि  १९७४चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी वाचकांत गेली पाच दशके ही कादंबरी लोकप्रिय आहे. खांडेकरांनी 'कुमार' या नावाने कविता व 'आदर्श' या नावाने विनोदी लेखही लिहिले; मात्र त्यांची खरी ओळख कादंबरीकार हीच होय. कथाक्षेत्रातही त्यांनी भरीव कामगिरी केली. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकांचीही निर्मिती झाली. 'रूपक कथा' ही खांडेकरांनी मराठी कथेला दिलेली एक देणगीच होय. सांगली जिल्ह्यात जन्म झालेल्या वि. स. खांडेकर यांची कर्मभूमी सिंधुदुर्गातील शिरोडा हे गाव ठरले. याच गावात ते शिक्षक म्हणून  सेवेत होते. १९३० ती मध्ये 'हृदयाची हाक' ही पहिली कादंबरी त्यांनी लिहिली. त्यानंतर एक कांचनमृग (१९३१), दोन धुव (१९३४), हिरवा चाफा, दोन मने (१९३८), रिकामा देव्हारा (१९३९), पहिले प्रेम (१९४०) अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. सरकारने १९६८ मध्ये पद्मभूषणने त्यांना गौरवले. शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. बहाल केली. सरकारने पोस्टाचा स्टॅम्प काढून त्यांचा सन्मान केला. 

चतुरस्र प्रेमळ कवी

सहजसोपी शब्दरचना, जगण्यावर निस्सीम प्रेम करणारे आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवणारे कवी म्हणून मंगेश पाडगावकर यांचे नाव नेहमीच अग्रणी राहिले आहे. वेंगुर्ला त्यांचे जन्मगाव. मुंबई विद्यापीठातून त्यांनी मराठी आणि संस्कृतमध्ये पदव्युत्तर  पदवी मिळवली. त्यानंतर मिठीबाई आणि सोमय्या महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे त्यांनी शिकवले. पुढे 'साधना' साप्ताहिकाचे सहसंपादक, तर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात त्यांनी निर्माता म्हणून काम केले. कवी, गीतकार, ललित लेखक म्हणून परिचित असणाऱ्या पाडगावकर यांचा १९५० मध्ये 'धारानृत्य हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. 'वात्रटिका' हा काव्यप्रकार मराठीत त्यांनीच रूढ केला. उपहासात्मक कविता लोकप्रिय करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. बालगीत, भक्तिगीत, प्रेमगीत, भावगीत अशा काव्य प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. “सांग सांग भोलानाथ', “दार उघड चिऊताई दार उघड, 'असा बेभान हा वारा', 'सांगा कसं जगायचं' या त्यांच्या कविता विशेष लोकप्रिय झाल्या. 'सलाम' या त्यांच्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या गाण्यांनाही श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. आबालवद्धांच्या मनातील हळव्या कोपऱ्यात स्थान मिळवलेल्या या चतुरस्र कवीला महाराष्ट्रभूषण आणि 'पद्मभूषण' पुरस्कारानेही गोरवण्यात आले आहे. 

महाराष्ट्र कवी यशवंत

'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत यांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख ओळखला जातो. त्यांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व आदी छटांचे चित्रण आहे. संयुक्‍त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना 'महाराष्ट्र कवी' म्हणून गौरवण्यात आले. ते बडोदा संस्थानचे राजकवी होते. त्यांनी जव्हार संस्थानचे राष्ट्रगीत रचले होते. कवी यशवंत म्हणजेच यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म ९ मार्च १८९९ रोजी सातारा जिल्ह्यातील चाफळ येथील. त्यांचे शालेय शिक्षण सांगलीला झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी पुण्यात लेखनिकाची नोकरी केली. कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) यांचे काव्यरचनेसंबंधीचे मार्गदर्शन आरंभीच्या काळात त्यांना मिळाले. १९१५ ते १९८५ या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे होती; मात्र इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. 'यशोधन' हा त्यांचा पहिला — लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे 'यशोगंध', 'यशोनिधि', यशोगिरी, 'ओजस्विनी' आदी काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. १९२२ मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'आई' या कवितेतील गोडवा आजही कायम आहे. 'छत्रपती शिवराय' महाकाव्य, 'काव्यकिरीट' हे राज्यरोहणावरील खंडकाव्य, ‘घायाळ’ कादंबरी, 'मोतीबाग' हा बालगीतांचा संग्रह आणि 'जयमंगला' ही भावगीतांची प्रेमकथा त्यांनी रचली. १९५० मध्ये त्यांनी मुंबईत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही भूषवले होते.  

Sunday 12 February 2023

कियाराचे खरे नाव आलिया अडवाणी

कियारा अडवाणी हिचा जन्म 31 जुले 1992 रोजी मुंबईत झाला.  ती जय हिंद कॉलेज फॉर मास कम्युनिकेशन, मुंबईतून पदवीप्राप्त आहे. वडिलांचे नाव जगदीप अडवाणी, आई जेनेवीव जाफरी असून  एक बहीण-भाऊ  आहे. तिची संपती सुमारे 25 कोटी रु. आहे.

बॉलीवुडची सर्वात चर्चित नायिकांपैकी कियारा अडवाणीला कधी काळी बॉलीवूड चित्रपट पाहिल्याने अपमानित व्हावे लागले होते. कियारा सांगते, ती मुंबईतील सर्वात मोठ्या शाळेपैकी कॅथेडलमध्ये शिकली आहे. येथे हिंदी चित्रपट पाहणे कमीपणाचे समजले जायचे. ती लपून बॉलीवूड चित्रपट बघायची. चित्रपटात जाण्याआधी तिच्या आईने तिला व्यावसायिक पदवी प्राप्त करायला सांगितले म्हणजे करिअरसाठी बॅकअप तयार राहील. उद्योगपती मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानी तिची मैत्रीण आहे. जुही चावला तिला मावशी लागते.

 कियारा अडवाणीचे वडील जगदीप अडवाणी उद्योगपती तर आई जेनेवीव जाफरी शिक्षिका आहेत. कियाराचे आजोबा मुसलमान होते तर आजी स्कॉटिश खिश्चन होती. तिचे खरे नाव आलिया अडवाणी आहे. बॉलीवूडमध्ये प्रवेशाआधीच आलिया भट्ट आली होती, यामुळे तिने सलमान खानच्या सांगण्यावरून आपले नाव बदलून कियारा अडवाणी करून घेतले. बॉलीवूड कलाकार, निर्माते, दिग्दर्शक अशोक कुमार म्हणजे दादामुनी तिचे सावत्र आजोबा आहेत. 

 अभियानाच्या आधी तिने मुंबईच्या अली बर्ड प्ले स्कूलमध्ये टीचिंगपासून करिअरची सुरुवात केली. २०१४ मध्ये आलेला 'फगली' तिचा पहिला चित्रपट होता, जो फ्लॉप ठरला. मात्र पुढचाच चित्रपट एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरीत शानदार अभिनयाने आपली छाप पाडली. या नंतर आलेल्या कबीर सिंहने स्टार बनवले. तिने तेलुगू चित्रपटातही काम केले आहे. आतापर्यंत जवळपास १५ चित्रपट केले आहेत. कियारा आठ महिन्यांची असताना आई जेनेबीवसोबत बेबी क्रीमची जाहिरात केली होती. अलिकडेच तिचा सिद्धार्थ मल्होत्रा सोबत विवाह झाला आहे. 

सिद्धार्थ मल्होत्राला बालपणापासूनच नाटकात रस

सिद्धार्थ मल्होत्रा याचा जन्म16 जानेवारी 1985 रोजी  दिल्ली शहीद भगतसिंग कॉलेज नवी दिल्लीतून बीकॉम ऑनर्स झाला आहे. वडिलांचे नाव सुनील मल्होत्रा तर आईचे नाव रिमा आहे. विविध मीडिया रिपोर्टनुसार त्याची संपत्ती सुमारे 75 कोटी रु. आहे. 'शेरशाह' चा स्टार सिद्धार्थ मल्होत्रासाठी बॉलीवूडचा प्रवास सोपा नव्हता. टीव्हीपासून मॉडेलिंगपर्यंत त्याला ५ वर्षे संघर्ष करावा लागला. सिद्धार्थ सांगतो, पालकांना त्याला इंजिनिअर करायचे होते, मात्र त्याला शिकण्यात रस नव्हता. कलाकार व्हायचे होते. यासाठी त्याने चित्रपटाच्या सेटवर क्लॅप बॉय म्हणूनही काम केले. सिद्धार्थ प्रसिद्ध ग्लॅडरॅग्स मॅनहंट आणि मेगामॉडल प्लेजेट स्पर्धेत उपविजेता ठरला. तो सर्टिफाइड स्कूबा ड्रायव्हर आहे. 

 सिद्धार्थचे वडिल सुनील मल्होत्रा मर्चंट नेव्हीत कॅप्टन होते तर आई रिमा गृहिणी होती. वडिलांनुसार सिद्धार्थला बालपणापासूनच नाटकात रस होता. तो नेहमीच शाळा व स्थानिक कार्यक्रमांत नृत्य व नाटकांमध्ये भाग घ्यायचा. त्याच्या या हौसेमुळे तो अभ्यासात इतका कच्चा झाला की त्यामुळे नववीत अनुत्तीर्ण झाला. सिद्धार्थ रग्बीचा मोठा फॅन आहे. तो दिल्ली हेरिकेन रग्बी संघाकडून खेळला आहे. सिद्धार्थचे मोठे भाऊ हर्षद मल्होत्रा इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. 

सिद्धार्थ मालिका, मॉडेलिंग नंतर चित्रपटाकडे वळला.  सिद्धार्थने टीव्ही मालिका धरती का योद्धा पृथ्वीराज चोहान'मध्ये जयचंदच्या भूमिकेतून अभियानात प्रवेश केला होता. मात्र समाधान न झाल्याने  मॉडलिंग सोडले. 2010 मध्ये दिग्दर्शक करण जोहर यांना सहाय्य करू लागला. चित्रपट 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून त्याने चित्रपट करिअर सुरू केले. सिद्धार्थने आतापर्यंत 15 चित्रपट केले आहेत. 2021 मध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित शेरशाहमध्ये कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेत ओळख मिळाली. हा त्या काळी सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट होता. अलीकडेच तो कियारा आडवाणीच्या लग्नबेडीत अडकला आहे. 


Saturday 11 February 2023

बालपणीची स्मरणगाथा 'कुणब्याची पोरं'


नामवंत लेखक व कथालेखक आप्पासाहेब खोत यांचे नुकतेच प्रकाशित झालेले हे पुस्तक वाचनात आले.खेडेगावातील बालपणीच्या आठवनीचे ललित लेख.आपल्या बालपणीच्या गमती जमती, घडण, अडचणी ,आणि नष्टप्राय होत असलेल्या सांस्कृतिक खाणाखुणा या ललित लेखातून अत्यंत लालित्य पूर्ण अन् तळमळीने व्यक्त केल्या आहेत. 'कूणब्याची पोरं' या पहिल्याच ललित लेखातून शेतकऱ्याचे पोरांचं मातीशी नातं हे तो जन्माला येण्या अगोदर पासून असते हे आप्पासाहेब यांनी समर्पक शब्दातून व्यक्त केले आहे.या पोरांच्या जीवनात " माती" ही " माती " न राहता त्यांच्या जीविताचा अबीर बनते.मातीशी एकरूप झालेली,तिच्या स्पर्श व गंधाने पोसलेल्या पोरांचं बळविश्र्व ह्या मातीनं व्यापून टाकलं आहे.खेळ मातीत आणि खेळणी मातीची.चिखलात उमललेली ही मातीची फुलं.पावसात भिजने, झाडावर सुर पारंबी, झोपाळे, बैलं आणि गाडी,हिरवा निसर्ग,हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य अंग.निसर्गाशी एकरूप होऊन, असंख्य अडचणींवर मात करून जगत असतात ही पोरं. या आठवणी चित्रमय पद्धतीने खोत यांनी शब्द बद्ध केल्या आहेत.पण काळा  बरोबर हे चित्र बदलून गेलं, मुलं आधुनिकतेच्या प्रवाहात गटांगळ्या खाऊ  लागली आहेत याची सल लेखकाला सतत बोचते आहे.उध्वस्त होत चाललेलं समृद्ध ग्रामजीवन, बेभान होऊन जगत असलेली पोरं,याची चिंता लेखकाला सतत बोचते आहे.

बालपणीची असंख्य स्मरणे लेखकांनी चित्रित केली आहेत.ह्या मुलांचे जीवन खूप संकटांचा मुकाबला करतच घडत असते.आई वडीलांच्या निर्व्याज प्रेमाशिवाय काहीच स्व स्त नसते. अडचणी आणि अभाव यांची रेलचेल झालेली असते यांच्या जीवनात.एक लाकडाची खुर्ची मिळवण्यासाठी काय धडपड केली लेखकाने? पण बरीच यातायात करून प्राप्त झालेल्या खुर्ची साठी लेखक फारच भा वुक झाले आहेत. आप्पासाहेब यांच्या या ललित लेखातून समग्र ग्राम जीवन वाचकाच्या डोळ्या समोर उभे राहून जाते, आणि हीच खोतांच्या लेखणीची ताकद आहे.' माय' या ललित लेखातून शेतकरी बायकांची जगत असताना कशी शारीरिक,मानसिक आणि भावनिक कुतरओढ होते याची विलक्षण आठवण शब्द बद्ध केली आहे.या कुण ब्याच्या बायकांच्या नशिबी केवळ काम,घाम, आणि अपमान सहन करत जगणं असते.केवळ सोसत राहणं,व्यक्त होणं नाही. अन् कोणा जवळ व्यक्त होणार,? कोण ऐकणार?   

असे घुसमटलेल्या अवस्थेत, सोसत सोसत,अन् पुन्हा हसत जगायचं.गरोदरपण असो वा बाळंतपण, सारखेच हाल. काळच असा होता की कौतुक करायला ना वेळ/ ना पैसा.या आईच्या व्य थेने लेखक फारच अस्वस्थ व हळवा झालेला दिसतो.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मुलांच्या स्वप्नांना आणि पंखांना बळ देणारी " माय" वाचकाला ही कासावीस करते. आणि तिच्यातील देवत्व अधिकच अधोरेखित होते. आप्पासाहेब खोत यांचा पिंडच मुळी शेतात आणि मातीत वाढलेला..शेळ्या, मेंढ्या,वासरे,रेडक आणि ही कुण ब्याची पोरं एकच परिस्थीत वाढत असतात. फक्त मुलं घरात व ती गोठ्यात एव ढाच फरक.त्या मुळे लेखकाचे मनोगत अस्सल,खरे,आणि मातीशी नाळ जुळलेले आहेत.साधारणतः ५०ते ६५  काळात जन्मलेल्या प्रत्येकाला याचा सचित्र अनुभव येईल.त्याला हे स्वतः चे अनुभव वाटतील.हे लेखन हस्तिदंती मनोऱ्यातील नाहीत,बिया बरोबर मातीत रुजलेले व अपार भोग भोगलेले  त्यांचे अनुभव आहेत. त्यांच्या लेखनाला करकरीत मातीचा वास आहे.आताच्या पिढीला हे रुचणारे व पचणारे हे अनुभव नाहीत कदाचित.आजच्या मोबाईल फोन ने  एका पिढीचे भवितव्य आणि भावविश्व च खणून टाकले आहे. नात्यातील संवेदन हीनता,निती मूल्यांची झालेली पडझड ," असण्यापेक्षा दिसण्याला आलेले महत्व, विवेका शी झालेलं वैर अन् भौतिक सुखाशी झालेलं मैत्र हे सर्व लेखकाला बोचत आहे.सामाजिक  स्थिती अशी असली तरीही लेखकाने आपली लेखणी ताजी ठेवली आहे. खेड्यातील शेतकऱ्याचे अपार कष्ट,मुलांच्या स्वप्नां साठी दरिद्र्याशी दोन हात करत मुलांनी शहाणं व्हावं म्हणून ढोर मेहनत करणारे आई वडील साक्षात परब्रम्ह वाटतात.गरिबी होती पण दारिद्र्य नव्हतं.हे सर्व लेखकाने समर्थ लेखणी जिवंत केले आहे.

" फरारी" लेखात एकाध्या अफवेने साऱ्या गावातील स्त्रिया आणि मुलं अनामिक भीतीने थरथरत असत.व ती माणसे आपलीच आहेत कळल्यावर कसा श्वास मोकळा होतो याची अनुभूती एका पिढीने घेतली आहे. रान पाखरं या ललित लेखातून पक्षी विश्वाचे अनोखे दर्शन आप्पासाहेब यांनी घडविले आहे.चिमण्या, कावळे, पोप ट, बगळे, होले,वेगवेगळ्या ऋतूत येऊन शेतातील कष्टात आपला सुर मिसळून कष्ट कऱ्याचे श्रम कसे हलके करत याचे मनो ज्ञ वर्णन लेखकांनी चित्रित केले आहे.निरनिराळ्या ऋतूत येणाऱ्या रंगी बेरंगी पक्षांनी लेखकाचे जीवन ही समृद्ध केले आहे. पक्षांचे अखंड विश्व शेतातील झाडावर अवतरत असे,पक्षी आणि शेतकरी यांचे अतूट नातं लेखकांनी उलघडले आहे.शेतात कुण ब्याचा कष्टाला पाखरांच्या संगीताचा कसा साज असतो याची अनुभूती लेख वाचत असताना येते. 

जीवनाच्या अंगाला सुरांचा रंग भरणारे हे पक्षी    कुठे  परागंदा झाले? या विचाराने खोत कासावीस होतात. अति लोभा पायी झाडांची केलेली कत्तल, विषारी फवारणी, खते,यांनी पाखरांचे थवे नाहीसे झाले. मातीच्या घरात त्यांची घरटी असायची,ती घरीच नाहीत.माणसाच्या रा क्षशी भुकेने सर्व स्वाहा केलं याची चिंता लेखकाला सतत बोचते आहे.पाखरांच्या अभावाने सारे शिवार ओक ओक वाटू लागलं आहे.कुण ब्याच्यां पोरांना घरात आणि शेतात नानाविध प्रकार ची कामं करावी लागतात अन् ती करत असताना असंख्य घाव, व्रण,जखमा,होत असतात.पायात काटा घुसने हे नेहमीचेच.त्या वेळी खूप असह्य वेदना होत होत्या, जीव नकोसा होई, त्याच शिदोरीवर भविष्य प्रकाशमान झाले, अन् आज तेच व्रण लेखकाला पारितोषिक वाटते,कारण त्याच जखमांनी आयुष्याचे धडे दिले.ते व्रण पाहून आज लेखक रम्य भूतकाळात हरवून जातो. बैलं आणि बैलगाडी हा कुण ब्याचा श्वास,ते त्याच्या जवळ असणं मोठेपणा चं. बैलं आणि बैलगाडी मुळेच त्याच्या संसाराची गाडी सुखनैव चालत असे.शेतकऱ्याचे जीवन चालवणारे इंजिन ते, पण जी गाडी घराची वैभव होती,ती काळाच्या ओघात तीही पडद्या आड गेली,. शेत कामापासून माघारीन आणण्याचा  काय थाट असाय चा!. काळा बरोबर तिनेही आपलं अस्तित्व हरवलं,सगळं मागं पडलं, गाडी, चाक, सा टा रा, सगळं वळचणीला पडलं,ज्या गाडी ने संसाराला गति दिली, तीच आता गतीहिन बनून मरणाची वाट पाहत बसली आहे.अडगळ झाली.

लेखक तिच्या आठवणीने व्याकुळ होतोच, पण गाडीच्या अनुषंगाने येणारे ग्रामीण अस्सल मराठी शब्द(   उदा.आरा, पु ट्टा,वंगण,साप ती,चाबूक असे) ही लयास गेले याची चिंता लेखकाला सतत चिंतन करायला भाग पाडते. विज्ञानाने सुखं दाराशी आणली पण बदल्यात आमचं ग्राम संस्कृतीच शब्द वैभव हिरावून घेतल्याचं शल्य लेखकाला भाव विवश करते. गावाला तळे अन् मळ्यात खळ हे दोन अलांकरच. सुगीत खळे म्हणजे कुण ब्याला तीर्थ स्थान असते.वर्षाच्या मेहनतीचे देवाने दिलेले दान आणि धन  खळ्यातून च घरी येत असते पण ते खळे ही आज डांबरी रस्त्यावर आले. खळ्याचे पावित्र्य हे असे रस्त्यावर आल्याचे दुःख आप्पासाहेब खोत यांना खूप सतावते आहे. खरं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या बालपणीची स्मरण गाथा आहे.आज आर्थिक समृध्दी लाभली आहे,पण जीवनात एक रिते पण जा नऊ लागले आहे.

कारण ज्या वातावरणात वाढलो ते सोनेरी दिवस केव्हा अन् कसे नाहीसे झाले ते कळलेच नाही. या ललित लेखातून लेखकाने पुन्हा एकदा ग्राम संस्कृती जागी केली आहे.काळानुरूप बदल ही काळाची  असतेच,पण या ओघात कधीही न विसरता येणारे आमचे संपूर्ण भाव विश्व ही वाहून गेल्याचे अपरंपार दुःख लेख काला आहे. बदला बरोबर आलेली " बला" लेखकास हैराण करून सोडते. ५०/६० वर्षा पूर्वी चा एक काल पट या ललित लेखातून उभा राहिला आहे.त्या काळात जन्मलेल्या प्रत्येकाला ही त्याचीच कहाणी वाटेल. अत्यंत बारकाईने निरीक्षण, स्मरण, करून,नेमकी शब्द कळा वापरून केलेले लेखन काळजाला जाऊन भिडते.हे पुस्तक वाच ताना वाचक आपल्या बाल विश्वात हरवल्या शिवाय राहणार नाही.  एकाधी पक्षिजात नामशेष होण्याची  कारणे जशी पर्यावरणातील बि घा डा त  सापडतात तशी संवेदशील लेखकाची कमी होण्याची कारणे सामाजिक अस्वस्थ तेत सापडतात.पण आप्पासाहेब यांनी आपली सृजन शिलता , संवेदशीलता ताजी ठेऊन अखंड लेखन कार्य करण्याचा जणू वसा घेतला आहे, असे त्यांचे लेखन वाचून  लक्षात येते .एकाध्या चित्रकारांचा कुंचला  जसा  सफाईदार चालावा अन् अलगत चित्र उभे रहा वे, तद्वत संस्कृतीचे ( ग्राम) शब्द चित्र आप्पासाहेब यांनी उभे केले आहे.

कुणब्याची पोरं.

लेखक -आप्पासाहेब खोत.

संस्कृती प्रकाशन पुणे.

पृष्ठे १४८.

मूल्य ३०० रू.

(आप्पासाहेब पाटील)

आंब्याच्या ४०० च्या वर प्रजाती

आंब्याला हिंदी भाषेत ‘आम’ म्हणतात, पण खऱ्या अर्थाने हा ‘खास’ आहे. आंब्याचे वनस्पतीशास्त्रातले नाव आहे ‘मँगीफेरा’ आणि भारतीय जातीचे नाव ‘मँगीफेरा इंडिका’. याच्या अनेक प्रजाती आहेत. हापूस, लंगडा, बदामी, दशेरी, केसर, नीलम, पोपटनाक्या तोतापुरी... असे अनेक. हापूस, साधारणपणे एप्रिल -मे महिन्यात बाजारात येतो. रत्नागिरी हापूस, देवगड, पावस, मंडणगड अशी हापूसची नावं आहेत. हापूस मोठा भाव खाऊन जातो. महाराष्ट्रात हापूसनंतर लोक वळतात पायरीकडे. पायरी कापून खाण्यापेक्षा रस काढून पोळी किंवा पुरीबरोबर खायला प्राधान्य दिले जाते. 

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये ‘लंगडा’ला महत्त्व जास्त. याला लंगडा नाव कसे पडले हे कोडेच आहे, पण नाव लंगडा असूनही विक्री आणि रसनेच्या शर्यतीत हा पहिला नंबर पटकावणारा, आंब्यांच्या इतर जाती जशा पिकल्यावर किंवा तयार झाल्यावर आपला रंग बदलतात तसे लंगडाच्या बाबतीत होत नाही, तो कच्चा असताना हिरवा आणि पिकल्यावरही हिरवाच. बाजारात पहिला नंबर मात्र बदामीचा, कर्नाटकचे हे फळ साधारणपणे मार्चपासून दिसू लागते. पाठोपाठ दशेरी, केसर हजेरी लावतात. दशेरीचे फळ पाकिस्तान, नेपाळ आणि उत्तर भारतातले. केसर किंवा गीर केसर आंबा म्हणजे स्वाद आणि सुवासाचे अप्रतिम मिश्रण.

माणसांच्या नावांसारखी नावं असलेल्या काही प्रजाती आहेत. कॅरेबियन बेटातील ‘जुली’, त्रिनिदादचा ‘ग्रॅहम’, अमेरिकेतील ‘रुबी’ आणि ‘फोर्ड’, भारतात ‘मनोहर’, ‘नीलम’, ‘मल्लिका’ यात जुलीचे वैशिष्टय़ म्हणजे याचा आकार अंडाकृती किंवा गोलाकार असतो.  नीलमचा आकारही काहीसा काजूसारखा असतो. या फळात रेषे नसल्यामुळे लोकांना तो जास्त आवडतो. मात्र नीलम खूप उशिरा म्हणजे हापूस संपत आल्यावर बाजारात येत असल्यामुळे आंबाप्रेमी त्याच्यावर तुटून पडतात. ‘मनोहर’ आपल्या देशात पंजाब प्रांतातील फळ. चिनी आंबा ‘आयव्हरी’चा आकार हत्तीच्या सोंडेसारखा असतो, तर अमेरिकन ‘गॅरी’ला नारळाचा वास असतो. लखनौचा ‘सफेत’ आंबा आतून पांढरा असतो. निसर्गाचे चमत्कार आणखीन काय. एका आंब्याचे नाव आहे ‘सिंधरी’ याला सिंधी आंबाही म्हटलं जातं. त्याचं उत्पादन सिंध (पाकिस्तान)च्या मीरपूर खास जिल्ह्यतच होतं.

‘रासपुरी’ नावाचा आंबा दक्षिण भारतात खूपच प्रसिद्ध आहे. अगदी रजनीकांतसारखा. हे फळ चवीला अप्रतिम आहेच, पण नावाप्रमाणे यात भरपूर रस असतो म्हणूनच यांचे नामकरण रासपुरी झाले असावे. बरेच मराठी भाषक आंबा म्हणजे हापूस हे डोक्यात ठेवून असतात त्याचप्रमाणे बंगळूरुच्या मंडईत फक्त आणि फक्त रासपुरी विकत घेणारे आम्र शौकीन आहेत. असाच ‘बंगनपल्ले’ हा आंध्र प्रदेशात आपल्या हापूसप्रमाणे प्रसिद्ध आहे. बंगनपल्ले राजवट हे याचे मूळ असल्यामुळे हा आंबा त्याच नावाने ओळखला जातो. याशिवाय जंगलात असणारा जंगली, कलम करून तयार झालेला कलमी, देशी, रायवळ. चौसा जो फक्त चोखूनच खाल्ला जातो, तोता म्हणजेच पोपटाच्या नाकासारखा दिसणारा तोतापुरी, जो फक्त चिरून किंवा कापूनच खाल्ला जातो. जगभरात आंब्याच्या ४०० च्या वर प्रजाती आहेत.

आंबा हा फक्त जिव्हेचे चोचले पुरवत नसून शरीरासाठीही अत्यंत गुणकारी आहे. मुख्य म्हणजे बलवर्धक आहे आणि पोटाच्या अनेक विकारांवर उपायकारक आहे. आंबा खाल्ल्यामुळे शरीराला व्हिटॅमिन अ, इ, उ, ए आणि ड मिळतं. आंब्यात मँगीफेरीन नावाचे अँटिऑक्सिडंट असतं, तसंच पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे हृदयसंबधी रोग होण्याची शक्यता कमी असते. आणि हे सर्व गुण असल्यामुळे आंब्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढते. आयुर्वेदानेही आंबा श्वास, त्वचा आणि आमाशयासाठी उपयुक्त मानला आहे. खरं तर आंबा नावातच गोडवा आहे. केळी, सफरचंद, पपई आणि अनेक फळं वर्षभरच हजर असतात, पण आंबा दोन महिन्यांसाठीच येतो आणि सगळ्यांची विकेट काढतो.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 


पळसाचे झाड

उन्हाळा सुरू झाला की, झाडांना पानगळ लागते आणि निष्पर्ण वृक्षांचे सांगाडेच उरतात. अशा या नजर भाजणाऱ्या उन्हात बहरणारी झाडे तशी मोजकीच असतात. या दिवसांत पळस आपले लक्ष वेधून घेतो. पळस म्हणजे पलाश वृक्ष; रानाचा अग्नी. इंग्रजीत तर त्याला ‘फ्लेम ऑफ फॉरेस्ट’असे म्हटले जाते. पाश्चात्त्य राष्ट्रांत पळस आढळत नाही. ‘बुटिया मोनोस्पर्मा’ हे पळसाचे वनस्पतिशास्त्रीय नाव. त्यातील ‘मोनोस्पर्मा’ या ग्रीक शब्दाचा अर्थ एक बीज असणारा. पळसाला संस्कृतमध्ये ‘पलाश’ असे म्हणतात. ‘पल’ म्हणजे मांस आणि ‘अश’ म्हणजे खाणे. याचाच अर्थ असा, की पलाश म्हणजे मांस भक्षण करणारा वृक्ष. जमिनीवर पडलेल्या लालभडक पळसफुलांना युद्धभूमीवरील रक्तमांसाच्या सडय़ाची उपमा दिल्याचे उल्लेखही प्राचीन साहित्यात आढळतात.

पळसाचे झाड हे मध्यम आकाराचे आणि १२ ते १५ मीटर उंचीचे असते. त्याची वाढ अतिशय मंद होते. वर्षभरात पळसवृक्ष जेमतेम एक फूटच काय तो वाढतो. त्याचे खोड खडबडीत असते आणि पाने आकाराने मोठी व गोल असतात. पाने एका डहाळीवर तीनच्या संख्येत असतात. (‘पळसाला पाने तीन’ ही म्हण त्यावरूनच आली असावी.) पळसाला चपटय़ा शेंगा येतात. त्यांना ‘पळसपापडी’ म्हणतात. पळसाला काळ्या रंगाच्या कळ्या येतात आणि नंतर कळ्यांची फुले होतात. दरम्यानच्या काळात पाने झडतात. तसे पाहिले तर, पळसफुले ही जशी लालभडक असतात, तशीच ती पिवळी आणि पांढरीही असतात. 

पळसफुले दिसायला अतिशय आकर्षक असली तरी झाड मात्र अनाकर्षक असते. आंबा आणि चिंचेचा आकार कसा डेरेदार असतो; पळस मात्र आकारहीन असतो. पळसाच्या झाडाला जसा आकार नाही, तसाच त्याच्या फुलांनाही गंध नाही. पळस फुलतो तेव्हा देशोदेशीचे पक्षी पळसवनात येतात आणि किलबिलाट करीत पळसाच्या झाडावर उतरतात. पळसाच्या फुलांत बराच मध असतो. तो ते प्राशन करतात. याच मधासाठी नंतर मधमाश्याही येतात. मधमाश्यांच्या गुंजारवाने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे हा अनाकर्षक पळस जणू काही ‘गाणारे झाड’च होऊन जातो.

पळसाची झाडे मनुष्यवस्तीचा अभाव असलेल्या मोकळ्या माळरानावर ती आवर्जून दिसतात. जंगलातील जमिनीचा कस कमी होऊ लागला, की पळसाचे प्रमाण वाढते. पळस हे निकृष्ट जमिनीचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात पळस बऱ्यापैकी आढळत असला तरी मध्यप्रदेशात मोठी पळसबने आहेत. पळसाचे झाड फाल्गुन महिन्याच्या आरंभापासूनच बहरू लागते. चैत्रात तर झाडाची सर्व पाने गळून पडतात आणि त्याची जागा फुले घेतात. लालभडक फुलांनी डंवरलेला हा पळसवृक्ष मग पेटल्यासारखा दिसू लागतो. पळसाच्या खोडात सुप्त अग्नी असतो, अशी समजूत आहे. जणू चैत्रारंभी हा अग्नी लालभडक फुलांच्या रूपाने बाहेर पडत असतो. 

प्राचीन संस्कृत साहित्यात आणि धर्मग्रंथांतही पळसाचे अनेक संदर्भ आढळतात. ‘लिंग पुराणा’त पळसाचा उल्लेख ‘ब्रह्मवृक्ष’ असा केला आहे आणि त्याची तीन पाने ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकराचे प्रतिनिधित्व करतात, असेही म्हटले आहे. प्राचीन आणि आधुनिक साहित्यात वारंवार आढळणारा हा पळस लोकव्यवहारातही अतिशय उपयुक्त आहे. पळसाच्या खोडात सुप्त अग्नी असतो, अशी समजूत आहे. त्यामुळे यज्ञविधीत अग्नी प्रज्वलित करण्यासाठी पळसाच्या समीधा वापरतात. आयुर्वेदानुसार पळसाच्या बियांचे चूर्ण अतिसारावर उपयुक्त असते आणि वाजीकरणाच्या औषधातही पळसाचा वापर होतो. पळसाच्या पत्रावळीत केलेले भोजन चांदीच्या पात्रात केलेल्या भोजनाइतकेच आरोग्यदायी असते. पळसफुलांपासून रंग तयार करतात आणि तो रंग आदिवासी होळीच्या सणात वापरतात. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 

Monday 6 February 2023

भाजीपाला विक्रेता बनला मराठी चित्रपटाचा 'नायक'


सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर छोटंसं गाव आहे शिंदेवाडी. साधारण दोन हजार लोकवस्ती असलेल्या या गावातला एक तरुण आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मराठीचा रुपेरी पडदा गाजवतोय. त्याचं नाव आहे प्रशांत यशवंत बोदगिरे. उदरनिर्वाहासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत त्याने आपली अभिनय कला जोपासली आहे. आज तो 'रगील' या चित्रपटाद्वारे अभिनेत्याची प्रमुख भूमिका साकारतोय. 'रगील' 19 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

आवड असली की सवड मिळतेच. घरची परिस्थिती हालाखीची असतानाही प्रशांत बोदगिरेने अभिनयाची आवड जोपासली. त्याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला लहानपणापासूनच कला क्षेत्राची आवड आहे. कवठेमहांकाळ येथील महांकाली हायस्कूलमध्ये त्याचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. महात्मा गांधी विद्यालयातून अकरावी आणि बारावी पूर्ण केल्यानंतरही आता तो पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. 'माझा छकुला' हा चित्रपट त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरला. तेव्हापासूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. शाळा, महाविद्यालयात त्याने नाटक, स्नेहसंमेलन या माध्यमातून आपली ही कला जोपासली आहे. त्याच्या जिद्द आणि चिकाटीमुळेच तो मोठ्या पडद्यावरच्या नायकाच्या भूमिकेपर्यंत पोहचला आहे. रगील व्हावं, असा विचार मांडणाऱ्या ‘रगील’ या चित्रपटाचा टीजर अलिकडेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. देवा प्रॉडक्शननिर्मित दीपक आहेर यांनी  ‘रगील’ . या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यात ग्रामीण भागातील एक प्रेमकथा मांडण्यात आली आहे. प्रशांतसह शिवानी कथले, प्रणव रावराणे, अर्णव आहेर, दीपक आहेर, प्रेमा किरण भट, अक्षय गवस, सुदर्शन बोडके आदींच्या प्रमुख भूमिका चित्रपटात आहेत. 

Monday 23 January 2023

हरियाणा: महिला कुस्तीपटूंची खाण

ज्या हरियाणात देशातल्या सर्वाधिक भ्रूणहत्त्या नोंदल्या जातात, त्याच हरियानामध्ये आज देशातल्या ‘टॉप टेन’मधील आठ महिला कुस्तीपटू आहेत. पुरुषप्रधान खाप पंचायतीचे वर्चस्व असलेल्या हरियाणातून इतक्या मोठ्या संख्येने महिला कुस्तीपटू पुढे येणे आणि थेट राष्ट्रकुल, ऑलिम्पिक अशा विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारणे ही बाब चमत्कारापेक्षा कमी नाही. जिथे मुली आणि महिलांना तोंडावर पदर घेऊनच घरी-दारी वावरावे लागते, स्त्रियांच्या आयुष्याचे निर्णय पुरुषच घेतात, त्या प्रांतात स्त्रियांना कुस्ती खेळण्याची परंपरा रुजवणे ही बाब सोपी नव्हती. भारताचे नाव सुवर्णाक्षरात कोरताना अनेक अडचणी, संकटांचा सामना करावा लागतो. कुस्तीचे मैदान मुलांनीच का मारायचे मुलींनी का नाही? असा प्रश्न भिवानी येथील महावीर सिंह फोगट या मल्लाच्या डोक्यात येतो. माझ्या मुलींनी कुस्तीत नाव कमवावे म्हणून ते स्वत:च प्रशिक्षक बनतात. प्रतिस्पर्धी तुल्यबळ असावा म्हणून हरियानाच्या रुढी परंपरा झुगारत ते मुलींना कुस्तीगीर मुलांसोबत लढवतात. त्यांच्यासोबत सराव करवतात, कुस्तीचे डावपेचही शिकवतात. यात मुली यशस्वी होतात. फोगट कन्यांचे नाव आसमंतात दुमदुमते. महावीर फोगट यांच्या कमालीच्या जिद्दीला सुपरस्टार अमीर खानही सलाम ठोकतो. त्यातूनच २०१६मध्ये ‘दंगल’ चित्रपटाची निर्मिती होते. फोगट कन्यांच्या यशाप्रमाणे मुलींना कुस्तीक्षेत्रात नाव काढण्यासाठी हा चित्रपट वेड लावतो.  या सगळ्या मुलींचा एकच मंत्र असतो तो म्हणजे जिद करों, दुनिया बदलों!

साक्षी मलिक ही महिला कुस्तीपटू, २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक मिळवून शब्दश: भारताची इभ्रत राखते. वयाच्या बाराव्या वर्षापासून ती कुस्तीचे धडे गिरवते. २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. गीता फोगट ही महान कुस्तीपटुंपैकी एक. ज्या वेळी मुलींनी कुस्ती खेळण्याची मानसिकता नव्हती अशावेळी गीताने अनेक अडचणींवर मात करून २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. विनेश फोगट ही भारतातील सर्वात आश्वासक महिला कुस्तीपटुंपैकी एक. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकले. अंशू मलिकने वयाच्या एकविसाव्या वर्षी जगभरात नाव कमावले.

तिने २०२१च्या ओस्लो जागतिक कुस्ती स्पर्धेत रजत पदक पटकावले. फोगट कुटुंबातील बबिता कुमारीने २०१४च्या ग्लासगो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नवोदित कुस्तीपटू निशा दहिया हिने २०२१मध्ये जागतिक स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकले. गीतिका जाखड़ हिने २००६मध्ये दोहा आशियाई आणि २०१४ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रजत पदक जिंकले. या सर्वच कुस्तीगीर महिला हरियानातील आहेत. याशिवाय देशातील अन्य राज्यातील काही महिला कुस्तीपटुंनीही जागतिक पातळीवर पदके पटकावली आहेत. परंतु हरियानातील विशेषत: रोहतक, भिवाणी, हिसार, सोनीपत, जिंद, कर्नाल भागातील तरुणींमध्ये ‘विनींग इज द ओन्ली ऑप्शन’ची अनुभूती दिसते. मैदानात कसब दाखविण्याची प्रत्येकीची स्पर्धा स्वत:शीच लागली आहे. काही वर्षांपूर्वी या शहरातील शाळांच्या मैदानांवर, क्रीडा संकुलात सकाळी, सायंकाळी पुरुषच दिसायचे, अपवादानेच मुली! आता मुलींची गर्दी वाढली. कोणी कुस्ती, कोणी कबड्डी, कोणी कराटे तर कोणी मुष्टीयुद्धाचा सराव करताना दिसताहेत.रोहतक जिल्ह्यातले मोखरा हे १८ हजार लोकवस्तीचे गाव जगात पोहचले आहे. त्याने आतापर्यंत पन्नासवर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महिला-पुरूष कुस्तीगीर दिले आहेत. गावातील शेकडो कुस्तीगीर सीमेवर देशरक्षणार्थ ठाकले आहेत. येथील अनेक कुस्तीपटू हरियाणा पोलिसांत कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बजावत आहेत. लष्करातून निवृत्त झालेले निस्वार्थभाव ठेवत गावातील मैदानांवर मुलींना-मुलांना कुस्ती, कबड्डी, कराटे, मुष्टीयुद्धाचे डावपेच शिकवतात. त्यांची जिद्द हीच की, या गावाचे नाव देश-परदेशात कायम राहावे. साक्षी मलिक याच गावातील. तिचा जन्म इथेच झाला. साक्षीच्या गावाप्रमाणेच हरियानातील प्रत्येक जिल्हा, तालुक्याचे चित्र आहे. फोगट भगिनी, साक्षी, अंशु मलिक यांचे यश पाहता हरियानातील प्रत्येक मैदानावर कुस्तीच्या आखाड्यात मुलांपेक्षा मुलींच अधिक दिसतात. गेल्या पंधरा वर्षांतली हरियानातील कुस्तीपटू मुलींची कामगिरी देशासाठी अभिमानास्पद आहे.

Tuesday 3 January 2023

सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान


1. कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो : दूध 

2. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? : ड जीवनसत्व 

3. सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किती अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात? : 99 टक्के 

4. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? : 0 अंश सेल्सिअस

5. 'पेनिसिलीन' पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? : फ्लेमिंग 

8. काकडी किंवा टरबूज फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? 92 टवके

9.  कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? अतिसार, कावीळ, विषमज्वर 

10. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? : कार्बन डायऑक्साईड 

11. रक्ताक्षय ( Anemia) कशाच्या कमतरतेमुळे होतो? : लोह 

12. रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? : सल्फ्युरिक ऍसिड 

13. पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? : क्लोरीन 

14. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ? : व्हायरॉलॉजी 

15. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली? : कोलकाता 

16. बीसीजी लस कोणत्या रोगापासून बचाव करते? : क्षयरोग 

17. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? : पोलाद 

18. वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ? : 0.04 टक्के 

19. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या वस्तूमानावर अवलंबून असते? 

20. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? : क जीवनसत्व 

21. निद्रानाश रोग कोणता जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो? : ब जीवनसत्व