1) मनापासून प्रयत्न करणार्याला सर्व साध्य आहे.-यदुनाथ थत्ते
2) करंट्यास आळस आवडे। यत्न कदापि नावडे।
त्याची वासना वावरे। अधर्मी सदा।- समर्थ रामदास
3) भावनेच्या रंगाने रंगलेली बुद्धी
म्हणजेच काव्य होय.-प्रो.विल्सन
4) अनिवार्य भावनेचा सहजस्फूर्त उद्रेक
म्हणजे कविता होय.- वर्डस्वर्थ
5) नास्तिकांच्या मते ईश्वर म्हणजे शून्य आहे व आस्तिकांच्या मते पूर्णविराम आहे.- स्वामी रामतीर्थ
6) मुंगीपाशी जा. तिच्यापासून उद्योग शिका व शहाणे व्हा.- ओल्ड टेस्टामेंट
7) क्रोधी बनून पापाचे भागीदार बनण्यापेक्षा,
पापाविषयी राग येऊ द्या.- जॉन वेबस्टर
8) कला ही भूतकाळाची कन्या. वर्तमानकाळाची पत्नी व भविष्यकाळाची माता असते.-वि.स.खांडेकर
9) आळस ही मी एकप्रकारची आत्महत्याच
समजतो.- सिसेरी
10) कोणताही भार आनंदाने उचलला की तो हलका
होतो.- ओविद
11) प्रसन्नता हे परमेश्वराने दिलेले औषध आहे.- स्वेट मॉर्डन
12) सतत परिश्रम केल्यानेच मनुष्याचे जीवन
सुखी बनते.-एअस्किन बॉन्ड
13) असत्य कितीही ठासून सांगितले तरी ते
कधीही सत्य बनू शकत नाही.-भर्तृहरी
14) ईश्वर निराकार
आहे;परंतु तो भक्तांच्या आर्त प्रार्थनेनुसार स्वत:च्या शक्तीने वेगवेगळी रूपे धारण करतो.-दयानंद सरस्वती
15) एक सत्य लपवण्यासाठी हजारदा खोटे बोलावे
लागते.- आर्य चाणक्य
16) असत्याची अनेक रूपे असतात,तर सत्याचे फक्त एकच रूप असते.-रुसो
17) अहंभाव करील सम। तेणे पावसी विश्राम
रे।- संत ज्ञानेश्वर
18) तुमचा अहंकार दुसर्यांना कदाचित डंख करेल; परंतु तुमचे मात्र अध:पतनच करेल. कन्फ्युशियस
19) ऊृक्ष फार कवति फळभारे, लोंबती जलद घेऊनि नीरे, थोर गर्व न धरी विभवाचा,
हा स्वभाव उपकार परांचा।-वामन पंडित
20) अहंकार माणसाला फुलवतो; परंतु त्याला कधीही आधार देत नाही.-रस्किन बॉन्ड
21) असत्य बोलणे तलवारीच्या जखमेप्रमाणे
असून जखम भरली तरी त्याची खूण कायम राहते.-शेख सादी
22) आनंदाचा स्त्रोत तुमच्याजवळ आहे,
त्याचा इतरत्र शोध घेऊ नका.-स्वामी रामतीर्थ
(मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या संग्रहातून)
No comments:
Post a Comment