प्रश्न 1.खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.प्राचीन भारतातील विद्यापिठाची यादी करा.
उत्तर- प्राचीन भारतातील विद्यापीठे- तक्षशिला विद्यापीठ,वाराणसी, वलभी, नालंदा विद्यापीठ, कांची
2.कोणकोणत्या प्राचीन भारतीय वस्तूंना परदेशात मागणी असे,त्याची यादी करा.
उत्तर- तलम कापड, हस्तिदंत, मौल्यवान रत्ने, मसाल्याचे पदार्थ, उत्कृष्ट बनावटीची मातीची भांडी इत्यादी भारतीय वस्तूंना परदेशात खूप मागणी असे.
2. नावे लिहा.
अ) प्राचीन भारतातील महाकाव्ये....
उत्तर- रामायण,महाभारत
प्रश्न 3.रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(1) रामायण हे महाकाव्य .............. ऋषींनी रचले.
उत्तर-वाल्मिकी
(2) भारतीय वैद्यकाशास्त्राला ............ असे म्हटले जाते.
उत्तर- आयुर्वेद
(3) हजारो विद्यार्थ्यांची राहण्याची सोय............ विद्यापीठात होती.
उत्तर-नालंदा विद्यापीठ
प्रश्न 4.थोडक्यात उत्तरे लिहा.
(1) तिपिटक म्हणजे काय ते स्पष्ट करा.
उत्तर-तिपिटकामध्ये तीन पिटके आहेत.पिटक म्हणजे पेटी.याठिकाणी त्याचा अर्थ 'विभाग' असा आहे. 1. सुत्तपिटक- यामध्ये गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत. 2.विनयपीटक-यामध्ये भिक्खू आणि भिक्खूनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत.3.अभिधम्मपिटक- यात गौतम बुद्ध धर्माचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले आहे.
(2) भगवद्गीतेत कोणता संदेश दिला आहे?
उत्तर-'भगवद्गीता' हा हिंदुचा पवित्र ग्रंथ आहे. तो महाभारताच एक भाग आहे. फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असा संदेश दिला आहे.
(3) आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे?
उत्तर- आयुर्वेदात रोगांची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे.
(4) संघम साहित्य म्हणजे काय?
उत्तर-संघम म्हणजे विद्वान साहित्यिकांची सभा. या सभांमध्ये संकलित झालेले साहित्य 'संघम साहित्य' म्हणून ओळखले जाते.
प्रश्न 5.चर्चा करा.
मौर्य आणि गुप्त काळातील स्थापत्य व कला.
उत्तर- मौर्य आणि गुप्तकाळात भारतीय स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला.सम्राट अशोकाने ठिकठिकाणी उभारलेले दगडी स्तंभ ही भारतीय शिल्पकलेची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. सांची येथील स्तूप आणि उदयगिरी, खंडगिरी, कार्ले, नाशिक, अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणच्या लेण्यांमधून तीच परंपरा अधिकाधिक विकसित होत गेली, असे दिसते. गुप्तकाळात भारतीय मूर्तिकलेचा विकास झाला. दक्षिण भारतात चालुक्य आणि पल्लव राजसत्तेच्या काळात मंदिर स्थापत्याचा विकास झाला. महाबलीपूरमची मंदिरे त्याची साक्ष देतात. पल्लव राजसत्तेच्या काळात देवदेवतांच्या कांस्यमूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. दिल्ली जवळील मेहरौली येथे असलेल्या गुप्तकालीन लोहस्तंभाच्या आधारे प्राचीन भारतीयांचे धातुशास्त्राचे ज्ञान किती प्रगत होते, हे समजते.
प्रश्न 6.एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.प्राचीन भारतात कोणकोणत्या भाषामधून साहित्यनिर्मिती झाली?
उत्तर- संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तमिळ अशा भाषामधून साहित्यनिर्मिती झाली.
2.संघम साहित्यात कोणती महाकाव्ये प्रसिद्ध आहेत?
उत्तर- सिलप्पधिकरम आणि मणीमेखलाई ही संघम साहित्यातील महाकाव्ये प्रसिद्ध आहेत.
3.जैन आगमग्रंथ कोणकोणत्या भाषामध्ये लिहिला आहे?
उत्तर-जैन आगमग्रंथ हा अर्धमागधी, शौरसेनी, माहाराष्ट्री अशा प्राकृत भाषामध्ये लिहिला आहे.
No comments:
Post a Comment