Thursday 18 November 2021

5.जिल्हा प्रशासन (इयत्ता सहावी नागरिकशास्त्र) प्रश्नोत्तरे


प्रश्न 1.खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

उत्तर-जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो.

2.जिल्हाधिकारी यांना कोणकोणती कामे करावी लागतात?

उत्तर- शेती:-शेतसारा गोळा करणे, शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे, दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यांवर उपाययोजना करणे. कायदा व सुव्यवस्था- जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करणे, सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे.सभाबंदी, संचारबंदी जारी करणे.निवडणूक अधिकारी- निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे.निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक निर्णय घेणे. मतदार याद्या अद्ययावत करणे. आपत्ती व्यवस्थापन- आपत्तीच्या काळात त्वरित निर्णय घेऊन हानी रोखणे. आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेला आदेश देणे. आपत्ती ग्रस्तांचे पुनर्वसन करणे.

3.पोलीस अधीक्षक कोणत्या ठिकाणी असतात?

उत्तर- महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो.

4.जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱयांना कोणती मदत करतात?

उत्तर- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकाऱयांना मदत करतात. 

5.जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला काय म्हणतात?

उत्तर- जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला 'जिल्हा न्यायालय' म्हणतात?

6.तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते?

उत्तर-प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते.

7.न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते?

उत्तर-न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते.

8.कोणकोणत्या आपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते?

उत्तर-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची पूर्वसूचना मिळू शकते.उदाहरणार्थ-पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.

प्रश्न2- जोड्या जुळवा

अ गट-(अ) जिल्हाधिकारी (आ) जिल्हा न्यायालय (इ) तहसीलदार

ब गट- (1)तालुका दंडाधिकारी (2)कायदा व सुव्यवस्था राखणे (3) तंटे सोडवणे

उत्तर-(अ) तालुका दंडाधिकारी-तंटे सोडवणे (ब) जिल्हा न्यायालय-  तंटे सोडवणे 

(क) तहसीलदार-तालुका दंडाधिकारी

प्रश्न 3.खालील मुद्द्यांवर चर्चा करा.

1)आपत्ती व्यवस्थापन

उत्तर- आपल्याला वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. पूर,आग, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट, भूकंप, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबरच दंगली, धरण फुटणे, बॉंबस्फोट, साथीचे आजार यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या आपत्तींमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते.त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला 'आपत्ती व्यवस्थापन' असे म्हणतात. आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची पूर्वसूचना मिळू शकते.उदाहरणार्थ-पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.

No comments:

Post a Comment