Monday 11 July 2022

धार्मिक समन्वय: इयत्ता सहावी व स्पर्धा स्पर्धेसाठी उपयुक्त

 


1.भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते?

उत्तर- भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

2.भारतीय संविधानाने कोणते तत्त्व स्वीकारले आहे?

उत्तर- भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे?

3.दक्षिण भारतात कोणत्या भक्ती चळवळी उदयास आल्या?

उत्तर- दक्षिण भारतात नायनार आणि अळवार या  भक्ती चळवळी उदयास आल्या.

4.दक्षिण भारतात कोणी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला?

उत्तर- दक्षिण भारतात रामानुज यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला?

5.उत्तर भारतात कोणत्या संताने भक्तीचे महत्त्व सांगितले?

उत्तर- उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले.

6.भक्ती चळवळीतील एक विख्यात संत कोण?

उत्तर- संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत.

7.सर्व मानव एक आहेत, अशी शिकवण कोणत्या संताने दिली?

उत्तर- सर्व मानव एक आहेत, अशी शिकवण संत कबीर यांनी दिली.

8.बंगालमध्ये कोणत्या संताने कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले?

उत्तर- बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले?

9.आसाममध्ये कृष्णा भक्तीचा प्रसार कोणी केला?

उत्तर- आसाममध्ये संत शंकरदेव यांनी कृष्णभक्तीचा प्रसार केला.

10. गुजरातमध्ये कोणते प्रसिध्द वैष्णव संत होऊन गेले?

उत्तर-गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिध्द वैष्णव संत होऊन गेले.

11.संत मीराबाईंनी कोणाचा महिमा सांगितला?

उत्तर- संत मीराबाईंनी कृष्णभक्तीचा महिमा सांगितला.

12.राजघराण्यातील सुखांचा त्याग करून कृष्णभक्तीत तल्लीन झालेल्या संत कोणत्या?

उत्तर- राजघराण्यातील सुखांचा त्याग करून कृष्णभक्तीत तल्लीन झालेल्या संत मीराबाई होत.

13.मीराबाई यांची भक्तिगीते कोणकोणता संदेश देणारी आहेत?

उत्तर- मीराबाई यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत.

14. संत रोहिदास यांनी कोणता संदेश दिला?

उत्तर-संत रोहिदास यांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला.

15.हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले?

उत्तर- हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सुरसागर हे काव्य लिहिले.

16. कोणी लिहिलेली कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत?

उत्तर- मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत.

17. संत तुलसीदासांच्या कोणत्या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो?

उत्तर- संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो.

18. कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी कोणत्या विचारधारेचा प्रसार केला?

उत्तर- कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला.

19.संत बसवेश्वर यांचे कोणते वचन प्रसिद्ध आहे?

उत्तर- संत बसवेश्वर यांचे 'कायकवे कैलास'  हे वचन प्रसिद्ध आहे?

20.तेराव्या शतकात चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात कोणता पंथ प्रवर्तित केला?

उत्तर-तेराव्या शतकात चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात 'महानुभाव' पंथ प्रवर्तित केला?

21.चक्रधरस्वामी यांचे गुरू कोण?

उत्तर- श्रीगोविंदप्रभू हे चक्रधरस्वामी यांचे गुरू होत.

22.महानुभाव पंथाचा प्रसार प्रामुख्याने कोणत्या भागात झाला?

उत्तर-महानुभाव पंथाचा प्रसार प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला.

23.म्हाइंभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लिळांचे वर्णन करणारा ग्रंथ कोणता?

उत्तर-म्हाइंभट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लिळांचे वर्णन करणारा ग्रंथ लीळाचरित्र.

24.शीख धर्माचे संस्थापक आणि पाहिले गुरू कोण?

उत्तर-शीख धर्माचे संस्थापक आणि पाहिले गुरू गुरुनानक होत.

25.गुरुनानक यांची शिकवण कोणती होती?

उत्तर- सर्वांशी सारखेपणाने वागावे,अशी गुरुनानक यांची शिकवण होती.

26.शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता?

उत्तर- 'गुरुग्रंथसाहिब' हा शिखांचा पवित्र ग्रंथ होय.

27.गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथामध्ये कोणकोणत्या संतांच्या रचनांचा समावेश आहे?

उत्तर-गुरुग्रंथसाहिब' या ग्रंथामध्ये गुरुनानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे.

28.शिखांचे दहावे गुरू कोण?

उत्तर- गुरू गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरू होत.

29.परमेश्वर प्रेममय आहे.प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहचता येते अशी कोणत्या साधूंची श्रद्धा होती?

उत्तर-परमेश्वर प्रेममय आहे.प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती.

30.भारतीय संगीतात कोणत्या संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे?

उत्तर-भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे?

(इयत्ता सहावी आणि स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त: इयत्ता सहावी इतिहास व नागरिकशास्त्र-3 धार्मिक समन्वय पाठ)

No comments:

Post a Comment