Monday 2 November 2020

सोडून द्यावं


एकदोन वेळा समजावून सांगूनही पटत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्यावं. विनाकारण त्यांच्यापुढं आपलं डोकं खराब करण्यात अर्थ नाही. जर काही माणसं ऐकूनही न ऐकल्यासारखं करत असतील  तर आपण त्यांच्याशी उगाचंच संवाद साधणं सोडून द्यावं. मुलं मोठी झाल्यावर स्वतंत्रपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यावं. आपल्यासाठी ते चांगलेच आहे.तसेच एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवली तर मनावर घेणं सोडून द्यायला हवं. आणखी एक महत्त्वाचा सल्ला- आपल्या हातात काही नाही; हा अनुभव आल्यावर इतरांची वा भविष्याची चिंता करणं सोडून द्यावं. आणि  स्वतःला जोखता आलं पाहिजे. ईच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडू लागला तर स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यायला हवं. फार डोक्याला ताप करून घ्यायचा नाही. प्रत्येकाचं जीवनचित्र वेगळं, आकार, रंग सगळंच वेगळं म्हणूनच म्हटलं जातं की, तुलना करणं सोडून दिलं पाहिजे. आणि आनंदाने जगताना आयुष्याने एवढा अनुभवाचा खजिना देऊन संपन्न केल्यानंतर रोज जमाखर्चाची मांडणी करणं सोडून द्यावं.

●●●●●●●

गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.  ते म्हणाले,''मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत: 

कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. 

'मी व्हिस्की पितो' किंवा 'मी रम पितो'

या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?'

झम्पू : तरतरी प्रयोग..!

गुरूजींनी व्याकरणाची पुस्तके जाळली! 

●●●●●●●

घरी जाताना, मोबाईल पाहत जात होतो.शेजारच्या घरात कधी गेला  कळलेच नाही वॉट्सअँपच्या नादात! 

आणि आश्‍चर्य म्हणजे, त्या घरातील बाईने चहा आणून दिला, सिरीयलच्या नादात.. आणि नंतर थोड्या वेळाने!

मी चहा पित असताना तिचा नवरा आला घरात आणि

मी दिसताच सॉरी घर चुकले म्हणून  बाहेर निघून गेला फेसबुकच्या नादात..

●●●●●●●

मुलगा : लगीन करते का माझ्यासंग? 

मुलगी : का? 

मुलगा : लय फेमस आहे मी?  पूर्ण भारत शोधून राहिलाय मला

मुलगी : कोण रं रं रं तू?

मुलगा : म्या विकास होय...!

No comments:

Post a Comment