Thursday 29 April 2021

प्लॅस्टिकविषय अधिक जाणून घ्या


दैनंदिन जीवनामध्ये आपण प्लॅस्टिक वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. प्लॅस्टिक हा कार्बन मुख्य घटक असलेला पेट्रोलियम पदार्थ आहे. हा पदार्थ खनिज तेलापासून तयार होतो. वजनाला हलके, न गंजणारे, टिकाऊ, जाडी आणि विविध आकार घेण्याची क्षमता या कारणांमुळे प्लॅस्टिकचा वापर वाढत आहे. आज निष्काळजीपणामुळे प्लॅस्टिक प्रदूषण म्हणून जागतिक समस्या तयार झाली आहे. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून टाकाऊ अन्न, वस्तू फेकून देतो. त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्य, पाळीव प्राणी, अन्य वन्यजीवांवर होत आहे. कारण प्लॅस्टिक वस्तू टाकाऊ झाल्यावर ते कुजत नाही, त्यामुळे नष्ट करता येत नाही.

भारतामध्ये प्लॅस्टिकचा वापर विविध क्षेत्रांमध्ये होतो. एकूण वापरापैकी ८ टक्के इमारती, २४ टक्के पॅकिंग, १६ टक्के इलेक्ट्रॉनिक्स, ४ टक्के वाहतूक, १ टक्का फर्निचर, २३ टक्के शेती, १० टक्के घरगुती आणि १४ टक्के इतर क्षेत्रामध्ये वापर होतो.
भारतामध्ये सरासरी ११ किलो प्रति माणशी, प्रति वर्षी प्लॅस्टिक वापरले जाते. परंतु अमेरिकेमध्ये दहापट म्हणजे ११० किलो प्रति माणशी, प्रति वर्षी प्लॅस्टिक वापरले जाते. सन २०१७-१८ च्या अहवालानुसार भारतामध्ये अंदाजे १६.५ दशलक्ष टन एवढे प्लॅस्टिक वापरले गेले. जगामध्ये प्लॅस्टिकबंदीवर गांभीर्याने विचार केला जात आहे. बांगलादेशमध्ये २००२ मध्ये प्लॅस्टिक पिशवी वापरावर बंदी घालण्यात आली.
सिक्कीममध्ये १९९८ पासूनच प्लॅस्टिक बंदी आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये शासनाने ४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर (वापर आणि विक्री) बंदी घातली आहे.
प्लॅस्टिकचे प्रदूषण
•जागतिक पातळीवर दरवर्षी ३०० दशलक्ष टन प्लॅस्टिक निर्माण होते, त्यापैकी ५० टक्के एकदाच वापरासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक वस्तू थोड्या कालावधीसाठी
वापरतो. जगामध्ये दर मिनिटाला १० लाख प्लॅस्टिक बाटल्या विविध कारणांसाठी खरेदी केल्या जातात. दर दिवशी २.७ लाख प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात.
• जगामध्ये जेवढ्या वस्तू पॅकेजिंग करतो, त्यापैकी ३७ टक्के प्लॅस्टिकचा वापर होतो. दरवर्षी चीन ६० दशलक्ष टन, अमेरिका ३८ दशलक्ष टन, जर्मनी १४.५ दशलक्ष टन, ब्राझील १२ दशलक्ष टन या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर होतो.
• जगाचा विचार केला तर प्लॅस्टिकचा वापर आणि त्यामुळे होणारे प्रदूषण आशियायी देशांमधून होते. चीन, इंडोनेशिया, फिलीपाईन्स, श्रीलंका आणि व्हिएतनाम या देशात जास्त प्रमाणात प्लास्टिक प्रदूषण झाले आहे.
• फक्त ५ टक्के प्लॅस्टिक कचरा पुनर्वापर प्रक्रियेसाठी गोळा केला जातो. उर्वरित ९०-९५ टक्के तसेच जमिनीवर राहते किंवा पाण्यावर तरंगत असते.
• सद्यःस्थितीत जगामध्ये ३०० दशलक्ष टन प्लॅस्टिक निर्माण होते. सरासरी ९० टक्के प्लॅस्टिक वस्तू आपण एकदाच वापरून फेकून देतो.त्यापैकी वापर
झाल्यानंतर ९० टक्के जमीन आणि १० टक्के महासागरामध्ये जाते. तज्ञांच्या मते जागतिक पातळीवर १०० दशलक्ष टन एवढा प्लॅस्टिक कचरा समुद्रामध्ये आहे. त्यामध्ये दरवर्षी अंदाजे आठ दशलक्ष टन एवढा प्लॅस्टिक कचरा महासागरामध्ये जमा होतो. जलभागाचा विचार केला तर आज महासागरामध्ये सरासरी ४० टक्के क्षेत्रावर, ९० टक्के इतका प्लॅस्टिक कचरा पाण्यावर तरंगताना तसेच किनाऱ्यावर आढळतो, जो ८० टक्के जमिनीवरून महासागरामध्ये जातो. जमीन किंवा पाण्यात असले तरी प्लॅस्टिक नष्ट होत नाही. प्लॅस्टिक जाळले तर हवेत प्रदूषण होते. विषारी घातक पदार्थ या प्लॅस्टिकच्या विघटनामधून बाहेर पडतात. ज्यामुळे जमीन, पाणी तसेच हवा प्रदूषित होत आहे. प्लॅस्टिक प्रदूषणाचा मानवी तसेच इतर जलचर प्राण्यांवर प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरीत्या परिणाम होतो. भूगर्भातील पाणीसुद्धा प्रदूषित होत आहे. नद्या, तलाव, समुद्रामध्ये प्लॅस्टिक प्रदूषण झाले आहे. या प्रदूषण लाखांपेक्षा जास्त समूद्रजीव मृत्यूमुखी पडतात.
• महासागरामध्ये मोठ्या प्रमाणावर तरंगणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे सागरी जीवसृष्टीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. समुद्रकिनारी मासे पुनरूत्पादनासाठी ज्या जागांचा उपयोग करतात अशा जागासुद्धा प्लॅस्टिकबाधित आहेत. दरवर्षी १० लाखांपेक्षा जास्त समुद्रजीव मृत्यूमुखी पडतात.
• महासागरामध्ये मोठ्या प्रमाणावर तरंगणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे सागरी जीव सृष्टीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. समुद्रिकिनारी मासे पुनरुत्पादनासाठी ज्या जागांचा उपयोग करतात अशा जागासुद्धा प्लॅस्टिकबाधित आहेत. (अनिकेत फिचर्स)

No comments:

Post a Comment