Saturday 18 February 2023

महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली?

 प्रश्न 1: महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली?

उत्तर- महाराष्ट्राचे 23 वे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांनी 18 फेब्रुवारी 2023 रोजी शपथ घेतली. 

प्रश्न 2: जीएसटी परिषदेने राज्यांना किती रुपयांची थकीत नुकसानभरपाई देण्यास मान्यता दिली? 

उत्तर- राज्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी जून 2022 पर्यंतची थकीत नुकसानभरपाई 16 हजार 982 कोटी  रुपये देण्यास मान्यता दिली.

प्रश्न 3: द्राक्ष उन्हाळ्यातील सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.

उत्तर- द्राक्ष खाल्ल्यामुळे शरीरात गारवा व शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी चांगली मदत होते. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी द्राक्ष फायदेशीर आहेत. म्हणून द्राक्ष उन्हाळ्यातील सर्वश्रेष्ठ फळ मानले जाते.

प्रश्न 4: द्राक्षदिन कोनात्यादिवशी मानण्यात येतो? 

उत्तर- महाशिवरात्री दिवशी 2023 पासून द्राक्षदिन साजरा करण्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी ठरवले आहे. 

प्रश्न 5: हुतात्मा उद्योग समूहाच्यावतीने देण्यात येणारा अरुण नायकवडी स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

उत्तर- हुतात्मा उद्योग समूहाच्यावतीने देण्यात येणारा अरुण नायकवडी स्मृती पुरस्कार बीजमाता राहीबाई पोपरे यांना जाहीर झाला आहे?

प्रश्न 7: कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी किती चित्ते दाखल झाले आहेत?

उत्तर- दक्षिण आफ्रिकेतून आणखी बारा चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात दाखल झाले आहेत. आता एकूण वीस चित्ते भारतात आहेत. 

प्रश्न 8: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूला आपल्या संघाचा कर्णधार केले आहे?

उत्तर-भारतीय क्रिकेट संघाची सलामीची आक्रमक फलंदाज स्मृती मानधना हिला महिलांच्या आयपीएल स्पर्धमधील संघ असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (आरसीबी) कर्णधारपदावर नियुक्‍त केले आहे. महिलांच्या आयपीएलचे हे पहिलेच वर्ष आहे. स्मृतीला बंगळूरच्या संघाने ३.४० कोटी रुपये खर्च करून, आपल्या संघात घेतले आहे. त्यामुळे ती महिलांच्या आयपीएलमधील सर्वांत महागडी खेळाडू ठरली आहे. 

प्रश्न 9: नाशिकमध्ये किती उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे?

उत्तर-  नाशिकमधील अशोकस्तंभ चौक परिसरात ६१ फूट उंच, २२ फूट रुंदीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला आहे.  

प्रश्न 10: अमूल या १९४६ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दूध सहकारी संस्थेची सत्ता हस्तगत करण्यात कोणत्या पक्षाला यश आले आहे? 

उत्तर- अमूल या १९४६ साली स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दूध सहकारी संस्थेची सत्ता हस्तगत करण्यात भाजपला यश आले आहे. अमूलच्या संचालक मंडळात ११ पैकी नऊ संचालक काँग्रेसचे होते. |त्यापैकी सात जणांनी वेगवेगळ्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसने ' अमूल' ची सत्ता गमावली ' आहे. गुजरातमध्ये १८ दूध सहकारी संस्था आहेत. त्यापैकी केवळ अमूलमध्ये आता काँग्रेसचे दोन  सदस्य उरले आहेत. 




No comments:

Post a Comment