Monday 27 July 2020

विचार करायला लावणारे विचार


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
१ )■ जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
_______________________________
२ )■ आपल्या हातून एखाद्याचे काम होत असेल तर ते निःस्वार्थ बुद्धीने आणि निःसंकोचपणे करा. नेहमी दुसऱ्याला मदत करा दुसऱ्याला त्रास होईल असे कदापि वागू नका.
_______________________________
३ )■ नेहमी स्वतःसोबत पैज लावा, जिंकलात तर *आत्मविश्वास* जिंकेल, आणि हारलात तर *अहंकार* हारेल.
_______________________________
४ )■ पाण्याने भरलेल्या तलावात *मासे* किड्यांना खातात, आणि जर तोच तलाव कोरडा पडला तर *किडे* माश्याना खातात. *संधी* सगळ्यांना मिळते. फक्त आपली *वेळ* येण्याची वाट पाहा_____!
_______________________________
५ )■ एखाद्या व्यक्तीजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर, त्याच्या ओठांवर थोडसं *हसू* आणि डोळ्यात थोडसं *पाणी* नक्कीच आलं पाहिजे____ !
_______________________________
६ )■ तुम्ही स्वतःच्या खांद्यावर डोके टेकून *रडू* शकत नाही आणि स्वतःच स्वतःला आनंदाने *मिठी* ही मारू शकत नाही______ !
*आयुष्य* म्हणजे दुसऱ्यांसाठी जगायची बाब आहे_______ !
_______________________________
७ )■ जगातील सर्वात सुंदर रोपटे *विश्वासाचे* असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या *मनात* रुजवावे लागते______ !
_______________________________
८ )■ वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो की, आपण त्यांच्याशी कशी *झुंज* देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.________ !
_______________________________
९ )■ जगातील कुठलीच गोष्ट *परिपूर्ण* नाही. परमेश्वराने *सोन* निर्माण केलं. चाफ्याची *फुल* सुद्धा त्यानीच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफयाचा *सुगंध*  नसता का देता आला ? अपूर्णतेतही काही मजा आहेच की._______ !
_______________________________
१०)■ दगडात मूर्ती असतेच. त्याचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. आणि मग ह्याच भावनेने माणसाकडे पहा. माणसातही नको असलेला भाग दूर करायला शिका.________!
_______________________________
११ )■ जेव्हा अडचणीत असाल तेव्हा *प्रामाणिक* रहा. जेंव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेंव्हा *साधे* रहा. जेव्हा एखादे पद किंवा अधिकार असेल तेव्हा *विनयशील* रहा. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा *शांत* रहा.________ !
_______________________________
१२ )■ आपण हरवण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस *माणूस* राहत नाही. परतून येत ते *चैतन्य*__________! 
_______________________________
१३ )■ *सोन्याची* एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीच *सोन* करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातून *मोती* काढतात, तर काहीजण त्यातून *मासे* काढतात तर काहीजण फक्त *पाय* ओले करतात. हे *विश्व* पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे *महत्त्वाचे* आहे._______!
_______________________________
१४ )■ तुम्ही कोणासाठी कितीही केले, तरी ते कोठेतरी कमीच पडते. कारण *सत्य* चप्पल घालून तयार होईपर्यत, *खोट* गावभर हिंडून आलेलं असत._________!
_______________________________
१५ )■ प्रेमळ माणस तुम्हाला कधी *वेदना* देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त तुमची *काळजी* घेणं हाच असतो.
_______________________________
१६ )■ जगातील कटू सत्य हेच आहे की, *नाती* जपणारा नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.________!
_______________________________
१७ )■ नेहमी लक्षात ठेवा की, " आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा *बडेजाव* करू नका. भरकटलेल्या जहाजात कितीही *पैसा* असला तरी पिण्याचे *पाणी* मिळत नाही. जमिनीशी जोडलेले राहा.____________!
_______________________________
१८ )■ पदाचा, संपत्तीचा कधीही *गर्व* करू नये.

No comments:

Post a Comment