Thursday 23 July 2020

चंद्रशेखर आझाद

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते.डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखर यांनी  सहभाग घेतला होता. त्यासाठी त्यांना  अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखर यांनी  आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून  ते   "आझाद " हा आडनावाने ओळखले जाऊ लागले. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग , राजगुरू , सुखदेव यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू हे जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला. चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले; मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे, शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले. अत्यंत कमी वेळेत पोशाख , रूप बदलण्यात पारंगत असणारे ,  त्यांचा शौर्य , धाडसाची , पराक्रमाची अशी धास्ती ब्रिटिश पोलीसांना होती त्यांचा मृत्यू नंतर सुद्धा आठ तास    त्यांचा जवळ कोणीही जाण्याची धाडस करत नव्हते . भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले. 

No comments:

Post a Comment