Saturday 18 January 2020

मास्टर विनायक

मास्टर विनायक यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर कर्नाटकी. ख्यातनाम मराठी अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता. जन्म आणि शिक्षण कोल्हापूर येथे. पिंडाचे कलावंत असूनही विनायकरावांना कोल्हापूरच्या विद्यापीठात परिस्थितीमुळे काही काळ शिक्षकाची नोकरी करावी लागली. ते चित्रपटसृष्टीकडे वळले ते प्रथम अयोध्येचा राजा (१९३२) ह्या हिंदी-मराठी प्रभातच्या चित्रपटात नारदाच्या भूमिकेकडे. विनायकरावांनी प्रभात फिल्म कंपनीच्या पाच चित्रपटांत भूमिका केल्या त्यानंतर प्रभात कंपनीचे पुण्यात स्थलांतर झाले; त्यामुळे विनायकरावांनी कोल्हापूर सिनेटोनमध्ये प्रवेश केला.
विनायकरावांना दिग्दर्शनाची पहिली संधी येथेच मिळाली. विलासी ईश्‍वर (१९३५) ही मामा वरेरकरांची गोष्ट अनौरस संततीच्या एका ज्वलंत सामाजिक समस्येवर आधारलेली होती. त्याचे दिग्दर्शन म्हणजे विनायकरावांना एक आव्हानच होते. तथापि वाड्मयाची व चित्रपटमाध्यमाची उत्तम जाण असलेल्या विनायकरावांना ते आव्हान सर्मथपणे पार पाडले. त्याच सुमारास बाबूराव पेंढारकरांनी विनायकराव आणि पांडुरंग नाईक यांच्या भागीदारीतील 'हंस पिर्स'ची स्थापना केली. हंस पिर्सची चार वर्षे म्हणजे अभिनेता आणि दिग्दर्शक या नात्याने विनायकरावांच्या आयुष्यातील सुवर्णकाळच म्हटला पाहिजे. विनायकरावांनी हंस पिर्सकरिता दिग्दर्शित केलेले सर्व चित्रपट, ज्वाला (१९३८) सोडून, सामाजिक होते; परंतु विनायकरावांसारख्या प्रतिभाशाली कलावंताचा त्याला स्पर्श झाल्यामुळे ते अजरामर बनले. त्यांत छाया (१९३६) सारखे गंभीर व सामाजिक समस्यांना स्पर्श करणारे आणि कारुण्याने ओलावलेले चित्रपट जसे होते, तसेच ब्रह्मचारी (१९३८), ब्रॅंडीची बाटली (१९३९) यांसारखे हास्यरसप्रधान चित्रपटही होते. वि. स. खांडेकरांच्या भाषेत सांगायचे तर ढेरपोटी माणसे किंवा तोतर्‍या व्यक्ती या किंवा अशा प्रकारच्या स्थूल विनोदापलिकडे ज्या चित्रपटांची झेप सहसा जाऊ शकत नव्हती. त्यांच्यावर उपहास, उपरोध, विडंबन, शुद्ध विनोद व चतुर कोटीक्रम या सर्वांचा विलास त्यांनी मूर्तिमंत उभा केला होता. हंस पिर्सच्या कारकीर्दीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सल्ल्याने पडद्यावरील इंग्रजी श्रेयनामावलीचे संपूर्णत: मराठीकरण प्रथम विनायकरावांनीच केले. हंस पिर्स बंद झाल्यावर १९४0 साली विनायकराव नवयुग चित्रपट संस्थेत गेले. तेथेही त्यांनी लग्न पहावे करून (१९४0), अमृत (१९४१), सरकारी पाहुणे(१९४२) असे लक्षात राहणारे चित्रपट दिग्दर्शित केले. मास्टर दीनानाथांची चिमुरडी मुलगी लता मंगेशकर हिच्यातील अभिजात कलागुण प्रथम ओळखले ते विनायकरावांनीच व त्यांनीच तिला चित्रपटसृष्टीतही आणले (पहिली मंगळागौर, १९४२). दुर्दैवाने विनायकरावांना तो चित्रपट अर्धवट सोडून जावे लागले.

No comments:

Post a Comment