Saturday 29 August 2020

जयश्री गडकर


अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म २१  फेब्रुवारी १९४२ मध्ये कणसगिरी कारवार जिल्ह्यात  झाला.त्या काळातील नावाजलेले दिग्दर्शक व्ही.  शांताराम यांनी वयाच्या १३ व्या वर्षी म्हणजेच  १९५५ मध्ये ' झनक झनक पायल बाजे ' या  चित्रपटासाठी डांस मध्ये अभिनयाची संधी  दिली.त्या नंतर १९५६ मध्ये अभिनेता राजा गोसावी  सोबत एक डांस केला होता.त्या नंतर साधारण ९  चित्रपटात जयश्री गडकरनी राजा गोसावी बरोबर  चित्रपटात अभिनय केला. 'पावसात उभी जलपरी, मदन मंजिरी,मूर्त लाजरी, डोळ्यामदी ढसली, मला वसंत सेना दिसली.' ही अभिनेता अरूण सरनाईक यांनी जयश्नी गडकर यांना उद्देशून म्हटलेली  खड्या व खणखणीत पहाडी आवाजातील लावणी त्या काळी प्रचंड  गाजली. रेखीव,आकर्षक चेहरा,कपाळावरील रूळणाऱ्या बटा सौंदर्यात भर  टाकत असायच्या,कपाळावरील ठसठसीत कुंकू मग ते कधी चंद्रकोर,तर  कधी पूर्णाकती असो वा आडवी रेष असो.चेहऱ्यावरील सौज्वलता  परिपक्व अभिनय, ग्रामीण भाषेतील लाडीक, व धारदार संवाद,ग्रहीणी व तमासगिर अशा दोन्ही परस्पर विरोधी भूमिका करून चित्रपट क्षेत्रात अभिनय केला. छायाचित्रकार राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांचे काही फोटो काढून स्टुडिओत लावले होते.त्यावेळी दिग्दर्शक दिनकर पाटील यांचे लक्ष त्या फोटोकडे गेले व जयश्री गडकर यांना चित्रपटात अभिनयाची संधी दिली.सन १९७५ मध्ये त्यांचा विवाह नाट्य कलाकार बाळ धुरीशी झाला.पुढे बाळ धुरीने चित्रपटात अभिनय केला आहे.त्यांना अविनाश व विश्वजीत अशी दोन मुले आहेत.जयश्री गडकर यांनी भोजपुरी, गुजराती, हिंदी व मराठी अशा भाषेतील चित्रपटात आपला अभिनय केला आहे.त्यांच्या चित्रपटाची संख्या २५० च्या आसपास आहे.' थांब लक्ष्मी कुंकू लावते ',' बाई मी भोळी","दिसतं तसं नसतं ', 'पंचारती', 'पवनाकाठचा धोंडी ','लाखात अशी देखणी ','वैशाख वणवा' मोहित्यांची मंजुळा ' ,'एक गाव बारा भानगडी' अशी असावी सासू'', अवघाची संसार',  'बाप माझा ब्रम्हचारी', ' गाठ पडली ठका ठका' वगैरे  चित्रपटातून आपल्या कसदार,दमदार अभिनयाने प्रचंड यश मिळवले.' 'मानिनी', 'वैजयंता ', 'सवाल माझा ऐका,"साधी माणसं' या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले.

सामाजिक विषयाचा आशय असलेला गायत्री चित्र निर्मित आणि दिग्दर्शन,कथा,पटकथा,संवाद गाणी योगेश या नावाने काही गाणी भालजी पेंढारकर यांनी लिहीली होती असा चित्रपट म्हणजे ' साधी माणसं ' त्याकाळी फारच गाजला.त्यामधील जयश्री गडकर यांनी एका गरीब लोहारणीची भूमिका उत्तम रितीने साकारली होती.या चित्रपटाचे वैशिष्ठ म्हणजे यातील सर्व कलावंतानी रंगभूषा न करता कामे केली. महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक साधी माणसं या चित्रपटाला मिळाले होते.तर भालजी पेंढारकर यांनी ' साधा माणूस ' या नावाने स्वतःचे आत्मचरित्र लिहीले व प्रसिध्द केले.डोक्यावर घेतलेल्या पदराला एका विशिष्ठ पध्दतीने ओढून मानेला लाडीक झटका देऊन लाजून लाल होऊन,' जावा तिकडं,आम्ही नाय बोलणार..' असा विशिष्ठ पध्दतील अभिनय लाजवाब असायचा. कितीतरी चित्रपटातील या त्यांच्या अभिनयावर रसिक घायाळ व्हायचे.त्या काळचे चंद्रकांत, सूर्यकांत,राजा गोसावी,अरूण सरनाईक वगैरे वगैरे अभिनेत्यांबरोबर त्यांची जोडी जमली होती.दूरदर्शनवर रामानंद सागर यांची ' रामायण ' ही मालीका प्रचंड गाजली.त्यातील कौसल्याच्या भूमिकेत जयश्री गडकर यांनी आपला भारदस्त अभिनय केला आहे.' अशी मी जयश्री ' या नावाने त्यांनी आत्मचरित्र लिहून सन १९८६ मध्ये प्रसिध्द केले.' अमिरी गरीबी 'लवकुश','कानून अपना अपना ',' ससुराल ','माया बाजार', 'जिओ तो ऐसे जिओ' ,'हर हर महादेव ','एक गांव की कहावी ',' नजराना ',' खूनी दरिंदा ',नागपंचमी ' ' सुलगते अरमान ' या हिंदी चित्रपटात अभिनय समारंभात जयश्री गडकर म्हणाल्या होत्या,' मी किती मोठी कलाकार आहे हे मला समजायला नको,हे माज्या रसिकांना कळायला हवे.नाहीतर माझे पाय जमिनीवर राहणार नाहीत.याची मला भिती वाटते ." एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातील अरूण सरनाईक व जयश्री गडकर यांचेवर चित्रीत केलेली ' कशी गौळण राधा बावरली ' ही गौळण ,व साधी माणसं 'मधील सूर्यकांत व जयश्री गडकर वर चित्रीत केलेले ' ऐरणीच्या देवा तुला...' हे गाणे,व 'सांगते ऐका ' मधील 'बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला...'ही लावणी जयश्री गडकर यांचा अविस्मरणीय अभिनय रसिकांना खूपच आवडला. अशा या महान अभिनेत्रीचा मुंबईत दिनांक २९ ऑगस्ट २००८ रोजी ह्ददय विकाराच्या तीव्र झटक्याने मत्यू झाला.

No comments:

Post a Comment