Tuesday 24 March 2020

मूलभूत गरजांची गरज दाखवणारी गुढी

 आकाशाच्या दिशेने उभारली जाणारी गुढी स्वप्ने गगनाइतकी विस्तीर्ण असण्याचा संदेश देणारी दिसते, तर सोबत जरतारी वस्त्र, कडुनिंब व साखरेच्या माळ, त्यावर तांब्याचा उपडा गडू ठेवत सजलेली गुढी मानवाच्या मूलभूत गरजांना जपण्याची ग्वाही देते. साहस, मांगल्य, नवचैतन्याचे प्रतीक असणारी श्रीरामाच्या विजयाची, शालिवाहन शकाच्या प्रारंभाची गुढी या पौराणिक कथांच्या पार्श्‍वभूमीसोबत वसंत ऋतूला सुरुवात करून देणारी असल्याने ही गुढी पर्यावरण रक्षणाचे आवाहन देखील करते. रांगोळीच्या सडा घालून घराच्या अंगणात उभारली जाणारी गुढी हळूहळू फ्लॅटच्या खिडकीत डोकावू लागली व आता, कुठेही सहज ठेवता येईल अशी बोनसाय गुढी आली.
वाढती लोकसंख्या व जागेची कमतरता यामुळे गुढी उभारण्यावर काढलेला बोनसाय गुढीच्या पयार्याला पसंती मिळणे साहाजिक आहे. गुढीची उंची कमी झाली असली, तरी सणाचे महत्त्व कमी झालेले नसून या शुभमुहूर्तावर मनोभावे गुढीची पूजा केली जाते. बदलत्या परिस्थितीतून मार्ग काढत परंपरा जपण्याचा अट्टहास व गुढीपाडवा या सणावरील र्शद्धा दिसून येते. हे सण व्यक्तिंमधील एकोपा जपण्याचे कार्य करीत असून, यामुळे वाढत्या यांत्रिक जीवनातून थोडी विश्रांती घेत प्रत्येकाला संस्कृतीविषयीचा आदर व्यक्त करण्याची संधी मिळते. द्वेष किंवा मतभेदांना बाजूला सारत येत्या गुढीपाडव्याला आपल्या नात्यांना वेळ देऊया. गोडाच्या पदार्थांची चव घेत, गप्पा गोष्टींच्या आनंदाने सजलेली जिव्हाळ्याच्या भक्कम पायावर प्रेमाची गुढी उभारुया!!
गुढी पाडवा, आनंद वाढवा
चैत्राची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. तो प्रत्येक हिंदूच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढीउभी करावी . गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी तिला हळद, चंदनाची सुवासिक द्रव्यांनी प्रसादित करावे.तिच्यावर कोरे कापड (खण) चाफ्याचा फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब या सर्वांसमवेत गडू बांधावा व अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापूर्वीपयर्ंत घरावर डौलाने उभी करावी. हा ब्रह्मध्वज आहे. आपल्या स्वतंत्र अस्मितेचे ते लक्षण आहे. विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभी करतो.
चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी (पाडव्याला) प्रभू राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला १४ वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढय़ा उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली (सोन्यामाणकांसारख्या वैभवसंपन्न र%ांनी पूर्ण अयोध्या सजली होती अशी वर्णने वाचायला मिळतात.) त्या आनंदाचे प्रतीक म्हणून आपणही घरादाराला आंब्याची तोरणे बांधतो, फुलांच्या माळांनी घर सजवतो. सकाळी मुखमार्जनानंतर कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच या समवेत द्यावीत असा प्रघात आहे. कारण कडुनिंब औषधी आहेच पण रसांसमवेत (आंबट, तुरट, तिखट यासारखा) याचे सेवन आयुर्वेदात महत्त्वाचे मानले आहे. वर्षाच्या सुरवातीला मागच्या सगळ्या कडू गोष्टी गिळून टाकून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा असे ही प्रथा सांगते. कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करतात. कारण उन्हाळ्यात होणार्‍या त्वचारोगापासून बचाव करण्याचे सार्मथ्यही ह्यात आहे.मुलांनाही इळवणी घालतात. म्हणजे उन्हात पाणी ठेवून त्या पाण्याने मुलांना अंघोळी घालतात याचाच अर्थ लहानथोरांच्या जीवन शैलीत बदलत्या ऋतुमानानुसार बदल करून निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचाच मार्ग
या परंपरेत आहे.संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी गुढी खाली उतरवतात. त्यापूर्वी तिला धने व गूळ यांचा नैवेद्य दाखवतात (पुन्हा धने उन्हाळ्यात उपयोगी तर उन्हातून आल्यावर पाणी देण्यापूर्वी गुळाचा खडा देण्याची प्रथा आहे) व त्यावरची साखरेची गाठी मुलीच्या गळ्यात घालतात. तर मुलांना साखरेचे कडे देतात (होळी पासूनच हार-कडे देवाणघेवाण सुरू होते)
या सर्व परंपरांतून लहानपणापासूनच आपण निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्यास शिकतो. पूर्वी आपले जीवनमान निसर्गाच्या लहरींवर त्याच्या उष्ण, शीत बदलांवर अवलंबून होते . त्यामुळे आपल्या प्रत्येक सणांतले बदल हे निसर्गाच्या बदलानुसार होतात जसे,
संक्रांतीला थंडी म्हणून गूळ-पोळी शीतल-शिमग्याला तान्हा मुलांना मुलींना पातळ पांढर्‍या रंगाची झबली केशराच्या रंगाच्या (किंवा कुंकवाच्या पाण्यांचे शिंतोडे) शिंतोंड्यांनी भिजवून देतात हार-कडे देतात मुलांनी द्राक्षाचे दागिने घालतात कारण याच काळात द्राक्षे येण्यास सुरवात होते.
चैत्रात कैरीचे पन्हे (कैर्‍हा तेव्हाच होतात) र्शावणात फुलांची आरासींनी मंगळागौर सजवतात. या अन् अशा अनेक सणात मोसमी फळे, फुले येतातच. दिवाळीत झेंडूच्या फुलांचे मोठय़ा प्रमाणात आगमन होते तर गुढीपाडव्याला आंब्याला कोवळी पालवी फुटते, त्यामुळे घरादारावर आंब्याच्या पोपटी पानांचे तोरण खुलते.चैत्रातही झेंडू फुलतो. त्याचाही उपयोग घराच्या सुशोभनासाठी केला जातो. मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीरूपी झेंडा आकाशात दिमाखाने फडकवत प्रत्येक घर साजरा करते.
नवीन वर्षाचे अप्रुप असते. पण हा तर आपल्या हिंदूचा अभ्यंगस्नानांनी सुरू होणारा पाडवा! प्रत्येक घरातील लहानथोरांनी नटूनथटून अलंकाराने सुशोभित होऊन गुढय़ा उभारायचा दिवस, गोडधोडाचा दिवस, पंचांग पुजेचा दिवस, संवत्सर फल वाचनाचा दिवस, नवीन खरेदीचा दिवस, अन् सजलेल्या सालंकृत गृहलक्ष्मी बरोबरच चैत्रपालवीने नटलेल्या या धरतीच्या वसंतआगमनाच्या उत्साहाचा दिवस आपण ही दिमाखात साजरा करूया.
आकाशात गुढय़ांची, विजयपताकांची रांगच रांग दिसू द्या. दूर दूर नजर जाईतो आपल्या अस्मितेच्या, स्वाभिमानाच्या अन् शिवरायांच्या भगव्या झेंड्याच्या पताकांनी निळं आकाश भगवं होऊ द्यात.

1 comment: