Monday 2 March 2020

देशातील पहिले उद्योगपती जमशेदजी टाटा

भारत हा कृषिप्रधान देश होता. बहुसंख्येने लोक हे शेतीवर अवलंबून होते. शेतकरी, शेतमजूर यांना शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य कोण उपलब्ध करून देत होते? वखर,नांगर, खटारा, चाक, कुदळ, फावडे, टिकाव कोण बनवित होते? तर गावातील लोहार, सुतार यांच्याकडे मुबलक प्रमाणात हे साहित्य उपलब्ध होत नव्हते. हे सर्व साहित्य उपलब्ध करून देणारा देशातील पहिला उद्योगपती कोण आहे? असे आजच्या सुशिक्षित पिढीला नाव विचारले तर सांगता येणार नाही. भारत माझा देश आहे. सर्व भारतीय माझे बांधव आहेत. त्यांच्यासाठी लागणारे चांगल्या दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देणे हे माझ्या कंपनीचे उद्दिष्ट आहे,असा म्हणणारे भारतीय उद्योगपती आपणास माहिती आहे काय? जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी पारशी कुटुंबात झाला.
ते देशातील पहिला उद्योगपती होते.
भारतात अनेक उद्योगपती आहेत. पण त्यांचा भारतीय म्हणून उदोउदो करावा असे त्यांचे कोणतेही ठोस कार्य नाही. केवळ पैसा कमविण्यासाठी वाटेल त्या मार्गाने भारतीय जनतेचे आर्थिक शोषण करावे त्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना भ्रष्ट मार्गाने अर्थपुरवठा करून सत्ताधारी बनवून सर्व सार्वजनिक उद्योग धंदे ताब्यात घ्यावे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पण टाटा समूहाचा एकूण इतिहास पाहिला तर भारतीय नागरिकांना प्रेरणा देणारा आहे. ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलनात भाग घेण्यासाठी भरपगारी सुट्टी देणारा उद्योगपती देशात शोधला तर सापडणार नाही. अज्ञान, अंधर्शद्धा यांच्यात गुरफटलेल्या बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा उद्योग समूह म्हणून टाटांचे नाव गर्वाने सांगितले पाहिजे. शेतकरी, शेतमजूर यांना शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य वखर, नांगर, खटारा, चाक, कुदळ, फावडा, टिकाव घमेले व लोखंडी पत्रे स्वस्त दरात देणारा टाटा बँड सर्वांना माहिती आहे. लोक विश्‍वासाने सांगतात कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीची घ्यावी उत्तम दर्जाची, टिकावी असण्याची शंभर टक्के विश्‍वसनीय असते.
जमशेटजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ ला गुजरातमधील नवसारी येथे झाला. भारतात त्यांनी अनेक उद्योग धंद्याची सुरवात केली.त्यांच्या प्रत्येक उद्योग धंद्याला एक ऐतिहासिक पार्श्‍वभूमी त्यांची माहिती आजच्या पिढीला निश्‍चितच प्रेरणादायी आहे.पण ती सांगितल्या जात नाही लिहील्या जात नाही. म्हणून जमशेटजी नसरवानजी टाटा यांच्या ३ मार्च रोजीच्या जयंतीनिमित्त दोन शब्द बोलतांना गजानन महाराज प्रगट दिनाशी तुलना केली जाते. पण ऐतिहासिक पार्श्‍वभूमी सांगितल्या जात नाही. बंगळुरू येथे टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना करून तिच्या शाखा, मुंबई, हैदराबाद,पटना, चेन्नई, दिल्ली येथे आहेत. समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असणारे अनेक समाजसेवक एम. एस. डब्लू. मास्टर ऑफ सोशल वर्कमधून झाले आहेत. तेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबविण्याचे एनजीओ मार्फत कामे करतात. टाटा यांच्या जीवनात चार घटना घडल्या त्यामुळे त्यांनी चार ध्येय पूर्ण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. भारतीयांना लोखंडाच्या वस्तू लागतात त्या निर्माण करण्यासाठी पोलाद कंपनी जमशेदपूर येथे काढली, साची गावात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला. स्थानिक पातळीवरील लोकांना मोठय़ा प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या.जमशेदपूर आज झारखंडमध्ये नामांकित मोठे शहर म्हणून ओळखले जाते, टाटा स्टील पूर्वीची टाटा आर्यन आणि स्टील कंपनी लिमिटेड ही आशियातील पहिली व भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी होती. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २.८कोटी टन स्टील उत्पादन केल्यामुळे ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली. एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था,बंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि अभियांत्रिकी यामधील संशोधन व शिक्षण देण्यासाठी प्रख्यात भारतीय संस्था आहे.
हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी खपोली,भिरा, भिवपुरी, टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी म्हणजे आताची टाटा पॉवर कंपनी आठ हजार मेगाव्हॉट पेक्षा जास्त क्षमतेची स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज निर्मिती, पुरवठा,वितरण करणारी कंपनी आहे. गेट ऑफ इंडिया समोर ताजमहाल हॉटेल आहे, तिचे ३ डिसेंबर १९0३ ला उद््घाटन झाले. ती भारतातील पहिली स्वत:ची वीज असणारी एकमेव हॉटेल आहे. एक अद्वितीय हॉटेल ते मुंबई सह प्रत्येक देशात आहे. जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी १८५३ हिराबाई दबू यांच्या सोबत लग्न केले,१८५८ शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसाया मध्ये सहभागी झाले.१८६८ ला स्वत:ची कंपनी स्थापन केली. १८७४ महाराणी मिलची स्थापना केली. १९0१ ला युरोप, अमेरिका येथे स्टील उत्पादन व्यवस्थापन यांचे शिक्षण घेण्यासाठी यात्रा केली. १९0३ ताज हॉटेलची स्थापना केली. शेवटी १९ मे १९0४ ला निधन झाले.
जमशेटजी नसरवानजी टाटा संपूर्ण भारताचे उद्योग क्षेत्रातील प्रेरणास्रोत म्हणून ओळखल्या जातात. त्यांची टाटा ग्रुप ऑफ कंपनी भारताचीच नव्हे तर जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाते. त्या कंपनीचा मी एक कामगार कर्मचारी आहे. नुकताच २५ वर्षे लॉग सर्व्हिस अवॉर्ड मला मिळाला आहे.

No comments:

Post a Comment