Tuesday 3 March 2020

पाच वर्षांत सोळ हजार सायबर गुन्हे

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ३ हजार पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार असून आतापर्यंत सहा हजार आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यात मागील पाच वर्षात १६ हजार ५१५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये ६०२० आरोपींना अटक करण्यात आली असून वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अर्जट फ्रॉड (पेटीएम) नावाचा ग्रुप तयार केला आहे. सायबर गुन्ह्यांचा प्रभावीपणे तपास करण्यासाठी ३ हजार २५३ पोलिस अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली.
राज्यात नोंद झालेल्या सायबर गुन्ह्यांपैकी ४ हजार ५३२ गुन्हांची उकल झाली तर ६ हजार २० आरोपींना अटक झाली आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लेखी उत्तरात दिली. बँकांकडून कागदपत्रांची नीट पडताळणी होत नाही. त्यामुळे उघडलेल्या गेलेल्या खात्यांमध्ये होणाऱ्या अनेक गुन्ह्यांत बँकेकडून पोलिसांमध्ये तक्रारी दाखल होत नाही, असे लेखी उत्तरात नमूद केले आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अर्जंट फ्राँड(पेटीएम) नावाचा ग्रुप तयार केला असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्य व इतर राज्यातील पोलिस अधिकारी व अंमलदार या व्हाटस्अॅप ग्रुपचे सदस्य आहेत. राज्यातील सर्व पोलिस सायबर लॅब व सायबर ठाण्यांना गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर व हार्डवेअर पुरवण्यात आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी उत्तरात दिली आहे.

No comments:

Post a Comment