Friday 30 October 2020

महान व्यक्ती कशी असते?


महान व्यक्ती काय करतात? सामान्य व्यक्ती ज्या गोष्टींमध्ये आपला वेळ दवडतात त्या गोष्टींमध्ये महान लोकं कधीच अडकत नाहीत. काही लोक जे करायचंय ते क्षणात करतात आणि जे नाही करायचंय ते लगेच नाकारतात. उगीच चिंता करत नाहीत. असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं नसतं केलं तर बरं झालं असतं असं काही त्यांच्या डोक्यात नसतं. एक सामान्य माणूस त्याचा सगळा वेळ फक्त चिंता करण्यातच व्यर्थ घालवत असतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये शिखर गाठणे सोपे नाही. साहित्य, संस्कृती, कला, व्यवसाय आणि समाजसेवा आणि इतर कोणत्याही क्षेत्रात जर शिखर गाठायचं असेल तर संघर्ष अनिवार्य आहे. त्यासाठी महानता प्राप्त करण्यासाठी काही गुण अंगभूत असणं गरजेचं आहे. काही लोकं कोणतंही कार्य करण्याआधी स्वत:चा स्वार्थ पाहत असतात. त्यामुळे समाजाचे हित होईल का, इतरांचे भलं होईल का, याचा ते विचारच करत नाहीत. समाजाचे, राष्ट्राचे नुकसान होत असेल, पण आपला फायदा होत असेल तरीसुद्धा ती लोकं हे कार्य करतात. महान लोक स्वत:चे नुकसान होत असेल तरीही समाजाचे, राष्ट्राचेही हित साधतात. स्वार्थाची संकुचित विचारसरणी ठेवत नाहीत. उत्साहींचा एक शेर महान लोकांमधील त्यागाच्या गुणाचे वर्णन करतो-ऐ हवाओं के झकोरों कहां आग लेके निकले, मेरा गांव बच सके तो मेरी झोपडी जलादो. हा विचार, ही भावनाच माणसाला महान बनवते. जगाचं हित साधण्याचा जोश आपल्यामध्ये असायला हवा. स्वत:वर प्रेम करायला भाग पाडणारा मोह माणसाला कधीच महान बनवत नाही. महान लोकांच्या स्वभावात एक साधेपणा असतो. आपल्या विरोधकांनाही आपलेसे करण्याची ताकद महान लोकांमध्ये असते. आपण एखाद्या गोष्टीची, व्यक्तीची अवहेलना केली, तर ती आपल्याकडे का येईल? ती निश्‍चितच येणार नाही. आपण जर दुसर्‍यांच्या संपत्तीचा, गुणांचा द्वेष करायला लागलो तर ते कधीच आपल्याशी चांगले वागणार नाहीत. म्हणून महान लोकं सगळ्यांशी चांगले वागतात. कोणालाच दुखवत नाहीत. सामान्य माणसं आपली सगळी ऊर्जा दुसर्‍यांची टर उडवण्यात वाया घालवतात. महान माणसं मात्र त्याच ऊर्जेचा योग्य वापर करतात. ती सत्कारणी लावतात. महान लोकांचे हे गुण अंगी बाणले तर आपणही निश्‍चित आयुष्यात यशस्वी होऊ शकतो.

●●●●●

जर आपत्तींचा विचार केला तर तो येईल. जर तुम्ही  मृत्यूबद्दल गांभीर्याने विचार करत असाल  तर तुमचा  आपल्या मृत्यूच्या दिशेने वाटचाल सुरू झाली समजा.जेव्हा आपण सकारात्मक आणि स्वेच्छेने विचार करतो, तेव्हा आपला विश्वास  आणि निष्ठा यांच्याबरोबर  तुमचे जीवन सुरक्षित होऊन जाईल.

●●●●●●●●

आपल्या किंमतीचा आणि हिंमतीचा अंदाज कधीच कोणाला सापडू द्यायचा नसतो. कारण समोरचा नेहमी आपल्या या दोनच गोष्टी शोधत असतो.

●●●●●●

राहूल : पप्पू .....! काय करतो रे तू आज काल ?

पप्पू : मी MBBS करतोय 

राहूल (हसुन) : तुला बघलं तेंव्हा तू शेतात

असतोस अन् MBBS कधी करतोयस ....?

पप्पू : MBBS म्हणजे " म्हशी बघत बघत शेती

No comments:

Post a Comment