1) लहान मुलांमध्ये आढळणारी चौकसवृत्ती
म्हणजे ज्ञानाची भूक होय.- अल्बर्ट आइनस्टाइन
2) आपणच आपल्या कीर्तीचा फुगा नको तेवढा
फुगवला,की तो केव्हा फुटतो हेही समजत नाही.-एम्मा कार्ले टोन
3) उच्चासने नेहमीच गैरसोयीची असतात,तर काही मुकुटांच्या खाली काटे असतात.-जेम्स ब्रुक
4) दुबळ्या रस्त्यातील अडसर बनलेला पाषाण
हा बलवानाच्या मार्गातील एक यशाचा टप्पा ठरतो.-थॉमस कार्लेले
5) त्याग हाच मैत्रीचा भक्कम पाया असतो.-महात्मा गांधी
6) सत्य व न्याय याहून कोणताच धर्म मोठा
नसतो.-महात्मा गांधी
7) स्वयंप्रेरणा वा उत्साह यांसारखी
दुसरी भेट पालक आपल्या पाल्यास देऊच शकत नाहीत.-ब्रूस बार्टोन
8) माणसास मृत्यू कसा आला, यापेक्षा तो कसा जगला याला अधिक महत्त्व असते.-डॉ.
सॅम्युअल जॉन्सन
9) घरात खूप पुस्तके जमा करणारा व आपल्या
पाल्याकडे भरपूर लक्ष देणारा पालक धनवानच असतो.-सॅम लेव्हनसन
10) श्रद्धा,ऊर्मी
यांवर विसंबून वापरलेली संगोपनपद्धती सर्वात परिणामकारक असते.-केली वॉकर
11) सहिष्णुता ही खर्याखुर्या सुसंस्कृतपणाची एक महत्त्वपूर्ण खूण आहे.-सिसेरो
12) निर्वाणीचा क्षण-पाही कोण परिणाम? विसरावे देहभान-हाच धर्म!-माधव ज्युलियन
13) प्रार्थना म्हणजे देवाबरोबर केलेला
संवाद होय.-जोसेफ केसी
14) जर तुम्ही स्वत:ला विसरू शकलात,तरच खर्या अर्थाने
तुम्ही ईश्वराजवळ पोचू शकाल.-हेन्री धसे
15) अन्याय डोळ्यांनी पाहणे व सहन करणे
हे महापाप होय.-संत तुकडोेजी महाराज
16) उद्याची ज्योत आजच लावा.-एलिझाबेथ ब्राऊनिंग
17) निर्भयता हे नैतिकतेचे पहिले लक्षण
आहे.-महात्मा गांधी
18) तिरस्कारामुळे झालेली जखम स्मितामुळे
भरून निघते.-शेक्सपीयर
19) योग्य वेळेची निवड करणे म्हणजे वेळेची
बचत करणे होय.-अल बेकॉन
20) दुसर्याला न
दुखवता, दुष्टापुढे न वाकता, सज्जनांनी
मळवलेली वाट न सोडता, जे थोडेफार पदरी पडले त्याचे मोल मोठे असते.
-बहिणाबाई चौधरी
21) एखादे नवे काम पुरते करायचे नसेल तर,हाती घेऊ नका आणि घेतले तर ते पूर्ण करा.-ओव्हिड
No comments:
Post a Comment