Friday 28 September 2018

हमीद उमर दलवाई

हमीद उमर दलवाई हे मुस्लीम समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी १९७0मध्ये मुस्लीम सत्यशोधक मंडळ स्थापले. समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुस्लिमांचे मराठी साहित्य, समाजात आधुनिक विचार प्रण्याचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते. दलवाई यांनी १९६६मध्ये सात मुस्लीम महिलांना घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान नावाचे पुस्तक लिहिले.

No comments:

Post a Comment