Sunday 31 May 2020

सुंदर सुंदर विचार

1) स्वातंत्र्याचा वृक्ष ताजातवाना ठेवून त्याला देशभक्तांच्या घामाचे व कष्टाचे खतपाणी करावे.-थॉमस जेफरसन
2) पृथ्वीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेकरूपी वृक्षांची छाया अधिक शीतल असते.-गौतम बुद्ध
3) अन्यायाचा व द्वेषाचा विजय कधीच होत नसतो.-यशवंतराव चव्हाण
4) विशुद्ध कलेच्या सर्जनासाठी कलाकाराचे अंतःकरण निर्दोष असले पाहिजे.-प्लेटो
5)आपल्या प्रभावी वक्तव्याने शत्रूचेदेखील मत बदलवू शकतो, तोच महापुरुष होय.-स्वामी विवेकानंद

6)तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही,त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात.गौतम बुद्ध
7) क्षणामध्ये जगतो तो मनुष्य आणि क्षणाला जिवंत करतो तो कवी.-मिल्टन
8) ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत ती काय माणसे म्हणायची?-सानेगुरुजी
9)विद्या शिका अन गरीबाले विद्येसाठी मदत करा.-संत गाडगेबाबा
10) सत्यपालन हाच एकमेव धर्म, बाकी सगळे अधर्म!- महात्मा जोतिबा फुले
11) अन्याय व अनीतीने ध्येयसिद्धी होत नाही,परंतु सत्य आणि धर्माची कास धरल्यास ध्येयसिद्धी होते.-रामकृष्ण परमहंस
12) नशिबाचा आलेख मनुष्य आपल्या कर्माने रेखाटत असतो.-भगतसिंह
13)निर्बलांना रक्षण देणे हीच बलाची खरी सफलता होय.-सानेगुरुजी
14) आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे.-स्वामी विवेकानंद
15) एखादी गोष्ट पूर्ण होत नाही,तोपर्यंत ती नेहमीच अशक्य वाटते.-नेल्सन मंडेला
16) खोटारडी माणसे दुसऱ्याशी खोटे बोलतात तर स्वप्नाळू माणसे स्वतःशी खोटे बोलत असतात.- फ्रेडरिक निशते
17) 'मला माहित आहे' असा विचार जेव्हा येतो, तेव्हा ज्ञानप्राप्तीची ओढ संपते.-डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन
18) इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा, तुम्हाला तुमचा 'स्व' सापडेल.-महात्मा गांधी
19) रोग झाल्यावर औषधोपचार करण्यापेक्षा रोगच होणार नाही, अशी व्यवस्था करणे अधिक बरे.-डॉ.बाबासाहेब आंबेडकर
20)सेवाधर्माचे एकनिष्ठ आचरण करा.-स्वामी विवेकानंद
21) आपल्या संचित पापाचा परिणाम म्हणजे दुःख होय.-गौतम बुद्ध
22) भूक लागल्यावर खाणे म्हणजे प्रकृती, भूक नसतानाही खाणे म्हणजे विकृती आणि भुकेल्यांना खायला घालणे म्हणजे संस्कृती!- विनोबा भावे
गुरुपेक्षा शिष्याने अधिक काहीतरी केले पाहिजे.- कर्मवीर भाऊराव पाटील

No comments:

Post a Comment