Thursday 10 September 2020

कवी अनिल


आत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवँ अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी १0 चरणांची कविता हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.

कवी अनिलांचा जन्म सप्टेंबर ११, इ.स. १९0१ रोजी मुर्तिजापूर ह्या गावी झाला. तेथेच शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर ते इ.स. १९१९ पुणे शहरास आले. फर्गसन महाविद्यालय येथे कलाशाखेचा पदवी अभ्यासक्रम करीत असतानाच कुसुम जयवंत ह्या तरुणीशी परिचय, त्याचे पुढे प्रेमात रूपांतर आणि ऑक्टोबर ६, १९२९ ला विवाहात परिणती झाली.

पदवी मिळवल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी कोलकाता इथे प्रयाण केले. ह्याबाबत अब्रिंद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसु ह्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. त्यानंतर १९३५ साली विधिशाखेची पदवी घेतली. सनद घेतल्यावर वकिलीचा व्यवसाय सुरू केला. १९४८ साली मध्यप्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उप-मुख्याधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९५६ साली राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, दिल्ली इथे मुख्याधिकारी या, आणि पुढे १९६१ साली भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार ही पदे त्यांनी भुषविली. असा मार्गक्रम करत असताना मराठी वायात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कवी अनिलांना इ.स. १९७९ ची साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान करण्यात आली होती. ८ मे १९८२ रोजी त्यांचे नागपूर येथे निधन झाले.

फुलवात १९३२,भग्नमूर्ती (दीर्घकाव्य) १९३५, निर्वासित चिनी मुलास (दीर्घकाव्य) १९४३, पेर्ते व्हा १९४७ सांगाती १९६१, दशपदी १९७६ आदी साहित्य प्रसिध्द आहे. आत्माराम रावजी देशपांडे यांनी १९५८ साली मालवण येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते.

No comments:

Post a Comment