* तुम्हाला उद्यासाठी तयारी करायची असेल ,तर तुम्हीच आजचा सदुपयोग करा,कारण आजमधूनच उद्याचा सोनेरी दिवस उगवतो.
* गेलेल्या काळाकडे पाहून आपण जीवन समजू शकतो,पण येणाऱ्या काळावर लक्ष ठेवून आपण जीवन जगू शकतो.
* तुम्ही फक्त वर्तमानाची काळजी करा,भविष्य आपली काळजी स्वतः करते.
* इतिहास निर्माण करणाऱ्यांकडे कधीही इतिहास लिहिण्याइतका वेळ असत नाही.त्यामुळे असं म्हटलं जातं की,इतिहास निर्माण करणारे वेगळे असतात आणि इतिहास लिहिणारे वेगळे असतात.
* कधीही कालची आणि ऊद्याची काळजी करत बसू नका ,कारण कालच्यापासून आपल्याला काहीच मिळत नाही आणि उद्याची आपल्याला काही माहिती नसते.त्यामुळे वर्तमानाचाच विचार करा.
* भूतकाळात आपल्या हातून घडलेल्या चुका आणि उद्याचा काळजी यांचा विचार करत बसला तर आजचा दिवस वाया घालवाल.
No comments:
Post a Comment