Thursday 18 October 2018

कारगिल विजय दिन'

२६ जुलै हा दिन 'कारगिल विजय दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी पाकिस्तानचे कंबरडे मोडून भारताने हे युद्ध निकालात काढले.
कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच र्मयादित राहिली, त्यामुळे याला र्मयादित युद्ध असे सुरुवातीला म्हटले ेगेले. पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने हे युद्धच होते असे जाहीर केले.
इ.स. १९९९च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.
कारगिलचे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते. त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगिलपुरतेच र्मयादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली. कारगिल हे पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. तेथे काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर ते वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६0 किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,000 मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगीलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली. तरीही शूर भारतीय जवानांनी शौर्याची पराकाष्ठा करीत पाकला चांगलीच अद्दल घडवली. २६ जुलैला निणार्यकरीत्या हे युद्ध संपुष्टात आले.

No comments:

Post a Comment